शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कौटुंबिक वादातून मुलाकडून वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रवींद्र बाबरे हे मद्य प्राशन करून घरी आले आणि शेतात पेरणी केलेले तुरीचे बियाणे का निघाले नाही, असे म्हणून पत्नीला मारहाण करू लागले. दरम्यान मुलगा पीयूष बाबरे हा आईला वाचविण्यासाठी मध्यस्थी गेला असता रवींद्रने त्यालाही मारहाण केली. दोघांमध्ये चांगलाच वाढ उफाळला. रागाच्या भारात पीयूषने रवींद्रवर धारदार शस्त्राने वार करीत त्यांची हत्या केली.

ठळक मुद्देआरोपी जेरबंद, गुन्ह्यात धारदार शस्त्राचा केला वापर, परिसरात एकच खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.): कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत मुलाने वडिलांच्या शरीरावर धारदार शस्त्रााने वार करीत त्यांचा खून केला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बेलोरा (जळगाव) येथे ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला तळेगाव पोलिसांनी अटक केली असून मृतदेह आर्वी येथे उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.रवींद्र साहेबराव बाबरे (५२) असे मृताचे नाव असून आरोपी मुलगा पीयूष बाबरे (२०) यास अटक करण्यात आली आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बेलोरा येथील रविंद्र बाबरे हे पत्नी व दोन मुलांसह राहायचे. त्यांचा शिवणकाम करण्याचा व्यवसाय होता. रविंद्रला दारूचे व्यसन होते. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. रवींद्र हे दररोज मद्य प्राशन करून घरात वाद घालीत असे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रवींद्र बाबरे हे मद्य प्राशन करून घरी आले आणि शेतात पेरणी केलेले तुरीचे बियाणे का निघाले नाही, असे म्हणून पत्नीला मारहाण करू लागले. दरम्यान मुलगा पीयूष बाबरे हा आईला वाचविण्यासाठी मध्यस्थी गेला असता रवींद्रने त्यालाही मारहाण केली. दोघांमध्ये चांगलाच वाढ उफाळला. रागाच्या भारात पीयूषने रवींद्रवर धारदार शस्त्राने वार करीत त्यांची हत्या केली. याची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृत रविंद्र बाबरे यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविला. पोलिसांनी याप्रकरणी मुलगा पियूष बाबरे यास रात्रीच अटक केली. पुढील तपास ठाणेदार रविकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक धीरज राजुरकर, आशिष नेवारे, रूपेश उगेमुगे, अनिल ढाकणे, मनोज आसोले करीत आहेत.मृत वर्षभरापूर्वीच आला कारागृहाबाहेरमृतक रविंद्र बाबरे याने २००७ मध्ये कौटुंबिक वादातून आईचा खून केला होता. याप्रकरणी मृत रवींद्र हा तब्बल ११ वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होता. वर्षभरापूर्वीच रवींद्र कारागृहातून बाहेर पडत गावात आला होता. त्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडले होते. मद्यधुंद अवस्थेत तो नेहमीच कुटुंबीयांशी वाद घालत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Murderखून