शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच

By admin | Updated: February 4, 2015 23:20 IST

नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित पीक विम्यासाठी अद्यापही पायपीट करावी लागत आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी

वर्धा : नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित पीक विम्यासाठी अद्यापही पायपीट करावी लागत आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी प्रवीण ठाकरे हे वर्षभरापासून धडपत आहे. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत अनास्था दाखविली जात आहे. जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा योजना गेल्या वर्षीच्या हंगामापासून सुरू झाली. गेल्या वर्षीचे नैसर्गिक संकट व पुन्हा या वर्षीच्या हंगामातील भर लक्षात घेता अनेक शेतकरी विम्याचा लाभ मिळावा, या अपेक्षेत आहे. परंतु प्रशासनातील तकलादू भूमिकेमुळे बहुतांश शेतकऱ्यांची पायपीट सुरूच आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी प्रवीण ठाकरे यांच्याकडे चार खातेदार मिळून वायफड शिवारात २१ एकर जमीन आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाची पेरणी केली. त्यावेळी संपूर्ण कापूस पिकाचा विमा उतरविला. हप्त्याची १३ हजार ५०० रूपये रक्कम संबंधितांकडे भरून पावतीसुध्दा मिळविली. परंतु नैसर्गिक संकटामुळे पिकांची वाट लागली. यामुळे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी संबंधितांकडे अर्ज दाखल केला. परंतु त्यांना अद्यापही न्याय देण्यात आला नाही. त्यांनी न्यायालयातसुध्दा विम्याच्या रकमेसाठी दाद मागितली. न्यायालयाने पीक विम्याचा २ लाख रूपयांचा दावा मंजूर केला. परंतु त्यातील पूर्णत: रक्कम देण्यात आली नाही. यासाठी त्यांची अद्यापही पायपीट सुरू आहे. न्याय न मिळाल्याने सदर शेतकऱ्याने लोकशाही दिनात अर्ज दाखल केला होता. शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी विविध योजना दिल्या जातात. परंतु त्याची प्रत्यक्षरीत्या अंमलबजावणी केली जात नाही. हवामान आधारित पीक विमा योजना हे याचेच एक मूर्तीमंत उदाहरण आहे. अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा उतरवूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)