शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनशून्यतेमुळे शेतकरी वंचित

By admin | Updated: February 26, 2016 02:39 IST

निम्न वर्धाच्या कालव्याकरिता अधिग्रहित केलेल्या शेतजमिनींना दिल्या जाणाऱ्या भावाबाबत एकवाक्यता नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे.

निम्न वर्धा जमीन अधिग्रहण प्रकरण: मूल्यांकन दरानुसार भावाची मागणीदेवळी: निम्न वर्धाच्या कालव्याकरिता अधिग्रहित केलेल्या शेतजमिनींना दिल्या जाणाऱ्या भावाबाबत एकवाक्यता नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी देवळीचा कास्तकार वैतागला आहे. अधिकारी वर्गाचा अज्ञानीपणा यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारात लाभार्थ्यांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. संबंधित कार्यालयात हेलपाटे घेत शेतकऱ्यांची दैना झाली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात भूसंपादन कायद्यानुसार जमिनींचा मोबदला देवून विक्रीचे सोपस्कर पूर्ण केले जात आहे. देवळीबाबत, मिळणाऱ्या अपेक्षित भावाचा तिढा सुटत नसल्याने, प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. मौजा देवळी परिसरात त्या-त्या भागातील जमिनीच्या किंमती ठरविण्यासाठी शासनाचे प्रचलित मुल्यांकन दर अस्तीत्वात आहे. याच मुल्यांकन दराचा आधार वेधून आजपावतो जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहे. शासनाच्या भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचे दर निश्चित करून कास्तकारांना पैसे मिळणे अपेक्षित आहे. मागील चार महिन्यांपासून याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे संबंधित कार्यालयाचे उबंरठे झिजवीण्यातच कास्तकारांची शक्ती पणाला लागत आहे. नवीन कायद्यानुसार मोठी रक्कम कास्तकारांना द्यावयाची असल्याने प्रशासनाचे पायात आड्या पडत असल्याचे बोलले जात आहे. ज्या कास्तकारांचे सर्व्हे नंबर चौ. मि. दराप्रमाणे आहे अशांना मूल्यांकन दराच्या अडीच पट तसेच हेक्टर आर मध्ये सर्व्हे. नंबर असलेल्यांना मुल्यांकन दराच्या पाचपट मोबदला देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी त्या- त्या कास्तकारांच्या सर्व्हे नंबरप्रमाणे मुल्यांकन दर निश्चित असल्याचे शासकीय दस्तावेजात नमुद आहे. त्याचप्रमाणे शासनाने संपादित केलेल्या बहुतेक शेतजमिनीमध्ये हंगामी ओलिताची सोय उपलब्ध आहे. अश्या शेतजमिनींना मुल्यांकन दरानुसार मिळणाऱ्या रक्कमेच्या दीडपट लाभ देण्याचा नियम आहे; परंतु यासाठी सबंधित कास्तकाराच्या सातबारावर ओलीतासंबंधिच्या पटवाऱ्याच्या नोंदी आवश्यक ठरविण्यात आल्या आहे. शिवाय याच कारणामुळे शेतकऱ्यांची अडचण होत असून त्यांना मदत देण्यासंदर्भात शासनाकडूनही कुचराई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.(प्रतिनिधी)