शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

शेतकऱ्यांना लागली कापूस, सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:47 IST

अल्प दरात करावी लागतेय विक्री : लागवड खर्च निघणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाला भाव नाही. सध्या बाजारपेठेत सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार २०० रुपये दर मिळत आहे. हमी भावापेक्षा ही कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतमालाला असाच भाव मिळत राहिल्यास शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट आणखीच वाढण्याची भीती आहे. कापसाचा हमी दर ७ हजार ४२१ रुपये आहे. प्रत्यक्षात साडेसहा हजारांपर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर वाढत नसल्याने घरातच पडून आहे. सोयाबीन, कापूस आदी शेतमालाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. दर कमी असतानाही शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतमालाची विक्री करावी लागत आहे. बहुतांश शेतकऱ्यांना सावकाराचे आणि कृषी केंद्रातून घेतलेल्या साहित्याचे पैसे चुकता करायचे आहे. वेळेवर रकमा चुकता न केल्यास व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. याच कारणातून शेतकरी माल विकत आहे. आज शेतमालास जो भाव मिळत आहे. त्यातून लागवडीकरिता लागलेला खर्चही भरुन निघणे कठीण आहे. मागील दशकापासून कापूस, सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या दरात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. इतर वस्तूंच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ झाली आहे. कृषी निविष्ठा खत, बी- बियाणे आणि मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मध्यंतरी सोयाबीन, कपाशीला चांगला भाव मिळाला, मात्र त्यात सातत्य राहिले नाहीत. लगेच भाव गडगडले. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर ज्या तुलनेत वाढले, त्या प्रमाणात शेतमालाच्या दरात वाढ का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारल्या जात आहे. घरात आलेला शेतमाल बाजारात विकण्याकरिता नेण्यासाठी वाहतुकीचाही खर्च लागतो. या खर्चातही यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कामासाठी मजुरीही उपलब्ध होत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहे. 

नाफेडने सोयाबीनची खरेदी करावी सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने नाफेड मार्फत खरेदी सुरु करावी. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकरी विविध बाजूने अडचणीत आला आहे. होणाऱ्या पिळव- णुकीमुळे शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे. त्यामुळे नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी करण्याची मागणी होत आहे.

दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे माल नसतो शेतमालाचे दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे शेतमाल नसतो हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. काही वेळा प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना घेता आला नाही. व्यापाऱ्यांनाच या मोठा फायदा होत गेला आहे. उत्पादन खर्च वाढत जातो. विविध साहित्याच्या किमती, मजुरीच्या वाढत्या दराचा फटका शेतकऱ्यांना बसतो. परंतु वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाही.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसSoybeanसोयाबीनfarmingशेतीwardha-acवर्धा