शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून नोंदवता येणार पीक पेरा; शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी धरली जाणार ग्राह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:38 IST

Wardha : ॲपमध्ये केलाय बदल १५ जानेवारीपर्यंत नोंदविता येणार रब्बीतील पिकांचे क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य शासनाने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही पीक पेऱ्याची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाऊन स्मार्टफोनच्या माध्यमातून पीक पेरा नोंदवायचा आहे.

यासाठी १ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दीड महिन्यांमध्ये रब्बी हंगामात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमी केंद्रावर पिकांची विक्री करताना ऑनलाइन झालेली नोंदणीच ग्राह्य धरली जाणार आहे. याशिवाय अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली अथवा इतर नुकसान झाले तर ऑनलाइन पद्धतीने नोंदविले गेलेले क्षेत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पूर्वी तलाठ्यांकडून पीक पेन्ऱ्यांची नोंदणी होत होती.

तलाठ्यांनी केलेली नोंद अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडली. यामुळे राज्य शासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच पीकपेरा नोंदविण्यासाठी संमती दिली आहे. ही नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. यानुसारच शेतकऱ्यांना मदतही दिली जाते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही अपडेट व्हावे लागेल. 

तर मिळणार नाही नुकसान भरपाई ऑनलाइन पीक पेरा नोंदविला नसल्यास नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना मदत न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे पौक पेरा नोंदविणे गरजेचे आहे.

५० मीटरवरूनही काढता येणार फोटो पूर्वीच्या ॲपमध्ये शेतामध्ये असतानाही आपण २०० मीटरपेक्षा दूर आहात असा मेसेज येत होता. यात सुधारणा आल्याने शेतातील ५० मीटर अंतरावरील फोटो घेता येणार आहे.

बांधावरची झाडेही नोंदवता येणार 

  • पूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये धुऱ्यावरील असलेले झाडे नोंदविली जात नव्हती, अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतशिवारात धुयावर वृक्ष लावले आहेत. याची नोंद आता घेतली जाणार आहे.
  • यामुळे नैसर्गिक आपत्ती काळात फळझाडांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना त्याची मदत मिळणार आहे. बांधावरील झाडे नोंदविली गेल्याने शेतामध्ये वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

नोंदणी अत्यंत आवश्यक"शेतीच्या विविध योजना राबविताना अद्ययावत प्रणालीचा वापर होत आहे. रब्बीची पेरणी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी शेतशिवारात ऑनलाइन पद्धतीने पीक पेऱ्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. खरिपाप्रमाणे रब्बीतही अशी नोंदणी करून आपले पीक शासन दरबारी नोंदविता येणार आहे. ही नोंद नुकसानीच्यावेळी ग्राह्य असेल."  - संदीप पुंडेकर, तहसीलदार, वर्धा

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा