शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शेतकऱ्यांना लागली कापूस, सोयाबीनच्या दरवाढीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:47 IST

अल्प दरात करावी लागतेय विक्री : लागवड खर्च निघणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या मालाला भाव नाही. सध्या बाजारपेठेत सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार २०० रुपये दर मिळत आहे. हमी भावापेक्षा ही कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतमालाला असाच भाव मिळत राहिल्यास शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट आणखीच वाढण्याची भीती आहे. कापसाचा हमी दर ७ हजार ४२१ रुपये आहे. प्रत्यक्षात साडेसहा हजारांपर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर वाढत नसल्याने घरातच पडून आहे. सोयाबीन, कापूस आदी शेतमालाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. दर कमी असतानाही शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतमालाची विक्री करावी लागत आहे. बहुतांश शेतकऱ्यांना सावकाराचे आणि कृषी केंद्रातून घेतलेल्या साहित्याचे पैसे चुकता करायचे आहे. वेळेवर रकमा चुकता न केल्यास व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. याच कारणातून शेतकरी माल विकत आहे. आज शेतमालास जो भाव मिळत आहे. त्यातून लागवडीकरिता लागलेला खर्चही भरुन निघणे कठीण आहे. मागील दशकापासून कापूस, सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या दरात पाहिजे त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. इतर वस्तूंच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ झाली आहे. कृषी निविष्ठा खत, बी- बियाणे आणि मजुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मध्यंतरी सोयाबीन, कपाशीला चांगला भाव मिळाला, मात्र त्यात सातत्य राहिले नाहीत. लगेच भाव गडगडले. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर ज्या तुलनेत वाढले, त्या प्रमाणात शेतमालाच्या दरात वाढ का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारल्या जात आहे. घरात आलेला शेतमाल बाजारात विकण्याकरिता नेण्यासाठी वाहतुकीचाही खर्च लागतो. या खर्चातही यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय परिसरात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असल्यानेही शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती कामासाठी मजुरीही उपलब्ध होत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहे. 

नाफेडने सोयाबीनची खरेदी करावी सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने नाफेड मार्फत खरेदी सुरु करावी. सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकरी विविध बाजूने अडचणीत आला आहे. होणाऱ्या पिळव- णुकीमुळे शेतकरी विविध संकटांचा सामना करीत आहे. त्यामुळे नाफेडद्वारे सोयाबीनची खरेदी करण्याची मागणी होत आहे.

दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे माल नसतो शेतमालाचे दर वाढतात तेव्हा शेतकऱ्यांकडे शेतमाल नसतो हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. काही वेळा प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना घेता आला नाही. व्यापाऱ्यांनाच या मोठा फायदा होत गेला आहे. उत्पादन खर्च वाढत जातो. विविध साहित्याच्या किमती, मजुरीच्या वाढत्या दराचा फटका शेतकऱ्यांना बसतो. परंतु वाढलेल्या दराचा फायदा शेतकऱ्यांना घेता येत नाही.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसSoybeanसोयाबीनfarmingशेतीwardha-acवर्धा