शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच

By admin | Updated: February 4, 2015 23:20 IST

नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित पीक विम्यासाठी अद्यापही पायपीट करावी लागत आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी

वर्धा : नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित पीक विम्यासाठी अद्यापही पायपीट करावी लागत आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी प्रवीण ठाकरे हे वर्षभरापासून धडपत आहे. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत अनास्था दाखविली जात आहे. जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा योजना गेल्या वर्षीच्या हंगामापासून सुरू झाली. गेल्या वर्षीचे नैसर्गिक संकट व पुन्हा या वर्षीच्या हंगामातील भर लक्षात घेता अनेक शेतकरी विम्याचा लाभ मिळावा, या अपेक्षेत आहे. परंतु प्रशासनातील तकलादू भूमिकेमुळे बहुतांश शेतकऱ्यांची पायपीट सुरूच आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी प्रवीण ठाकरे यांच्याकडे चार खातेदार मिळून वायफड शिवारात २१ एकर जमीन आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाची पेरणी केली. त्यावेळी संपूर्ण कापूस पिकाचा विमा उतरविला. हप्त्याची १३ हजार ५०० रूपये रक्कम संबंधितांकडे भरून पावतीसुध्दा मिळविली. परंतु नैसर्गिक संकटामुळे पिकांची वाट लागली. यामुळे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी संबंधितांकडे अर्ज दाखल केला. परंतु त्यांना अद्यापही न्याय देण्यात आला नाही. त्यांनी न्यायालयातसुध्दा विम्याच्या रकमेसाठी दाद मागितली. न्यायालयाने पीक विम्याचा २ लाख रूपयांचा दावा मंजूर केला. परंतु त्यातील पूर्णत: रक्कम देण्यात आली नाही. यासाठी त्यांची अद्यापही पायपीट सुरू आहे. न्याय न मिळाल्याने सदर शेतकऱ्याने लोकशाही दिनात अर्ज दाखल केला होता. शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी विविध योजना दिल्या जातात. परंतु त्याची प्रत्यक्षरीत्या अंमलबजावणी केली जात नाही. हवामान आधारित पीक विमा योजना हे याचेच एक मूर्तीमंत उदाहरण आहे. अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा उतरवूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)