शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

मिनीमंत्रालयात पाचव्यांदा ‘महिलाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषदेते ५२ गण असून भाजपाकडे बहूमत असल्याने भाजपाची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, बहुजन समाज पार्टीचे २ तसेच शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना व अपक्षांचे प्रत्येक एक सदस्य आहेत. गेल्या निवडणूकीत अध्यक्षपद एसटीकरिता राखीव होते.

ठळक मुद्देअध्यक्षपद नामाप्र महिलाकरिता राखीव : राजकीय हालचालींना वेग, मोर्चेबांधणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा कार्यकाळ संपला असून नवीन अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाच्या वाट्याला जाते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या सोडतीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रगर्व (महिला) करिता राखीव झाल्याने आता जिल्ह्याच्या मिनीमंत्रालयात पाचव्यांदा महिलाराज येणार आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेते ५२ गण असून भाजपाकडे बहूमत असल्याने भाजपाची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, बहुजन समाज पार्टीचे २ तसेच शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना व अपक्षांचे प्रत्येक एक सदस्य आहेत. गेल्या निवडणूकीत अध्यक्षपद एसटीकरिता राखीव होते. भाजपाकडे बहूमत असल्याने भाजपाकडून नितीन मडावी तर काँग्रेसकडून सुमित्रा मलघाम यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सभागृहात झालेल्या निवडणुकीदरम्यान भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआयने साथ दिली. तर काँग्रेसला शेतकरी संघटनेने पाठींबा दिला होता. बहुजन समाज पार्टीचे दोन्ही सदस्य तटस्थ होते तर दोन सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे नितीन मडावी यांना ३४ मते मिळाल्याने ते अध्यक्षपदी निवडून आले. त्यासोबत उपाध्यक्षांसह सर्व सभापतीपदही भाजपाच्याच सदस्यांना देण्यात आली. या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींचा अडीच वर्षाचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यातच संपला पण; दुष्काळी परिस्थिती आणि निवडणुकीमुळे तीन महिन्यांची मुदत वाढ मिळाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या आरक्षणावरुन अंदाज बांधत अनेकांनी अध्यक्षपदाकरिता हालचालीही सुरु केल्या होत्या. अखेर आज अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला) करीता राखीव झाल्याने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले असून सध्या राजकीय वर्तळात ‘कही खुशी कही गम’ अशीच परिस्थिती आहे.विरोधकही उतरणार मैदानातजिल्हा परिषदेमध्ये भाजपाने अडीचवर्षे एकहाती सत्ता उपभोगली असताना आता अडीच वर्षात चित्र बदलेले आहे. भाजपातही काही असंतुष्ट असून राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, शेतकरी संघटना व काँग्रेस यांनी विरोधकांचीच भूमिका बजावली आहे. त्यामुळे आता विरोधकही आपली मोट बांधून सत्तेला सुरुंग लावण्यासाठी कबंर कसण्याची शक्यता आहे.आतापर्यंत या महिलांनी सांभाळली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुराजिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत चार महिलांनी अध्यक्षपदांची जबाबदारी सांभाळली आहे. यात महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारुलता टोकस या पहिल्या जिल्हा परिषदेच्या महिला अध्यक्ष राहिल्या आहे. त्यांंनी २१ मार्च १९९२ ते ७ डिसेंबर १९९५ पर्यंत जबाबदारी सांभाळली. त्यांच्यानंतर सिमंतिनी रामभाऊ हातेकर यांनी २१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२ पर्यंत जबाबदारी पार पाडली. कलावती सुधीर वाकोडकर या २१ मार्च २००२ ते १७ फेबुवारी २००५ आणि २१ मार्च २००७ ते १ डिसेंबर २००९ अशा दोनदा अध्यक्ष राहिल्या आहे. तर चित्रा विरेंद्र रणनवरे यानीही २१ सप्टेंबर २०१४ ते २० मार्च २०१७ पर्यंत अध्यक्षपद सांभाळले आहे. आता पाचव्यांदा अध्यक्षपदाची खुर्ची कोणत्या महिलेकडे जाते याकडे जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.अध्यक्षपद कोणत्या मतदारसंघालागेल्या निवडणुकीत भाजपाची एकहाती सत्ता असताना आर्वी मतदार संघातील सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडूण आल्याने अध्यक्षपद आर्वी मतदार संघाला मिळावे याकरिता आग्रही भूमिका होती. पण, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर अध्यक्षपद हिंगणघाट मतदार संघाला देऊन उपाध्यक्षासह दोन सभापतीपद आर्वी मतदार संघाला देण्यात आले. आतापर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळाचा विचार केल्यास वर्धा विधानसभा मतदार संघाला सर्वाधिक ९ वेळा अध्यक्षपद मिळाले आहे. त्यानंतर देवळी मतदार संघाला पाचवेळा, आर्वी मतदार संघाला तीन वेळा तर हिंगणघाट मतदार संघाला दोन वेळा अध्यक्षपद मिळाले आहे. विशेषत: महिला अध्यक्षांच्या बाबतीत विचार केल्यास वर्धा व आर्वी मतदार संघाला दोनदा अध्यक्षपद मिळाले आहे. वर्धा मतदार संघात एकदाच तर हिंगणघाट मतदार संघात अद्यापही महिलांना अध्यक्षपद मिळाले नाही. त्यामुळे आता आपल्या मतदार संघाला संधी मिळावीयासाठी तयारी चालविली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद