शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना लागली कापूस, सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:47 IST

अल्प दरात करावी लागतेय विक्री : लागवड खर्च निघणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाला भाव नाही. सध्या बाजारपेठेत सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार २०० रुपये दर मिळत आहे. हमी भावापेक्षा ही कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतमालाला असाच भाव मिळत राहिल्यास शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट आणखीच वाढण्याची भीती आहे. कापसाचा हमी दर ७ हजार ४२१ रुपये आहे. प्रत्यक्षात साडेसहा हजारांपर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर वाढत नसल्याने घरातच पडून आहे. सोयाबीन, कापूस आदी शेतमालाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. दर कमी असतानाही शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतमालाची विक्री करावी लागत आहे. बहुतांश शेतकऱ्यांना सावकाराचे आणि कृषी केंद्रातून घेतलेल्या साहित्याचे पैसे चुकता करायचे आहे. वेळेवर रकमा चुकता न केल्यास व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. याच कारणातून शेतकरी माल विकत आहे. आज शेतमालास जो भाव मिळत आहे. त्यातून लागवडीकरिता लागलेला खर्चही भरुन निघणे कठीण आहे. मागील दशकापासून कापूस, सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या दरात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. इतर वस्तूंच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ झाली आहे. कृषी निविष्ठा खत, बी- बियाणे आणि मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मध्यंतरी सोयाबीन, कपाशीला चांगला भाव मिळाला, मात्र त्यात सातत्य राहिले नाहीत. लगेच भाव गडगडले. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर ज्या तुलनेत वाढले, त्या प्रमाणात शेतमालाच्या दरात वाढ का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारल्या जात आहे. घरात आलेला शेतमाल बाजारात विकण्याकरिता नेण्यासाठी वाहतुकीचाही खर्च लागतो. या खर्चातही यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कामासाठी मजुरीही उपलब्ध होत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहे. 

नाफेडने सोयाबीनची खरेदी करावी सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने नाफेड मार्फत खरेदी सुरु करावी. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकरी विविध बाजूने अडचणीत आला आहे. होणाऱ्या पिळव- णुकीमुळे शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे. त्यामुळे नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी करण्याची मागणी होत आहे.

दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे माल नसतो शेतमालाचे दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे शेतमाल नसतो हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. काही वेळा प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना घेता आला नाही. व्यापाऱ्यांनाच या मोठा फायदा होत गेला आहे. उत्पादन खर्च वाढत जातो. विविध साहित्याच्या किमती, मजुरीच्या वाढत्या दराचा फटका शेतकऱ्यांना बसतो. परंतु वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाही.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसSoybeanसोयाबीनfarmingशेतीwardha-acवर्धा