शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे. कुणीही अधिकारी चौकशीसाठी शेतशिवाराकडे फिरकले नाहूीत. यामुळे शेतकरीवर्गात असंतोष व्यक्त होत आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी बारीक पडली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : सोयाबीनने दिला दगा, शेतकरी चिंताग्रस्त, कपाशीला अज्ञात रोगाची लागण

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : २७ आॅक्टोबरला झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपले. सोयाबीन, पºहाटी, झेंडू पिकासह बागायदार शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप तालुक्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकरी धास्तावलेले आहेत.परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे. कुणीही अधिकारी चौकशीसाठी शेतशिवाराकडे फिरकले नाहूीत. यामुळे शेतकरीवर्गात असंतोष व्यक्त होत आहे.सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी बारीक पडली आहे. उत्पादनात कधी नव्हे इतकी घट झाली आहे. त्यातच शेतमालाला दिल्या जाणाऱ्या अल्पभावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन कवडीमोल भावात विकले जात आहे. पांढºया सोन्यावर अज्ञात रोगाचे सावट असून पऱ्हाटी कापूस येण्यापूर्वीच पिवळी पडू लागली आहे.कपाशीच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. या भागात अद्याप शेतकऱ्यांनी शीतदहीसुद्धा केले नाही. तालुक्यातील महत्त्वाचे असलेले संत्रा पीकसुद्धा धोक्यात आले आहे. ढगाळ हवामानामुळे संत्रा पिकाला गळती लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात शेतकरी संत्रा बागांची तयारी करतात. शेतकऱ्यांची बेगणी बांधणे, आळे करणे ही कामे सुरू असतात. परंतु जमिनीमध्ये एवढा ओलावा आहे की, शेतामध्ये वखरण, कल्टीव्हेटर काहीही करता येत नाही. त्यामुळे वाढलेले तण काढणे सुध्दा शक्य नाही. परिणामी, शेतात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रा फळाला गळती लागली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत.शेतामध्ये असलेल्या ओलाव्यामुळे रब्बी हंगामपूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली नाही. ाालुक्यात सध्या वाघाची दहशत असून दररोज कुठे ना कुठे घटना घडत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जायलासुद्धा तयार नाहीत. अशा अनेक अस्मानी संकटांनी शेतकरी त्रस्त असताना शासन स्तरावरून कोणतीही मदत मिळालेली नाही. शासकीय यंत्रणेने अद्याप नुकसानाची साधी चौकशीसुद्धा केलेली नाही.तीन वर्षांच्या नापिकीनंतर यंदाही अतिवृष्टीने नुकसानतीन-चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाचे विलंबाने आगमन झाले. त्यानंतर मात्र, दीड महिना पावसात सातत्य राहिल्याने पिके बहरली. अतिवृष्टी झाल्याने शेतांमध्ये पाणी साचून पिके पाण्याखाली येत पिवळी पडली. अनेक रोगांनीही आक्रमण केल्याने यावेळीही सोयाबीन, कपाशीचे उत्पादनात घट येईल, अशी सद्यस्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी