शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून नोंदवता येणार पीक पेरा; शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी धरली जाणार ग्राह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:38 IST

Wardha : ॲपमध्ये केलाय बदल १५ जानेवारीपर्यंत नोंदविता येणार रब्बीतील पिकांचे क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य शासनाने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही पीक पेऱ्याची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाऊन स्मार्टफोनच्या माध्यमातून पीक पेरा नोंदवायचा आहे.

यासाठी १ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दीड महिन्यांमध्ये रब्बी हंगामात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमी केंद्रावर पिकांची विक्री करताना ऑनलाइन झालेली नोंदणीच ग्राह्य धरली जाणार आहे. याशिवाय अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली अथवा इतर नुकसान झाले तर ऑनलाइन पद्धतीने नोंदविले गेलेले क्षेत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पूर्वी तलाठ्यांकडून पीक पेन्ऱ्यांची नोंदणी होत होती.

तलाठ्यांनी केलेली नोंद अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडली. यामुळे राज्य शासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच पीकपेरा नोंदविण्यासाठी संमती दिली आहे. ही नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. यानुसारच शेतकऱ्यांना मदतही दिली जाते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही अपडेट व्हावे लागेल. 

तर मिळणार नाही नुकसान भरपाई ऑनलाइन पीक पेरा नोंदविला नसल्यास नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना मदत न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे पौक पेरा नोंदविणे गरजेचे आहे.

५० मीटरवरूनही काढता येणार फोटो पूर्वीच्या ॲपमध्ये शेतामध्ये असतानाही आपण २०० मीटरपेक्षा दूर आहात असा मेसेज येत होता. यात सुधारणा आल्याने शेतातील ५० मीटर अंतरावरील फोटो घेता येणार आहे.

बांधावरची झाडेही नोंदवता येणार 

  • पूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये धुऱ्यावरील असलेले झाडे नोंदविली जात नव्हती, अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतशिवारात धुयावर वृक्ष लावले आहेत. याची नोंद आता घेतली जाणार आहे.
  • यामुळे नैसर्गिक आपत्ती काळात फळझाडांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना त्याची मदत मिळणार आहे. बांधावरील झाडे नोंदविली गेल्याने शेतामध्ये वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

नोंदणी अत्यंत आवश्यक"शेतीच्या विविध योजना राबविताना अद्ययावत प्रणालीचा वापर होत आहे. रब्बीची पेरणी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी शेतशिवारात ऑनलाइन पद्धतीने पीक पेऱ्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. खरिपाप्रमाणे रब्बीतही अशी नोंदणी करून आपले पीक शासन दरबारी नोंदविता येणार आहे. ही नोंद नुकसानीच्यावेळी ग्राह्य असेल."  - संदीप पुंडेकर, तहसीलदार, वर्धा

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा