शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करून खतांचे नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:17 IST

मृद आरोग्य परिक्षणावर या देशाचे प्रधामंत्री स्वत: शेतकऱ्यांशी संवाद साधतात ही बाब शेतकाऱ्यांकडे शासनाचे लक्ष आहे हे अधोरेखीत करते.

ठळक मुद्देतडस : १९ हजार शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण

आॅनलाईन लोकमतवर्धा : मृद आरोग्य परिक्षणावर या देशाचे प्रधामंत्री स्वत: शेतकऱ्यांशी संवाद साधतात ही बाब शेतकाऱ्यांकडे शासनाचे लक्ष आहे हे अधोरेखीत करते. यापूर्वी कधीही मातीचे परीक्षण करण्यात आले नाही. या शासनाने ही योजना सुरू करून शेतकºयांच्या जमिनीची पोत सुधारण्यासाठी केलेला हा यशस्वी प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करून घेत शेतीला आवश्यक मुलद्रव्याचा आहार पुरवावा आणि भरघोस उत्पन्न घ्यावे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व मृदा दिनानिमत्त शेतकारी मेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खा. रामदास तडस मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, देवळीच्या नगराध्यक्षा सुचिता मडावी, पंचायत समिती सभापती विद्या भुजाडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रशांत उंबरकर, उपसंचालक जी. आर. कापसे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, तालुका कृषी अधिकारी सांगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.खासदार तडस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीला वेळीच पाणी आणि शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकरी स्वत:च्या परिश्रमाने शेतीतून सोन पिकवू शकतो. विदर्भातील सिंचनाचे ३० वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत. निम्न वर्धा प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी ७०० कोटी, शेतकºयांना आज मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्याचा कार्यक्रम देशपातळीवर एकाचवेळी राबविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव ८० ते ८५ टक्के क्षेत्रावर झाला आहे. हा प्रश्न येत्या लोकसभेच्या अधिवेशनात आपण मांडू असे आश्वासन देत शेतकºयांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंद्याची साथ दिली पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.शेतकºयांनी आधुनिक शेतीसोबतच जैविक शेतीची कास धरावी. शेतीला जोडधंदा आणि फवारणी किटचा वापर करावा, असे आवाहन कृषी सभापती मुकेश भिसे यांनी याप्रसंगी केले.शासन शेतकऱ्यांना मोफत माती परीक्षण करून देते. यासाठी प्रत्येक परीक्षणाला शासनाला ३०० रूपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन शेतातील मातीचे परीक्षण करून घ्यावे. जमिनीत काय आहे आणि कोणत्या घटकांची आवश्यकता आहे याचे गणित या आरोग्य पत्रिकेत दिलेले असते. शेतकºयांनी त्याप्रमाणे खतांचा वापर करून उत्पादनात वाढ करून द्यावी. उत्पादन खर्च कमी करणे हे शेतकऱ्यांचे धोरण असल पाहिजे. त्यासाठी शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. घरगुती बियाणे, सेंद्रिय व जैविक खते आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करून शेतकºयांनी उत्पादन खर्च कमी करावा असे आवाहन यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले. लोणी येथील शेतकरी पेठकर यांनी यावेळी सेंद्रिय शेतीचे फायदे सांगितले. यावेळी माती परीक्षण अधिकारी रश्मी जोशी, डॉ. रूपेश झाडोदे, डॉ. धनराज चौधरी यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात शेतकºयांना मृत आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात एकाचवेळी १९ हजार मृद आरोग्य पत्रिकेचे ठिकठिकाणी कार्यक्रम घेऊन वाटप करण्यात आले. तसेच प्रगतीशील शेतकरी रूपाली पाटील व सुपारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुरूवातीला मान्यवरांचे हस्ते शेती उपयोगी साहित्याच्या स्टॉलची पाहणी करण्यात आली. प्रास्ताविक प्रशांत उंबरकर यांनी केले. संचालन प्रा. उज्वला शिरसाट यांनी केले.