शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शेतकऱ्यांनो सावधान! शेतशिवारातील विहिरींवरील मोटारपंप चोरट्यांच्या रडारावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 18:04 IST

२० मोटरी चोरीला : पोलिस प्रशासन सुस्त, शेतकऱ्यांवर मोठे संकट

लोकमत न्यूज नेटवर्क विजयगोपाल : शेतशिवारात ओलितासाठी लावलेल्या मोटारपंप, स्प्रिंकलर नोझल, वायर चोरट्यांच्या रडारावर आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी शेतशिवारात मोटारपंप चोरीचा सपाटा लावला असून, २० मोटारपंप चोरीला गेले आहेत. या चोरीच्या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात शेतकरी गेले असता पाच तास ठाण्याच्या बाहेर बसवून ठेवण्यात आल्याचा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या रब्बी हंगामातील पिकांना ओलिताचे काम शेतशिवारात सुरू आहे. अशात शेतकऱ्यांकडून शेतात स्प्रिंकलर, तसेच पाटपाणी दिले जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शेतातील विहिरीवरील मोटार, स्प्रिंकलर नोझल, वायर चोरी होण्याच्या घटना घडत आहेत. यात आतापर्यंत येथील शेतकरी हरिभाऊ डगवार, दिगांबर झोपाटे, स्वप्नील झोरे, आकाश वानखेडे, अमोल पोहेकर, आत्माराम गुल्हाने, सह अशा एकूण १८ ते २० शेतकऱ्यांच्या मोटारपंप पाइप केबल व स्प्रिंकलर नोझर चोरी गेले आहे. वाढत्या चोरीच्या घटनेमुळे शेतात साहित्याचे रक्षण करण्यासाठी मजूर लावावेत का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

या प्रकरणाची शेतकरी पोलिस स्टेशन पुलगावला तक्रार देण्याकरिता गेले असता त्यांना ५ ते ६ घंटे बाहेर बसवून ठेवत थातूर-मातूर तक्रार नोंदविली जाते. मात्र, त्याची साधी चौकशी केली नसल्याने अजूनपर्यंत चोरी गेलेल्या मोटारी शेतकऱ्यांना परत दिल्या जात नाहीत. त्यामुळे पुलगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत केवळ धनधाकट्या लोकांच्याच घरी चोरी गेल्याच्या घटनांना गती देण्यात येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चोरी गेलेल्या प्रत्येक तक्रारीची प्रामाणिक चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार राजेशजी बकाने यांच्याकडे केली आहे. 

आमदारांच्या फोननंतर होतो गुन्हा दाखल

  • येथील शेतकरी दिगांबर झोपाटे, स्वप्निल झोरे, आकाश वानखडे या शेतकऱ्यांच्या शेतातून मोटारपंप चोरीची घटना शनिवारी घडली. 
  • या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी शेतकरी पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना ५ तास बाहेर बसवून ठेवण्यात आले. 
  • तास न् तास बसविल्यानंतर शेतकऱ्यांनी थेट आमदारांना फोनवरून घटनेची स्थिती आणि पोलिसांच्या कार्यतत्परतेची तक्रार केली. 
  • त्यानंतर आमदारांनी पोलिसांची झाडाझडती घेतली. तेव्हा तक्रार घेण्यात आली. 
  • तब्बल ६ तासांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद करून घेतला. तक्रार नोंदवून घेण्यासाठीही आमदाराची शिफारस लागणार का?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

शेतीसाहित्य चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष का? गेल्या सहा सात महिन्यांपासून चोरट्यांचा परिसरात धुमाकूळ घातला आहे. यासंदर्भात तक्रारीही दाखल करण्यात आल्या. मात्र, पुढे कारवाई झाली नाही. मध्यंतरी कळंब पोलिसांनी मोटारपंप चोरी करणारे चोर पकडले असून, त्याच्या ताब्यातून १८ ते २० मोटारपंप जप्त केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्या चोरांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी करणे अपेक्षित होते. ती ही करण्यात न आल्याने गेल्या सहा महिन्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीThiefचोर