शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची मशागत पोहोचली अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:16 IST

रोहिणी नक्षत्राचा मुहूत २५ मे पासून आहे. यानंतर ७ जुनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. पावसाच्या सरी जमिनीवर पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपण्यात येत आहे. मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग आला असला तरी उन्हाच्या झळा शेतकºयांना सहन कराव्या लागत आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : मान्सून लांबल्याने शेतीकामाकरिता मिळाला आणखी काही काळ

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : रोहिणी नक्षत्राचा मुहूत २५ मे पासून आहे. यानंतर ७ जुनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. पावसाच्या सरी जमिनीवर पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपण्यात येत आहे. मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग आला असला तरी उन्हाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून पहाटेच्या सुमारासच कामे होत असल्याचे दिसून आले आहे.गत वर्षी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकात घट झाली. शिवाय वेचणीचा खर्च वाढुनही कापसाचे दर शेवटपर्यंत चार हजारापासून पाच हजारापर्यंत पाहायला मिळाले. काही शेतकऱ्यांना मागाहून निघालेला कापूस तीन हजाराच्या घरात विकावा लागला. त्यामुळे गत वर्षीला बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची सर्व गणिते बिधडली. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ९५० कृषी केंद्रात शासनाच्या निर्देशानुसार बियाणे दाखल होत आहे. कृषी केंद्रावर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असून शेतकऱ्यांकडून किमतीची विचारणा होत आहे. कपाशीच्या बियाण्यांच्या जाहिरातीला सुरुवात झाली असून गावखेड्यात भिंतीवर पोस्टर लावण्याच्या सफाटा सुरू आहे. गत हंगामात किपाशीच्या बिटी बियाण्यावर बोंडअळीने हल्ला केल्याने यंदाच्या हंगामात कपाशीच्या बियाण्यावर शासनाने धोरण ठरले असून राज्यात केवळ ४२ कंपनीच्या ३७० वाणानांच विक्री परवाना दे्ण्यात आला आहे.गत हंगामात बोंडअळीने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने यावर्षी लवकर येणारे वाण शेतकरी निवडणार असल्याने बोलले जात आहे. शिवाय सोयाबीनच्या बियाण्यांत यावर्षी वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याने मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात असून पावसाची प्रतीक्षा आहे.लवकर येणाऱ्या वाणाला मिळणार पसंतीशेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. गत हंगामात कपाशीच्या बियाण्यांवर आलेल्या बोंडअळीमुळे शासनाने कपाशीच्या वाणांवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होत असून राज्यात केवळ कपाशीच्या ३७० वाणांनाच मुभा देण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात बियाणे दाखल होणे सुरू झाले आहे. या बियाण्यांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना व्हावी याकरिता कंपन्यांच्यावतीने गावखेड्यात घराच्या भिंतीवर, प्रवासी निवाऱ्यांवर कंपनीच्या वाणांच्या जाहिराती करणे सुरू झाले आहे.शेतकऱ्यांकडूनही बाजारात बियाण्यांच्या दराबाबत दुकानात जाऊन चौकशी करणे सुरू झाले आहे. यात कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विविध प्रलोभन देण्याचा प्रकार होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी