शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

वर्धेतून फुंकला होता शेतकरी स्वातंत्र्याचा बिगूल

By admin | Updated: December 13, 2015 02:13 IST

म.गांधी व आचार्य विनोबा भावे यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी वर्धा ही आंदोलन भूमी केली होती.

आठवणीतले शरद जोशी : सरोज काशीकर यांच्याकडील अविस्मरणीय नोंदीवर्धा : म.गांधी व आचार्य विनोबा भावे यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी वर्धा ही आंदोलन भूमी केली होती. ही पार्श्वभूमी ध्यानात घेत शेतकरी नेते शरद जोशी यांनीही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी वर्धा आंदोलनाची भूमी निश्चित केली. याच भूमीतून शेतकरी संघटनेचा पाया मजबूत झाला. येथे शरद जोशी यांनी केलेल्या आंदोलनाने शासनाच्या पायाखालची वाळू सरकली. वर्धेच्या मातीशी त्यांची जुळलेली नाळ शेवटच्या श्वासापर्यंत कायम होती. त्यांच्या रूपाने शेतकरी आंदोलकांचा राजा हरपला. त्यांची आंदोलने निधनानंतरही स्मृती रूपात शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचे बळ देत राहील, अशा शब्दात शेतकरी संघटनेच्या उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष सरोज काशीकर यांनी त्यांच्या वर्धेतील आठवणींना उजाळा दिला. १९७८-८९ मध्ये विजय जावंधिया, रवी काशीकर, सुमंत पाटील, विजय काटकर, शशांक सबाने, अरुण डोंगरे, सुभाष बोकडे, रंगराव वैद्य ही मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करीत. अशातच त्यांना शरद जोशींबाबत कळले. त्यांनी जोशी यांना त्यावेळी वर्धेत आणून शेतकऱ्यांचे शिबिर घेतले. शिबिराला सुमारे शंभर शेतकरी हजर होते. त्यावेळी त्यांनी ‘भारतीय शेतीची पराधीनता’ ही पुस्तिका प्रकाशित केली. ही त्यांच्या शेतकरी आंदोलनाची पहिली लेखन पुस्तिका होती. वसंत तुपकर, लांबट ही मंडळी याची साक्षीदार होती. या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी भविष्यातील शेतकरी आंदोलनाची रूपरेषाच सांगून टाकली. आंदोलनाच्या माध्यमातून ते अनेकदा वर्धेला आले. ग्रामीण शेतकरी व त्यांच्या पत्नीची बिकट परिस्थितीशी सुरू असलेली झुंज ते स्वत: बघायचे. विश्राम भवनात ते कधीही राहिले नाही. शेतकऱ्यांच्या घरीच जे असेल ते जेवण करीत होते. ते प्रकृती चांगली असेपर्यंत कार्यकर्त्यांत राहायचे. कार्यकर्ते जेथे झोपतील, तेथेच ते आपली व्यवस्था करीत. तो आंदोलकांसोबत राहणारा आंदोलक होता. त्यांना डोंगर चढायची आवड होती. शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या त्या डोंगर चढून, आपल्याला शेतकऱ्यांची लढाई जिंकायची आहे, तेव्हा डोंगर चढता आले पाहिजे, अशी कोटी करीत ते रस्त्यात डोंगर दिसले की गाडी थांबवून चढत. प्रत्येकाची जातीने चौकशी करीत. नाश्ता कमी पडला तर ते स्वत: किचनमध्ये जात मदत करीत. त्यांना थालीपीठ व शिळ्या पोळ्यांचा कुस्कारा आवडे. चांगले दही कसे करायचे, याचे सल्लेही ते देत असत. त्यांची मुलगी गौरी सेवाग्राम येथे शिकायला होती. ती एमडी झाली. अमेरिकेत नामांकित कंपनीत क्वॉलिटी मॅनेजमेंट पदावर आहे. दुसऱ्या दिवशी आंदोलन आहे, काय होईल याची पर्वा न करता हसत खेळत असत. अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या जाण्याने शेतकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली, असे सांगताना त्या भाऊक झाल्या होत्या.