शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

शेतकऱ्यांनो सावधान, जरा जपून टाका पावलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना शेतात कामे करण्यासाठी सोबतच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढावते. अशा अनेक घटना जानेवारी ते जुलै या कालावधीत घडत आहेत.

ठळक मुद्देसात महिन्यांत जिल्ह्यात ३७६ जणांना ‘स्नेक बाईट’ : पुलगाव तालुक्यात घडल्या सर्वाधिक घटना

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यात शेती कामांना वेग येतो. सोबतच बरसणाऱ्या पावसामुळे पिके जोमाने बहरतात. मात्र, अशावेळी सरपटणारे सापही याच शेतात वावरत असतात. तेव्हा शेतकऱ्यांनो अशावेळी सावध राहून शेतीकामे करणे गरजेचे झाले आहे. कारण जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत ३७६ जणांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.शेतकऱ्यांना शेतात कामे करण्यासाठी सोबतच रखवाली करण्यासाठी अनेकदा रात्रीच शेतात जावे लागते. रात्रीच्या अंधारात सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव अधिक असतो. अंधारात चुकून एखाद्या सापावर पाय पडला की, संबंधित शेतकऱ्यांला किंवा शेतमजुराला सर्पदंशाला सामोरे जावे लागते. विषारी सापाने चावा घेतल्यास प्रसंगी शेतकऱ्यांवर मृत्यूही ओढावते. अशा अनेक घटना जानेवारी ते जुलै या कालावधीत घडत आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर या महिन्यांत सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. पावसामुळे सापांच्या बिळामध्ये पाणी गेल्याने साप बिळाबाहेर येऊन सुरक्षित जागा शोधतात. शेतशिवार ही त्यांच्यासाठी अतिशय सुरक्षित जागा असते. त्यामुळे सापांची संख्या शेतशिवारात अधिक दिसून येते.जिल्ह्यात बहुतांश नागरिकांचा शेती हाच व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना दररोज आपल्या शेतात जावेच लागते. शेतात जाताना योग्य खबरदारी घेतली नाही, तर सापांपासून स्वत:चे संरक्षण करणे कठीण जाते. यातूनच यावर्षी सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. सर्वाधिक घटना सर्पदंशाच्या घटना जुन आणि जुलै महिन्यात घडल्याच्या नोंदी जिल्हा सामान्य रुग्णालयात आहेत. जून महिन्यात १४६ तर जुलै महिन्यात १०१ जणांना सर्पदंश झाला आहे.जहर फवारणीने १५ शेतकरी बाधितसध्या शेती मशागतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतात फवारणी करण्याची कामे जोरात सुरु आहे. फवारणी करतेवेळी योग्य काळजी न घेतल्याने फवारणीच्या विषबाधाने जिल्ह्यातील १५ शेतकरी, बाधित झाले आहे. फवारणी करताना अनेकांना विषबाधा झाली असून मृत्यूच्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे फवारणी करताना दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.मृत्यूची नोंद नाहीशेतात काम करीत असताना साप चावल्यास शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची कुठलीही नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात नाही. मात्र, पोलीस दफ्तरी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात येत असतात. शेतकरी दगावल्यानंतर कुणीही याची नोंद रुग्णालयाकडे करण्यास जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्पदशांने मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालयाकडे नसल्याची माहिती आहे.तीन महिन्यांत सर्वाधिक घटनापावसाळ्याचे दिवस असून शेतकरी शेतीकामात व्यस्त आहेत. अशातच सर्पटणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात ३४, जून महिन्यात १४६ तर जुलै महिन्यात १०१ जणांना सर्पदंश झाल्याची माहिती आहे.आवश्यक लस उपलब्धसर्पदंशाच्या वाढत्या घटना लक्षात घेता आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून त्यावर आवश्यक असलेली लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन दिली आहे. तरीही सर्पदंश होताच तत्काळ रुग्णालय गाठावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :snakeसापFarmerशेतकरी