शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:46 IST

पवनार येथील शेतकऱ्यांना नदीपलीकडील शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. नावेतून प्रवास करून शेती पिकवावी लागते.

ठळक मुद्देपुलाचे निर्माण : वाहितपूर-पवनार जोडणार, ६ कोटी २८ लाखांची तरतूद

ऑनलाईन लोकमतवर्धा : पवनार येथील शेतकऱ्यांना नदीपलीकडील शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. नावेतून प्रवास करून शेती पिकवावी लागते. येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा हा खडतर प्रवास आता संपुष्टात येणार आहे. आ.डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे धाम नदीवरील पुलाच्या निर्मितीसाठी शासनाने ६ कोटी २७ लक्ष ७० हजार रूपयांची तरतुद केली असून पुलाच्या बांधकामासंदर्भात लवकरच प्रक्रिया पूर्ण करणार आहे.पवनार व वाहीतपूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी धाम नदीच्या तिरावर आहेत. शेतात जाण्यासाठी त्यांना नदी ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नाही. येथील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली. मात्र या प्रश्नाकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. आ. भोयर यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केली. सरपंच अजय गांडोळे यांनीही आमदारांकडे पाठपुरावा करून या प्रश्नाचे प्रत्यक्ष विदारक रूप त्यांना दाखविले. यावर आ.भोयर यांनी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले. पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून त्यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड अंतर्गत ६ कोटी २८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धाम नदीवर पूल साकारणार असून पवनार, वाहितपूर ही दोन गावेही एकमेकांशी जोडल्या जाणार. सोबतच या दोन्ही गावांचा परिसरातील मोर्चापूर, सुकळी स्टेशन, जयपूर, कुटकी व अन्य गावांशी जवळचा संपर्क होणार आहे. आवागमन करण्याचे अंतरही कमी होणार आहे. पुलासोबतच पोचमार्गाचे कामही या अंतर्गत होणार आहे. पुलासाठी निधी मंजूर झाल्याचे पत्र आ. डॉ. भोयर यांनी सरपंच अजय गांडोळे व गावकऱ्यांना दिले. यावेळी वसंत उमाटे, अशोक भट, मुनाफ शेख, डॉ. अशोक हिवरे, चिंतामण उमाटे, गजानन गोमासे, बारसीराम मानोले, शंकर वाघमारे, माणिक सहारे व नागरिक उपस्थित होते.पुलासह पोचमार्गाची होणार निर्मितीपावसाळ्यात सुध्दा शेतकरी व शेतमजूर पीक फुलविण्यासाठी जीव मुठीत घेऊन नदीपात्रातून प्रवास करतात. नदीला पूर असल्यास शेतकऱ्यांना अनेकदा शेतात जाणेही शक्य नव्हते. जा जीवघेणा संघर्ष अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. पुलाचा बांधकामाने तो संपुष्टात येईल.सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चय केला. मागील ३० वर्षांपासून हा प्रश्न कोणीच सोडवू शकले नाही. ही समस्या मार्गी लावण्याचा चंगच बांधला. त्यासाठी आ. भोयर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. आमदारांनी हा प्रश्न सोडवूच असे वचन दिले. आज या वचनाची पुर्ती झाली.- अजय गांडोळे, सरपंच, पवनार.