शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

दिवाळी सणासाठीच्या खरेदीत शेतकरी घेतोय हात आखडताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 22:45 IST

दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नोकरदारांची गर्दी होत असून शेतकरी मात्र हात आखडताच घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड संकटामुळे सलग दोन वर्षे सण आणि उत्सवांवर निर्बंध होते. तर काेविडचा जोर कमी झाल्यावर हळूहळू निर्बंधात शिथिलता देत नंतर निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आलेत. परिणामी यंदा दिवाळी मोठ्या उत्साहातच साजरी होणार आहे. दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नोकरदारांची गर्दी होत असून शेतकरी मात्र हात आखडताच घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

अतिवृष्टीने मोडले कंबरडे- यंदाच्या वर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. परिणामी मोठे नुकसान झाले. तर मागील आठवड्यात ढगाळी वातावरण राहत पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची मळणी लांबली. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा उत्पादनात कमालीची घट येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हात आखडताच घेताना दिसत आहे.

लक्ष्मीची मूर्ती, झेंडूचे फूल, आकर्षक तोरणही बाजारपेठेत- दिवाळीनिमित्त वर्धा बाजारपेठेत लक्ष्मीची मूर्ती व पोस्टर, आकर्षक असलेल्या पणत्या, झेंडूची फुले, विविध फटाक्यांसह इतर साहित्याने बाजारपेठ सजली आहे. विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक आपल्या चिमुकल्यांसोबत सौभाग्यवतीसह गर्दी करीत आहेत. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती.

कपडे खरेदीसाठी अनेकांची बाजारपेठेत धाव- दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठेतील कपडा लाईन भागातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने सजली आहेत. याच दुकानांमध्ये रविवारी सकाळपासूनच महिलांसह पुरुषांची कपडे खरेदीसाठी गर्दी होती. नवीन कपडे खरेदी करणाऱ्यांमध्ये शेतकरी बांधवांची संख्या नाममात्रच असल्याचे बाजारपेठेचा दुपारी १२ वाजता फेरफटका मारला असता बघावयास मिळाले. - कदाचित आज सायंकाळपर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव बाजारपेठेत दाखल होत दिवाळीचे औचित्य साधून खरेदी करतील, असा अंदाज एका कापड व्यावसायिकाने लोकमतच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना वर्तविला.

शासकीय मदत ठरतेय तटपुंजी- जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ३६५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तहसीलदारांमार्फत ७४ टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत वितरित करण्यात आली आहे. शिवाय ही रक्कम सुटीच्या दिवसांतही शेतकऱ्यांना काढता यावी या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बँकांना एटीएममध्ये मुबलक पैसे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असले तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत प्राप्त शासकीय मदत तटपुंजी असल्याचे शेतकरी सांगतात. विशेष म्हणजे या शासकीय मदतीच्या रकमेतून अनेक शेतकऱ्यांनी शेतमजुरांची मजुरी तसेच उसनवारीची परतफेड केल्याने हे शेतकरी दिवाळी सणासाठीच्या खरेदीत हात आखडताच घेत आहे.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Farmerशेतकरी