शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘गाव तेथे प्रवासी निवारा’ योजनेचा फज्जा

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवार्‍यांचे बांधका करण्यात आले. बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात

पिंपळखुटा : शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवार्‍यांचे बांधका करण्यात आले. बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात आलेले या निवार्‍यांची देखभाल, दुरूस्ती परिवहन महामंडळाद्वारे करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सध्या गाव तेथे प्रवासी निवारा, या योजनेचा फज्जाच उडाल्याचे दिसते.

प्रवासी निवार्‍यांवर सध्या कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच प्रवासी निवार्‍यांवर गुरांनी ताबा मिळविला आहे. येथील निवार्‍यांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना शासनाचा निधी बुडविणारीच ठरली.

राज्यात एसटी ही प्रवासाचे मुख्य साधन आहे. प्रवास करताना विविध बसस्थानकावर प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करीतत ताटकळावे लागते. अनेक ठिकाणी प्रवासी निवारे नसल्याने प्रवाशांना उन्ह, वारा, पावसाचा मारा सहन करीत बसची वाट पाहावी लागत होती. यामुळे गाव तेथे प्रवासी निवारा, ही संकल्पना उदयास आली. संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या निधीतून ग्रामीण भागात प्रवासी निवार्‍यांचे बांधकाम करण्याचा सपाटा सुरू झाला; पण बांधकाम केल्यानंतर या प्रवासी निवार्‍यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या योजनेकरिता समाज सहभागही कमी पडला. यामुळे अनेक प्रवासी निवार्‍यांमध्ये स्वच्छतेच्या अभावाने सर्वत्र घाण पसरली आहे. अनेक निवार्‍यांना गुरांनी आपले आश्रयस्थान बनविले आहे.

प्रवासी निवार्‍यांमध्ये अस्वच्छता असल्याने निवार्‍यांबाहेर उभे राहून प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करावी लागते. शासनाने चांगल्या उद्देशाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली; पण सध्या प्रशासन, प्रवाशांच्या उदासितेमुळे मूळ संकल्पनेला हरताळ फासला गेला आहे. जिल्ह्यात अनेक प्रवासी निवारे बेवारस असून काही हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसते. उन्हात वा झाडांच्या आधार घेत बसची वाट पाहावी लागते. अडगळीत असलेल्या व जीर्ण झालेल्या प्रवासी निवार्‍यांचे नव्याने बांधकाम करणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. बांधकाम विभाग आणि परिवहन महामंडळाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)