शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करून खतांचे नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:17 IST

मृद आरोग्य परिक्षणावर या देशाचे प्रधामंत्री स्वत: शेतकऱ्यांशी संवाद साधतात ही बाब शेतकाऱ्यांकडे शासनाचे लक्ष आहे हे अधोरेखीत करते.

ठळक मुद्देतडस : १९ हजार शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण

आॅनलाईन लोकमतवर्धा : मृद आरोग्य परिक्षणावर या देशाचे प्रधामंत्री स्वत: शेतकऱ्यांशी संवाद साधतात ही बाब शेतकाऱ्यांकडे शासनाचे लक्ष आहे हे अधोरेखीत करते. यापूर्वी कधीही मातीचे परीक्षण करण्यात आले नाही. या शासनाने ही योजना सुरू करून शेतकºयांच्या जमिनीची पोत सुधारण्यासाठी केलेला हा यशस्वी प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करून घेत शेतीला आवश्यक मुलद्रव्याचा आहार पुरवावा आणि भरघोस उत्पन्न घ्यावे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व मृदा दिनानिमत्त शेतकारी मेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खा. रामदास तडस मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, देवळीच्या नगराध्यक्षा सुचिता मडावी, पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रशांत उंबरकर, उपसंचालक जी. आर. कापसे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, तालुका कृषी अधिकारी सांगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.खासदार तडस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीला वेळीच पाणी आणि शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकरी स्वत:च्या परिश्रमाने शेतीतून सोन पिकवू शकतो. विदर्भातील सिंचनाचे ३० वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. निम्न वर्धा प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी ७०० कोटी, शेतकºयांना आज मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्याचा कार्यक्रम देशपातळीवर एकाचवेळी राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर झाला आहे. हा प्रश्न येत्या लोकसभेच्या अधिवेशनात आपण मांडू असे आश्वासन देत शेतकºयांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंद्याची साथ दिली पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शेतकºयांनी आधुनिक शेतीसोबतच जैविक शेतीची कास धरावी. शेतीला जोडधंदा आणि फवारणी किटचा वापर करावा, असे आवाहन कृषी सभापती मुकेश भिसे यांनी याप्रसंगी केले.शासन शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षण करून देते. यासाठी प्रत्येक परीक्षणाला शासनाला ३०० रूपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे. जमिनीत काय आहे आणि कोणत्या घटकांची आवश्यकता आहे याचे गणित या आरोग्य पत्रिकेत दिलेले असते. शेतकºयांनी त्याप्रमाणे खतांचा वापर करून उत्पादनात वाढ करून द्यावी. उत्पादन खर्च कमी करणे हे शेतकऱ्यांचे धोरण असल पाहिजे. त्यासाठी शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. घरगुती बियाणे, सेंद्रिय व जैविक खते आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करून शेतकºयांनी उत्पादन खर्च कमी करावा असे आवाहन यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले. लोणी येथील शेतकरी पेठकर यांनी यावेळी सेंद्रिय शेतीचे फायदे सांगितले. यावेळी माती परीक्षण अधिकारी रश्मी जोशी, डॉ. रूपेश झाडोदे, डॉ. धनराज चौधरी यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात शेतकºयांना मृत आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात एकाचवेळी १९ हजार मृद आरोग्य पत्रिकेचे ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन वाटप करण्यात आले. तसेच प्रगतीशील शेतकरी रूपाली पाटील व सुपारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुरूवातीला मान्यवरांचे हस्ते शेती उपयोगी साहित्याच्या स्टॉलची पाहणी करण्यात आली. प्रास्ताविक प्रशांत उंबरकर यांनी केले. संचालन प्रा. उज्वला शिरसाट यांनी केले.