शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून नोंदवता येणार पीक पेरा; शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी धरली जाणार ग्राह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:38 IST

Wardha : ॲपमध्ये केलाय बदल १५ जानेवारीपर्यंत नोंदविता येणार रब्बीतील पिकांचे क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : राज्य शासनाने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही पीक पेऱ्याची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाऊन स्मार्टफोनच्या माध्यमातून पीक पेरा नोंदवायचा आहे.

यासाठी १ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दीड महिन्यांमध्ये रब्बी हंगामात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमी केंद्रावर पिकांची विक्री करताना ऑनलाइन झालेली नोंदणीच ग्राह्य धरली जाणार आहे. याशिवाय अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली अथवा इतर नुकसान झाले तर ऑनलाइन पद्धतीने नोंदविले गेलेले क्षेत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पूर्वी तलाठ्यांकडून पीक पेन्ऱ्यांची नोंदणी होत होती.

तलाठ्यांनी केलेली नोंद अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडली. यामुळे राज्य शासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच पीकपेरा नोंदविण्यासाठी संमती दिली आहे. ही नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. यानुसारच शेतकऱ्यांना मदतही दिली जाते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही अपडेट व्हावे लागेल. 

तर मिळणार नाही नुकसान भरपाई ऑनलाइन पीक पेरा नोंदविला नसल्यास नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना मदत न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे पौक पेरा नोंदविणे गरजेचे आहे.

५० मीटरवरूनही काढता येणार फोटो पूर्वीच्या ॲपमध्ये शेतामध्ये असतानाही आपण २०० मीटरपेक्षा दूर आहात असा मेसेज येत होता. यात सुधारणा आल्याने शेतातील ५० मीटर अंतरावरील फोटो घेता येणार आहे.

बांधावरची झाडेही नोंदवता येणार 

  • पूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये धुऱ्यावरील असलेले झाडे नोंदविली जात नव्हती, अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतशिवारात धुयावर वृक्ष लावले आहेत. याची नोंद आता घेतली जाणार आहे.
  • यामुळे नैसर्गिक आपत्ती काळात फळझाडांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना त्याची मदत मिळणार आहे. बांधावरील झाडे नोंदविली गेल्याने शेतामध्ये वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

नोंदणी अत्यंत आवश्यक"शेतीच्या विविध योजना राबविताना अद्ययावत प्रणालीचा वापर होत आहे. रब्बीची पेरणी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी शेतशिवारात ऑनलाइन पद्धतीने पीक पेऱ्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. खरिपाप्रमाणे रब्बीतही अशी नोंदणी करून आपले पीक शासन दरबारी नोंदविता येणार आहे. ही नोंद नुकसानीच्यावेळी ग्राह्य असेल."  - संदीप पुंडेकर, तहसीलदार, वर्धा

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा