शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल

By admin | Updated: November 15, 2015 01:31 IST

शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख होतो.

पुलगाव येथील प्रकार : असुविधांमुळे शेतमाल राहतो उघड्यावर, पिण्याच्या पाण्याचाही अभाववर्धा : शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख होतो. शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी म्हणूनच कृउबा समितीची निर्मिती झाली; पण सध्या या बाजार समित्यांमध्येच शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. पुलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. साध्या पिण्याच्या शुद्ध पाण्याचीही सोय नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात लौकिकप्राप्त आहे. या समितीचे भिडी आणि देवळी हे दोन उपबाजार आहेत. प्रशस्त आवार असलेल्या अमरावती मार्गावर समितीचे मुख्य कार्यालय असून पंचधारा रोडवरही मोठी जागा आहे. बाजार समितीचा आवार मोठा असून गोदामांची निर्मिती करण्यात आलेली आहे. कित्येक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या गोदामाची सध्या दुरवस्था झाल्याचेच दिसून येते. या गोदामाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. मुख्य कार्यालयत असलेल्या अमरावती मार्गावरील बाजार समितीच्या आवारात धान्य बाजार भरतो; पण पुरेशा सुविधा नसल्याने शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होतात. पुलगाव येथे शहर, परिसरातील ग्रामीण भाग येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीस घेऊन येतात. धान्य घेऊन येणाऱ्या या शेतकऱ्यांना शेतमालाचा वजनकाटा करण्यासाठी बराच वेळ ताटकळावे लागते. लिलाव होईपर्यंत शेतमालाचे वजनच केले जात नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना जेवणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना एकतर घरूनच जेवणाचा डबा घेऊन यावा लागतो वा शहरात पोटाची भुक शमविण्याकरिता भटकंती करावी लागते. बाजार समितीच्या आवारात पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची तहाणही भागविण्यास बाजार समिती असमर्थ असल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. बाजाराच्या आवारात कुठेही महिलांकरिता शौचालय, स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आलेली नाही. यामुळे महिला शेतकरी, मजूर वर्ग यांची गोची होते. पुलगाव बाजार समिती ही जुनी आणि जिल्ह्यात लौकिकप्राप्त आहे. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळणे अपेक्षित होते; पण संचालक मंडळ व सचिव त्याकडे लक्षच देत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी, अडत्ये, हमाल यांनाही त्रासाला सामोरे जावे लागते. स्वच्छतागृह नाही, पिण्याचे पाणी नाही, जेवणाची सोय नाही यामुळे सर्वांचेच हाल होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पुलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीन तारण योजना राबविली जात आहे. या योजनेमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेऊन येत आहेत; पण मालाचे वजन करण्याकरिता एक ते दोन दिवस लागत असल्याचे दिसते. वजन होईपर्यंत शेतकऱ्यांना आपला शेतमाल उघड्यावरच ठेवावा लागतो. शेतमाल पावसाने ओला झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तारणासाठी आलेल्या व वजनकाटा न झालेल्या शेतमालाची व्यवस्था करणे गरजेचे आहे; पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ व प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)