शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे. कुणीही अधिकारी चौकशीसाठी शेतशिवाराकडे फिरकले नाहूीत. यामुळे शेतकरीवर्गात असंतोष व्यक्त होत आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी बारीक पडली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : सोयाबीनने दिला दगा, शेतकरी चिंताग्रस्त, कपाशीला अज्ञात रोगाची लागण

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : २७ आॅक्टोबरला झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपले. सोयाबीन, पºहाटी, झेंडू पिकासह बागायदार शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप तालुक्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकरी धास्तावलेले आहेत.परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे. कुणीही अधिकारी चौकशीसाठी शेतशिवाराकडे फिरकले नाहूीत. यामुळे शेतकरीवर्गात असंतोष व्यक्त होत आहे.सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी बारीक पडली आहे. उत्पादनात कधी नव्हे इतकी घट झाली आहे. त्यातच शेतमालाला दिल्या जाणाऱ्या अल्पभावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन कवडीमोल भावात विकले जात आहे. पांढºया सोन्यावर अज्ञात रोगाचे सावट असून पऱ्हाटी कापूस येण्यापूर्वीच पिवळी पडू लागली आहे.कपाशीच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. या भागात अद्याप शेतकऱ्यांनी शीतदहीसुद्धा केले नाही. तालुक्यातील महत्त्वाचे असलेले संत्रा पीकसुद्धा धोक्यात आले आहे. ढगाळ हवामानामुळे संत्रा पिकाला गळती लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात शेतकरी संत्रा बागांची तयारी करतात. शेतकऱ्यांची बेगणी बांधणे, आळे करणे ही कामे सुरू असतात. परंतु जमिनीमध्ये एवढा ओलावा आहे की, शेतामध्ये वखरण, कल्टीव्हेटर काहीही करता येत नाही. त्यामुळे वाढलेले तण काढणे सुध्दा शक्य नाही. परिणामी, शेतात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रा फळाला गळती लागली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत.शेतामध्ये असलेल्या ओलाव्यामुळे रब्बी हंगामपूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली नाही. ाालुक्यात सध्या वाघाची दहशत असून दररोज कुठे ना कुठे घटना घडत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जायलासुद्धा तयार नाहीत. अशा अनेक अस्मानी संकटांनी शेतकरी त्रस्त असताना शासन स्तरावरून कोणतीही मदत मिळालेली नाही. शासकीय यंत्रणेने अद्याप नुकसानाची साधी चौकशीसुद्धा केलेली नाही.तीन वर्षांच्या नापिकीनंतर यंदाही अतिवृष्टीने नुकसानतीन-चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाचे विलंबाने आगमन झाले. त्यानंतर मात्र, दीड महिना पावसात सातत्य राहिल्याने पिके बहरली. अतिवृष्टी झाल्याने शेतांमध्ये पाणी साचून पिके पाण्याखाली येत पिवळी पडली. अनेक रोगांनीही आक्रमण केल्याने यावेळीही सोयाबीन, कपाशीचे उत्पादनात घट येईल, अशी सद्यस्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी