शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

रबी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

सोयाबीन पीक हातून गेले असतानाही कपाशीवर असलेली शेतकऱ्यांची भीस्त आता बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट ओढावले असून हतबल होण्याची वेळ आली आहे. कोलगाव शिवारात असलेल्या बागायती पाच एकर शेतीत युवा शेतकरी पराग वैरागडे यांनी कपाशी पिकाची लागवड केली. पीक बहरले अधिकाधिक उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या या युवा शेतकऱ्याने शेतात कपाशीचे बोंड फोडून पहिले असता त्यात बोंडअळी दिसून आली.

ठळक मुद्देसंकट, खरीपात झाले मोठे नुकसान । आर्थिक गणित विस्कटले

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : दसरा, दिवाळी सणाला लागणार खर्च तसेच रबीची पेरणी खरिपातील पिकांवर अवलंबून असते ते नुकसानीचे जरी ठरले असले तरी आर्थिक नुकसान उराशी बाळगून शेतकऱ्यांनी आता रबी हंगामावर भिस्त आहे.एकरी सोयाबीनचे उत्पादन पाच क्विंटलच्या वर गेले नाही तर एकरी उत्पादनाची मालिका शुण्यापासून सुरू झाली असून ती चार,पाचवरच थांबली. यातही भाव वाढतील, अशी आशा दिसत असली तरी सोयाबीन घरी साठवून ठेवण्याची परिस्थिती नाही. बाजारात ४२०० रुपये भावाचा आकडा असला तरी १८०० रुपयांपासून खरेदी केली जात आहे. सरासरी भाव पहिला तर हा ३ हजारावर स्थिरावत आहे. यावर्षी असलेला सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात होता. सध्या कापूस वेचाणीला प्रारंभ झाला असून दिवाळी अगोदर शेतकऱ्याच्या घरी पांढर सोन असणार आहे. पण बोंडअळीने शिरकाव केल्याने हे पीक अधांतरी आले आहे.अशातच समोर असलेली रब्बीची पेरणी पाहता यासाठी येणाऱ्या खर्चाला आर्थिक बळ आणावे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.असे असले तरी शेतकरी पुन्हा मशागती व रब्बीच्या पेरणीला सामोरे जात आहे.शासनाने शेती व्यवसायाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.कर्जमुक्ती ठरली कागदावरशेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता तसेच दुष्काळाची गडद छाया असल्याने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. मात्र, २०१३ चे कर्ज घेतले असणारे शेतकरी अजूनही कर्जमुक्त झाले नसून कर्जमुक्ती कागदावरच राहिली असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.कोलगाव शिवारात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भावसोयाबीन पीक हातून गेले असतानाही कपाशीवर असलेली शेतकऱ्यांची भीस्त आता बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट ओढावले असून हतबल होण्याची वेळ आली आहे. कोलगाव शिवारात असलेल्या बागायती पाच एकर शेतीत युवा शेतकरी पराग वैरागडे यांनी कपाशी पिकाची लागवड केली. पीक बहरले अधिकाधिक उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या या युवा शेतकऱ्याने शेतात कपाशीचे बोंड फोडून पहिले असता त्यात बोंडअळी दिसून आली. त्यामुळे आता कपाशीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागते की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे. कृषी विभागाने शेताची पाहणी करून मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतात बोंडअळी आढळल्याने आता कपाशीवरही बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी