शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

‘सातबारा’, ‘आठ-अ’ साठी फरफट

By admin | Updated: July 31, 2015 02:18 IST

नापिकी व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

महसूल विभागाचा प्रताप : कर्जबाजारी शेतकऱ्याच्या तीन वर्षांपासून चकराआर्वी : नापिकी व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूपर येथील चंद्रशेखर मनोहर देशमुख या कर्जबाजारी शेतकऱ्याचा सातबारा व आठ अ गत तीन वर्षांपासून महसूल विभागाने दिला नाही. या शेतावर अडीच लाखांचे कर्ज आहे. शेत विकून हे कर्ज फेडू, असा शेतकऱ्याचा मानस होता; पण सातबाराच जवळ नसल्याने शेत विकात आले नाही. या विवंचनेत अन्यायग्रस्त शेतकऱ्याने महसूल प्रशासनाने आत्महत्या करण्याची वेळ लेखी तक्रारीतून केला आहे.तालुक्यातील नांदपूर येथील चंद्रशेखर मनोहर देशमुख यांच्याकडे ११ एकर शेतजमीन आहे. या जमिनीचे अमरावती येथील न्यायालयात प्रकरण सुरू होते. या जमिनीची जप्ती व विक्री करण्यासाठी ४ एप्रिल २०१२ रोजी लिलाव ठेवण्यात आला होता; पण यातील १७ हजार रुपये न्यायालयास अदा करण्यात आले. यानंतर न्यायालयाने लिलाव स्थगित करीत जमीन जप्ती व विक्रीचा वारंट रद्द केला. यावेळी तत्कालीन तहसीलदार कैलूके यांना अर्ज करून जमीन परत करून सातबारा व आठ अ देण्याबाबत शेतकऱ्याने विनंती केली; पण जमिनीचा सातबारा, आठ अ देण्यास टाळाटाळच करण्यात आली. या प्रकरणात शेतकरी देशमुख यांची शेतजमिनी न्यायालयाने तहसील कार्यालयामार्फत लिलावात काढली असता १ लाख ७६ हजार रुपये अदा करण्यात आले. यानंतरही तहसील कार्यालयातून शेतजमीनीचा सातबारा दिला जात नसल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे.सदर शेतकऱ्यावर सहकारी बँकेचे २ लाख १५ हजार रुपयांचे आणि स्टेट बँक आॅफ इंडियाचे १ लाख १५ हजार रुपयांचे कृषी कर्ज थकित आहे. या दोन्ही बँका वारंवार नोटीस पाठवून कर्ज अदा करण्यास सांगत आहे. या सर्व प्रकरणांत आर्वी न्यायालयाने २ लाख ३३ हजार ३९६ रुपये भरणा करण्यास सांगितले. यानुसार सदर शेतकऱ्याने महसूल विभागाकडे सातबारा व आठ अ मिळण्यासाठी १७ मार्च २०१५ रोजी लेखी अर्ज केला. शेती विकून कर्ज फेडता येईल म्हणून शेतकऱ्याने दोन्ही प्रमाणपत्रांची मागणी केली होती; पण ते अद्यापही देण्यात आले नाही. शिवाय तीन वर्षांपासून पर्यायही देण्यात आलेला नाही. सदर शेतकरी तीन वर्षांपासून महसूल कार्यालयाच्या चकरा मारत आहे. महसूल विभागाने सातबारा परत न केल्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्याने तक्रारीत नमूद केले आहे. आॅगस्ट महिन्यात सदर शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा लिलाव असल्याने तत्पूर्वी आत्महत्या करण्याचा इशाराही पीडित शेतकऱ्याने दिला आहे. लिलावात काढलेली शेती विकल्यावर जगणार कसा, असा सवालही शेतकऱ्याने निवेदनातून केला आहे. महसूल विभागाने याकडे लक्ष देत पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही शेतकऱ्याने निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)