शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:46 IST

पवनार येथील शेतकऱ्यांना नदीपलीकडील शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. नावेतून प्रवास करून शेती पिकवावी लागते.

ठळक मुद्देपुलाचे निर्माण : वाहितपूर-पवनार जोडणार, ६ कोटी २८ लाखांची तरतूद

ऑनलाईन लोकमतवर्धा : पवनार येथील शेतकऱ्यांना नदीपलीकडील शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. नावेतून प्रवास करून शेती पिकवावी लागते. येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा हा खडतर प्रवास आता संपुष्टात येणार आहे. आ.डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे धाम नदीवरील पुलाच्या निर्मितीसाठी शासनाने ६ कोटी २७ लक्ष ७० हजार रूपयांची तरतुद केली असून पुलाच्या बांधकामासंदर्भात लवकरच प्रक्रिया पूर्ण करणार आहे.पवनार व वाहीतपूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी धाम नदीच्या तिरावर आहेत. शेतात जाण्यासाठी त्यांना नदी ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नाही. येथील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली. मात्र या प्रश्नाकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. आ. भोयर यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केली. सरपंच अजय गांडोळे यांनीही आमदारांकडे पाठपुरावा करून या प्रश्नाचे प्रत्यक्ष विदारक रूप त्यांना दाखविले. यावर आ.भोयर यांनी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले. पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून त्यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड अंतर्गत ६ कोटी २८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धाम नदीवर पूल साकारणार असून पवनार, वाहितपूर ही दोन गावेही एकमेकांशी जोडल्या जाणार. सोबतच या दोन्ही गावांचा परिसरातील मोर्चापूर, सुकळी स्टेशन, जयपूर, कुटकी व अन्य गावांशी जवळचा संपर्क होणार आहे. आवागमन करण्याचे अंतरही कमी होणार आहे. पुलासोबतच पोचमार्गाचे कामही या अंतर्गत होणार आहे. पुलासाठी निधी मंजूर झाल्याचे पत्र आ. डॉ. भोयर यांनी सरपंच अजय गांडोळे व गावकऱ्यांना दिले. यावेळी वसंत उमाटे, अशोक भट, मुनाफ शेख, डॉ. अशोक हिवरे, चिंतामण उमाटे, गजानन गोमासे, बारसीराम मानोले, शंकर वाघमारे, माणिक सहारे व नागरिक उपस्थित होते.पुलासह पोचमार्गाची होणार निर्मितीपावसाळ्यात सुध्दा शेतकरी व शेतमजूर पीक फुलविण्यासाठी जीव मुठीत घेऊन नदीपात्रातून प्रवास करतात. नदीला पूर असल्यास शेतकऱ्यांना अनेकदा शेतात जाणेही शक्य नव्हते. जा जीवघेणा संघर्ष अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. पुलाचा बांधकामाने तो संपुष्टात येईल.सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चय केला. मागील ३० वर्षांपासून हा प्रश्न कोणीच सोडवू शकले नाही. ही समस्या मार्गी लावण्याचा चंगच बांधला. त्यासाठी आ. भोयर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. आमदारांनी हा प्रश्न सोडवूच असे वचन दिले. आज या वचनाची पुर्ती झाली.- अजय गांडोळे, सरपंच, पवनार.