शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘गाव तेथे प्रवासी निवारा’ योजनेचा फज्जा

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवार्‍यांचे बांधका करण्यात आले. बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात

पिंपळखुटा : शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवार्‍यांचे बांधका करण्यात आले. बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात आलेले या निवार्‍यांची देखभाल, दुरूस्ती परिवहन महामंडळाद्वारे करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सध्या गाव तेथे प्रवासी निवारा, या योजनेचा फज्जाच उडाल्याचे दिसते.

प्रवासी निवार्‍यांवर सध्या कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच प्रवासी निवार्‍यांवर गुरांनी ताबा मिळविला आहे. येथील निवार्‍यांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना शासनाचा निधी बुडविणारीच ठरली.

राज्यात एसटी ही प्रवासाचे मुख्य साधन आहे. प्रवास करताना विविध बसस्थानकावर प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करीतत ताटकळावे लागते. अनेक ठिकाणी प्रवासी निवारे नसल्याने प्रवाशांना उन्ह, वारा, पावसाचा मारा सहन करीत बसची वाट पाहावी लागत होती. यामुळे गाव तेथे प्रवासी निवारा, ही संकल्पना उदयास आली. संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या निधीतून ग्रामीण भागात प्रवासी निवार्‍यांचे बांधकाम करण्याचा सपाटा सुरू झाला; पण बांधकाम केल्यानंतर या प्रवासी निवार्‍यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या योजनेकरिता समाज सहभागही कमी पडला. यामुळे अनेक प्रवासी निवार्‍यांमध्ये स्वच्छतेच्या अभावाने सर्वत्र घाण पसरली आहे. अनेक निवार्‍यांना गुरांनी आपले आश्रयस्थान बनविले आहे.

प्रवासी निवार्‍यांमध्ये अस्वच्छता असल्याने निवार्‍यांबाहेर उभे राहून प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करावी लागते. शासनाने चांगल्या उद्देशाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली; पण सध्या प्रशासन, प्रवाशांच्या उदासितेमुळे मूळ संकल्पनेला हरताळ फासला गेला आहे. जिल्ह्यात अनेक प्रवासी निवारे बेवारस असून काही हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसते. उन्हात वा झाडांच्या आधार घेत बसची वाट पाहावी लागते. अडगळीत असलेल्या व जीर्ण झालेल्या प्रवासी निवार्‍यांचे नव्याने बांधकाम करणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. बांधकाम विभाग आणि परिवहन महामंडळाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)