शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

‘गाव तेथे प्रवासी निवारा’ योजनेचा फज्जा

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवार्‍यांचे बांधका करण्यात आले. बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात

पिंपळखुटा : शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवार्‍यांचे बांधका करण्यात आले. बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात आलेले या निवार्‍यांची देखभाल, दुरूस्ती परिवहन महामंडळाद्वारे करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सध्या गाव तेथे प्रवासी निवारा, या योजनेचा फज्जाच उडाल्याचे दिसते.

प्रवासी निवार्‍यांवर सध्या कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच प्रवासी निवार्‍यांवर गुरांनी ताबा मिळविला आहे. येथील निवार्‍यांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना शासनाचा निधी बुडविणारीच ठरली.

राज्यात एसटी ही प्रवासाचे मुख्य साधन आहे. प्रवास करताना विविध बसस्थानकावर प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करीतत ताटकळावे लागते. अनेक ठिकाणी प्रवासी निवारे नसल्याने प्रवाशांना उन्ह, वारा, पावसाचा मारा सहन करीत बसची वाट पाहावी लागत होती. यामुळे गाव तेथे प्रवासी निवारा, ही संकल्पना उदयास आली. संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या निधीतून ग्रामीण भागात प्रवासी निवार्‍यांचे बांधकाम करण्याचा सपाटा सुरू झाला; पण बांधकाम केल्यानंतर या प्रवासी निवार्‍यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या योजनेकरिता समाज सहभागही कमी पडला. यामुळे अनेक प्रवासी निवार्‍यांमध्ये स्वच्छतेच्या अभावाने सर्वत्र घाण पसरली आहे. अनेक निवार्‍यांना गुरांनी आपले आश्रयस्थान बनविले आहे.

प्रवासी निवार्‍यांमध्ये अस्वच्छता असल्याने निवार्‍यांबाहेर उभे राहून प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करावी लागते. शासनाने चांगल्या उद्देशाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली; पण सध्या प्रशासन, प्रवाशांच्या उदासितेमुळे मूळ संकल्पनेला हरताळ फासला गेला आहे. जिल्ह्यात अनेक प्रवासी निवारे बेवारस असून काही हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसते. उन्हात वा झाडांच्या आधार घेत बसची वाट पाहावी लागते. अडगळीत असलेल्या व जीर्ण झालेल्या प्रवासी निवार्‍यांचे नव्याने बांधकाम करणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. बांधकाम विभाग आणि परिवहन महामंडळाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)