शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:46 IST

पवनार येथील शेतकऱ्यांना नदीपलीकडील शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. नावेतून प्रवास करून शेती पिकवावी लागते.

ठळक मुद्देपुलाचे निर्माण : वाहितपूर-पवनार जोडणार, ६ कोटी २८ लाखांची तरतूद

ऑनलाईन लोकमतवर्धा : पवनार येथील शेतकऱ्यांना नदीपलीकडील शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. नावेतून प्रवास करून शेती पिकवावी लागते. येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांचा हा खडतर प्रवास आता संपुष्टात येणार आहे. आ.डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे धाम नदीवरील पुलाच्या निर्मितीसाठी शासनाने ६ कोटी २७ लक्ष ७० हजार रूपयांची तरतुद केली असून पुलाच्या बांधकामासंदर्भात लवकरच प्रक्रिया पूर्ण करणार आहे.पवनार व वाहीतपूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी धाम नदीच्या तिरावर आहेत. शेतात जाण्यासाठी त्यांना नदी ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नाही. येथील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली. मात्र या प्रश्नाकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. आ. भोयर यांच्याकडे शेतकऱ्यांनी मागणी केली. सरपंच अजय गांडोळे यांनीही आमदारांकडे पाठपुरावा करून या प्रश्नाचे प्रत्यक्ष विदारक रूप त्यांना दाखविले. यावर आ.भोयर यांनी हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले. पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून त्यांनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड अंतर्गत ६ कोटी २८ लक्ष रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून धाम नदीवर पूल साकारणार असून पवनार, वाहितपूर ही दोन गावेही एकमेकांशी जोडल्या जाणार. सोबतच या दोन्ही गावांचा परिसरातील मोर्चापूर, सुकळी स्टेशन, जयपूर, कुटकी व अन्य गावांशी जवळचा संपर्क होणार आहे. आवागमन करण्याचे अंतरही कमी होणार आहे. पुलासोबतच पोचमार्गाचे कामही या अंतर्गत होणार आहे. पुलासाठी निधी मंजूर झाल्याचे पत्र आ. डॉ. भोयर यांनी सरपंच अजय गांडोळे व गावकऱ्यांना दिले. यावेळी वसंत उमाटे, अशोक भट, मुनाफ शेख, डॉ. अशोक हिवरे, चिंतामण उमाटे, गजानन गोमासे, बारसीराम मानोले, शंकर वाघमारे, माणिक सहारे व नागरिक उपस्थित होते.पुलासह पोचमार्गाची होणार निर्मितीपावसाळ्यात सुध्दा शेतकरी व शेतमजूर पीक फुलविण्यासाठी जीव मुठीत घेऊन नदीपात्रातून प्रवास करतात. नदीला पूर असल्यास शेतकऱ्यांना अनेकदा शेतात जाणेही शक्य नव्हते. जा जीवघेणा संघर्ष अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. पुलाचा बांधकामाने तो संपुष्टात येईल.सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चय केला. मागील ३० वर्षांपासून हा प्रश्न कोणीच सोडवू शकले नाही. ही समस्या मार्गी लावण्याचा चंगच बांधला. त्यासाठी आ. भोयर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. आमदारांनी हा प्रश्न सोडवूच असे वचन दिले. आज या वचनाची पुर्ती झाली.- अजय गांडोळे, सरपंच, पवनार.