शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल

By admin | Updated: November 15, 2015 01:31 IST

शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख होतो.

पुलगाव येथील प्रकार : असुविधांमुळे शेतमाल राहतो उघड्यावर, पिण्याच्या पाण्याचाही अभाववर्धा : शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख होतो. शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी म्हणूनच कृउबा समितीची निर्मिती झाली; पण सध्या या बाजार समित्यांमध्येच शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. पुलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. साध्या पिण्याच्या शुद्ध पाण्याचीही सोय नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात लौकिकप्राप्त आहे. या समितीचे भिडी आणि देवळी हे दोन उपबाजार आहेत. प्रशस्त आवार असलेल्या अमरावती मार्गावर समितीचे मुख्य कार्यालय असून पंचधारा रोडवरही मोठी जागा आहे. बाजार समितीचा आवार मोठा असून गोदामांची निर्मिती करण्यात आलेली आहे. कित्येक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या गोदामाची सध्या दुरवस्था झाल्याचेच दिसून येते. या गोदामाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. मुख्य कार्यालयत असलेल्या अमरावती मार्गावरील बाजार समितीच्या आवारात धान्य बाजार भरतो; पण पुरेशा सुविधा नसल्याने शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होतात. पुलगाव येथे शहर, परिसरातील ग्रामीण भाग येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीस घेऊन येतात. धान्य घेऊन येणाऱ्या या शेतकऱ्यांना शेतमालाचा वजनकाटा करण्यासाठी बराच वेळ ताटकळावे लागते. लिलाव होईपर्यंत शेतमालाचे वजनच केले जात नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना जेवणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना एकतर घरूनच जेवणाचा डबा घेऊन यावा लागतो वा शहरात पोटाची भुक शमविण्याकरिता भटकंती करावी लागते. बाजार समितीच्या आवारात पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची तहाणही भागविण्यास बाजार समिती असमर्थ असल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे. बाजाराच्या आवारात कुठेही महिलांकरिता शौचालय, स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आलेली नाही. यामुळे महिला शेतकरी, मजूर वर्ग यांची गोची होते. पुलगाव बाजार समिती ही जुनी आणि जिल्ह्यात लौकिकप्राप्त आहे. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळणे अपेक्षित होते; पण संचालक मंडळ व सचिव त्याकडे लक्षच देत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी, अडत्ये, हमाल यांनाही त्रासाला सामोरे जावे लागते. स्वच्छतागृह नाही, पिण्याचे पाणी नाही, जेवणाची सोय नाही यामुळे सर्वांचेच हाल होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या पुलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीन तारण योजना राबविली जात आहे. या योजनेमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेऊन येत आहेत; पण मालाचे वजन करण्याकरिता एक ते दोन दिवस लागत असल्याचे दिसते. वजन होईपर्यंत शेतकऱ्यांना आपला शेतमाल उघड्यावरच ठेवावा लागतो. शेतमाल पावसाने ओला झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तारणासाठी आलेल्या व वजनकाटा न झालेल्या शेतमालाची व्यवस्था करणे गरजेचे आहे; पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ व प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)