शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शेतकऱ्यांची मशागत पोहोचली अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:16 IST

रोहिणी नक्षत्राचा मुहूत २५ मे पासून आहे. यानंतर ७ जुनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. पावसाच्या सरी जमिनीवर पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपण्यात येत आहे. मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग आला असला तरी उन्हाच्या झळा शेतकºयांना सहन कराव्या लागत आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम तोंडावर : मान्सून लांबल्याने शेतीकामाकरिता मिळाला आणखी काही काळ

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : रोहिणी नक्षत्राचा मुहूत २५ मे पासून आहे. यानंतर ७ जुनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. पावसाच्या सरी जमिनीवर पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपण्यात येत आहे. मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग आला असला तरी उन्हाच्या झळा शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून पहाटेच्या सुमारासच कामे होत असल्याचे दिसून आले आहे.गत वर्षी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकात घट झाली. शिवाय वेचणीचा खर्च वाढुनही कापसाचे दर शेवटपर्यंत चार हजारापासून पाच हजारापर्यंत पाहायला मिळाले. काही शेतकऱ्यांना मागाहून निघालेला कापूस तीन हजाराच्या घरात विकावा लागला. त्यामुळे गत वर्षीला बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांची सर्व गणिते बिधडली. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ९५० कृषी केंद्रात शासनाच्या निर्देशानुसार बियाणे दाखल होत आहे. कृषी केंद्रावर सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असून शेतकऱ्यांकडून किमतीची विचारणा होत आहे. कपाशीच्या बियाण्यांच्या जाहिरातीला सुरुवात झाली असून गावखेड्यात भिंतीवर पोस्टर लावण्याच्या सफाटा सुरू आहे. गत हंगामात किपाशीच्या बिटी बियाण्यावर बोंडअळीने हल्ला केल्याने यंदाच्या हंगामात कपाशीच्या बियाण्यावर शासनाने धोरण ठरले असून राज्यात केवळ ४२ कंपनीच्या ३७० वाणानांच विक्री परवाना दे्ण्यात आला आहे.गत हंगामात बोंडअळीने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने यावर्षी लवकर येणारे वाण शेतकरी निवडणार असल्याने बोलले जात आहे. शिवाय सोयाबीनच्या बियाण्यांत यावर्षी वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्याने मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात असून पावसाची प्रतीक्षा आहे.लवकर येणाऱ्या वाणाला मिळणार पसंतीशेतीचा हंगाम तोंडावर आला आहे. गत हंगामात कपाशीच्या बियाण्यांवर आलेल्या बोंडअळीमुळे शासनाने कपाशीच्या वाणांवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी होत असून राज्यात केवळ कपाशीच्या ३७० वाणांनाच मुभा देण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात बियाणे दाखल होणे सुरू झाले आहे. या बियाण्यांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना व्हावी याकरिता कंपन्यांच्यावतीने गावखेड्यात घराच्या भिंतीवर, प्रवासी निवाऱ्यांवर कंपनीच्या वाणांच्या जाहिराती करणे सुरू झाले आहे.शेतकऱ्यांकडूनही बाजारात बियाण्यांच्या दराबाबत दुकानात जाऊन चौकशी करणे सुरू झाले आहे. यात कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विविध प्रलोभन देण्याचा प्रकार होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी