शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

पावसाच्या दडीमुळे शेतकरी, शेतमजूर चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:56 IST

पावसाने दडी मारून १३ दिवसांचा कालावधी होत आहे. ज्यांनी पेरणी केली ते रोपटी उगवावी याकरिता तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीची वेळ टळत असल्याने चिंतेत आले आहे.

ठळक मुद्देअनेकांवर दुबार पेरणीचे संकट : ओलितासाठी विहिरीतील पाणीही आटले

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : पावसाने दडी मारून १३ दिवसांचा कालावधी होत आहे. ज्यांनी पेरणी केली ते रोपटी उगवावी याकरिता तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीची वेळ टळत असल्याने चिंतेत आले आहे. तर पेरणीची कामे रखडल्याने शेतमजुरांच्या हातालाही नसल्याचे घरखर्च कसा भागवावा अशी चिंता त्यांना पडली आहे.चांगला पाऊस, लवकर पाऊस या हवामान खात्याचा अंदाजाला खो देत रोहणा परिसरात १० जूनपासून पावसाने लंबी दडी मारली. सोबत ४० अंशापेक्षा पारा अधिक तपत आहे. ८ व ९ जूनला उत्तम पाऊस आला. यंदा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असे वाटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, तूर व सोयाबीनची पेरणी केली. जमिनीतील ओलाव्याने पीक अंकुरली, ताशी लागली; पण त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. परिणामी काही शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. पेरणी केलेल्यांनी शेवटी वाचविण्यासाठी ओलित सुरू केले. विहिरीतील पाणी तुटल्यावर पुन्हा विहिरीत पाणी आलेच नाही. अनेक शेतकऱ्यांना ओलित बंद करावे लागले. काही शेतकरी फवाऱ्याच्या पंपाने पाणी देवून रोपटी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण उन्हाळ्याला लाजवेल एवढा सूर्य तापत असल्याने शेतकऱ्यांचा हा प्रयत्नही थीटा पडत आहे. ज्यांनी पेरणी केली नव्हती त्यातील काही शेतकऱ्यांनी शासनाच्या हवामान खात्याने २० ते २२ तारखेपर्र्यंत पाऊस येईल यावर विश्वास ठेवत पेरण्या आटोपल्या. महागडे बियाणे जमिनीतील किडे फस्त करीत आहेत तर अजूनही ६० टक्के शेतकरी पेरणी केव्हा होईल या चिंतेने काळ्या आईकडे हताश नजरेने पहात असून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.शेतकऱ्यांनी पुन्हा कसली कंबरचिकणी (जामणी)- परिसरात गुरुवारी सायंकाळच्या पावसामुळे येथील शेतकरी पुन्हा एकदा कंबर कसून पऱ्हाटीची लावण व सोयाबीनची पेरणी करण्यास सज्ज झाला आहे. चिकणी व परिसरामध्ये मान्सून पूर्व आलेल्या पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पऱ्हाटीची लावण तथा सोयाबीनची पेरणी केली होती. तीन चार दिवस सतत पाऊस आल्यामुळे बियाणे जमिनीतील ओलाव्यामुळे अंकुरले. तर काही शेतकऱ्यांचे बिज अंकुरलेच नाही. यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील ५० ते ६० टक्के बीज अंकुरले आहे. आता या पावसामुळे काही शेतकऱ्यांकडून पऱ्हाटी डोबणे सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी डवरणीला प्रारंभ केला आहे; परंतु शुक्रवारपासून परत पावसाने दडी मारल्यामुळे अस्मानी संकटाची टांगती तलवार शेतकऱ्यांवपर कायम असल्याचेच दिसून येते. १२ दिवसाच्या उघाडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हाटीचे बीज दबण्याची शक्यता आहे. तर जे बीज अंकुरले त्यांना पावसाची नितांत गरज आहे. याच काळात चिकणी व परिसरामध्ये गुरुवारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला तरी दुबार पेरणीचे सावट कायमच असल्याचे दिसून येते.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी