शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

दिवाळी सणासाठीच्या खरेदीत शेतकरी घेतोय हात आखडताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2022 22:45 IST

दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नोकरदारांची गर्दी होत असून शेतकरी मात्र हात आखडताच घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड संकटामुळे सलग दोन वर्षे सण आणि उत्सवांवर निर्बंध होते. तर काेविडचा जोर कमी झाल्यावर हळूहळू निर्बंधात शिथिलता देत नंतर निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आलेत. परिणामी यंदा दिवाळी मोठ्या उत्साहातच साजरी होणार आहे. दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठही सजली असून विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकही बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. पण दिवाळीचे औचित्य साधून होत असलेले साहित्य खरेदी करणाऱ्यांमध्ये नोकरदार अधिक तर शेतकरी कमी असेच चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच सजलेल्या बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी नोकरदारांची गर्दी होत असून शेतकरी मात्र हात आखडताच घेत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

अतिवृष्टीने मोडले कंबरडे- यंदाच्या वर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. परिणामी मोठे नुकसान झाले. तर मागील आठवड्यात ढगाळी वातावरण राहत पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाची मळणी लांबली. शिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा उत्पादनात कमालीची घट येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हात आखडताच घेताना दिसत आहे.

लक्ष्मीची मूर्ती, झेंडूचे फूल, आकर्षक तोरणही बाजारपेठेत- दिवाळीनिमित्त वर्धा बाजारपेठेत लक्ष्मीची मूर्ती व पोस्टर, आकर्षक असलेल्या पणत्या, झेंडूची फुले, विविध फटाक्यांसह इतर साहित्याने बाजारपेठ सजली आहे. विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक आपल्या चिमुकल्यांसोबत सौभाग्यवतीसह गर्दी करीत आहेत. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती.

कपडे खरेदीसाठी अनेकांची बाजारपेठेत धाव- दिवाळीचे औचित्य साधून बाजारपेठेतील कपडा लाईन भागातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने सजली आहेत. याच दुकानांमध्ये रविवारी सकाळपासूनच महिलांसह पुरुषांची कपडे खरेदीसाठी गर्दी होती. नवीन कपडे खरेदी करणाऱ्यांमध्ये शेतकरी बांधवांची संख्या नाममात्रच असल्याचे बाजारपेठेचा दुपारी १२ वाजता फेरफटका मारला असता बघावयास मिळाले. - कदाचित आज सायंकाळपर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी बांधव बाजारपेठेत दाखल होत दिवाळीचे औचित्य साधून खरेदी करतील, असा अंदाज एका कापड व्यावसायिकाने लोकमतच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना वर्तविला.

शासकीय मदत ठरतेय तटपुंजी- जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ३६५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तहसीलदारांमार्फत ७४ टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत वितरित करण्यात आली आहे. शिवाय ही रक्कम सुटीच्या दिवसांतही शेतकऱ्यांना काढता यावी या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी थेट बँकांना एटीएममध्ये मुबलक पैसे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असले तरी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत प्राप्त शासकीय मदत तटपुंजी असल्याचे शेतकरी सांगतात. विशेष म्हणजे या शासकीय मदतीच्या रकमेतून अनेक शेतकऱ्यांनी शेतमजुरांची मजुरी तसेच उसनवारीची परतफेड केल्याने हे शेतकरी दिवाळी सणासाठीच्या खरेदीत हात आखडताच घेत आहे.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Farmerशेतकरी