शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

शेतकऱ्यांनो सावधान! शेतशिवारातील विहिरींवरील मोटारपंप चोरट्यांच्या रडारावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:04 IST

२० मोटरी चोरीला : पोलिस प्रशासन सुस्त, शेतकऱ्यांवर मोठे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क विजयगोपाल : शेतशिवारात ओलितासाठी लावलेल्या मोटारपंप, स्प्रिंकलर नोझल, वायर चोरट्यांच्या रडारावर आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी शेतशिवारात मोटारपंप चोरीचा सपाटा लावला असून, २० मोटारपंप चोरीला गेले आहेत. या चोरीच्या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात शेतकरी गेले असता पाच तास ठाण्याच्या बाहेर बसवून ठेवण्यात आल्याचा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या रब्बी हंगामातील पिकांना ओलिताचे काम शेतशिवारात सुरू आहे. अशात शेतकऱ्यांकडून शेतात स्प्रिंकलर, तसेच पाटपाणी दिले जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शेतातील विहिरीवरील मोटार, स्प्रिंकलर नोझल, वायर चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. यात आतापर्यंत येथील शेतकरी हरिभाऊ डगवार, दिगांबर झोपाटे, स्वप्नील झोरे, आकाश वानखेडे, अमोल पोहेकर, आत्माराम गुल्हाने, सह अशा एकूण १८ ते २० शेतकऱ्यांच्या मोटारपंप पाइप केबल व स्प्रिंकलर नोझर चोरी गेले आहे. वाढत्या चोरीच्या घटनेमुळे शेतात साहित्याचे रक्षण करण्यासाठी मजूर लावावेत का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

या प्रकरणाची शेतकरी पोलिस स्टेशन पुलगावला तक्रार देण्याकरिता गेले असता त्यांना ५ ते ६ घंटे बाहेर बसवून ठेवत थातूर-मातूर तक्रार नोंदविली जाते. मात्र, त्याची साधी चौकशी केली नसल्याने अजूनपर्यंत चोरी गेलेल्या मोटारी शेतकऱ्यांना परत दिल्या जात नाहीत. त्यामुळे पुलगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत केवळ धनधाकट्या लोकांच्याच घरी चोरी गेल्याच्या घटनांना गती देण्यात येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चोरी गेलेल्या प्रत्येक तक्रारीची प्रामाणिक चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार राजेशजी बकाने यांच्याकडे केली आहे. 

आमदारांच्या फोननंतर होतो गुन्हा दाखल

  • येथील शेतकरी दिगांबर झोपाटे, स्वप्निल झोरे, आकाश वानखडे या शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारपंप चोरीची घटना शनिवारी घडली. 
  • या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी शेतकरी पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना ५ तास बाहेर बसवून ठेवण्यात आले. 
  • तास न् तास बसविल्यानंतर शेतकऱ्यांनी थेट आमदारांना फोनवरून घटनेची स्थिती आणि पोलिसांच्या कार्यतत्परतेची तक्रार केली. 
  • त्यानंतर आमदारांनी पोलिसांची झाडाझडती घेतली. तेव्हा तक्रार घेण्यात आली. 
  • तब्बल ६ तासांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद करून घेतला. तक्रार नोंदवून घेण्यासाठीही आमदाराची शिफारस लागणार का?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतीसाहित्य चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष का? गेल्या सहा सात महिन्यांपासून चोरट्यांचा परिसरात धुमाकूळ घातला आहे. यासंदर्भात तक्रारीही दाखल करण्यात आल्या. मात्र, पुढे कारवाई झाली नाही. मध्यंतरी कळंब पोलिसांनी मोटारपंप चोरी करणारे चोर पकडले असून, त्याच्या ताब्यातून १८ ते २० मोटारपंप जप्त केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्या चोरांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी करणे अपेक्षित होते. ती ही करण्यात न आल्याने गेल्या सहा महिन्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीThiefचोर