शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कापूस भावातील तेजीचा उत्पादकांना फायदा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:28 IST

कापसाचे उत्पादन कमी असल्याने भविष्यात भाववाढ होईल, या आशेने घरी भरून ठेवलेला कापूस मार्चच्या पहिल्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ५ हजार ३०० रुपयांत विकला. ८ मार्चपासून कापसाच्या भावात कासवगतीने का होईना पण तेजी येत आहे.

ठळक मुद्देभावात आणखी वाढ होण्याचे जाणकारांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : कापसाचे उत्पादन कमी असल्याने भविष्यात भाववाढ होईल, या आशेने घरी भरून ठेवलेला कापूस मार्चच्या पहिल्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ५ हजार ३०० रुपयांत विकला. ८ मार्चपासून कापसाच्या भावात कासवगतीने का होईना पण तेजी येत आहे. तेजी येतच राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केल्याने ज्यांनी पडेल भावात कापूस विकला, त्यांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. यंदाही कापूस भावातील तेजीच्या फायद्यापासून कापूस उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहे.जगातील सर्वच कापूस उत्पादक देशात यंदा कापसाचे उत्पन्न कमी झाले. त्यामुळे कापसाचे भाव वाढणार, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. सुरुवातीलाच सहा हजारांपर्यंत भाव मिळाल्याने भाववाढ होणार या विचाराला दृष्टी मिळाली होती. सुरुवातीला गरजूंनी आपला कापूस विकून चांगल्या भावाचा फायदा घेतला असला तरी भविष्यात भाववाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस न विकता घरी साठवून ठेवला. १५ डिसेंबर २०१८ पासून ७ मार्च २०१९ पर्यंत कापसाचे भाव प्रतिक्विंटल ५ हजार ६०० पासून ५ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आले. साठविलेल्या कापसामुळे घरी वापर अडचणीचा झाला.कापसातील बोंडअळीच्या स्पर्शामुळे त्वचारोगांनी तोंड वर काढले. कित्येकांंना खाजेची लागण झाली. आर्थिक गरजेतून कापूस विकण्याची वेळ आली. दरम्यान, भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या गेलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानला होणारी निर्यात थांबल्याने भाव घसरणार, अशी सोईस्कर अफवा पसरविण्यात आली.मार्चमध्ये तापमानवाढीमुळे कापूस घरी साठवून ठेवणे धोक्याचे असते. या सारख्या कारणांसह आता कापूस भाव वाढण्यापेक्षा पुढे कमीच होतील, अशी चर्चा व्यापाऱ्यांकरवी सातत्याने समाजात पसरविल्याने घरी साठवून ठेवलेला ७० टक्के कापूस उत्पादकांनी आपला कापूस ५ हजार ३०० रुपये इतक्या पडेल भावाने विकला. दरवर्षी १५ मार्चपर्यंत ३०० लाख कापूस गाठी बांधता येईल. एवढा कापूस खरेदी होत असे, यंदा मात्र १५ मार्चपर्यंत २३० लाख गाठी बांधता येईल एवढाच कापूस खरेदी होणार आहे.आता १० टक्केही कापूस शेतकऱ्यांजवळ विक्रीसाठी शिल्लक नाही. यावरून भविष्यात कापसाला ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळेल, हा अंदाज खरा ठरणार याबाबत पुष्टी मिळते. असे झाले तर थोडे थांबलो असतो तर फायदा झाला असता, असे म्हणून कपाळावर हात मारून घेण्याची वेळ खऱ्या कापूस उत्पादक शेतकºयांवर येणार व खासगी व्यापाऱ्यांचे चांगभले होणार, यात शंका नाही...तर व्यापाऱ्यांचेही होणार चांगभलेअनेकांनी कापूस विकल्यानंतर आता ७ मार्चपासून कापसाच्या भावात तेजी येऊन भाव ५ हजार ५०० ते ५ हजार ६०० रुपयांपर्यंत चढले आहे. ही भाववाढ संथ असली तरी जाणकारांच्या मते यापुढे भाव वाढतच राहील व ते ६ हजारांपर्यंतही जाऊ शकतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. यात व्यापाऱ्यांचीही चांदी होणार, हे मात्र खरे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी