शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
3
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
4
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
5
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
6
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
7
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
8
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
9
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
10
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
11
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
12
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
13
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
14
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
15
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब 
16
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
17
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न
18
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
19
मूळ पाकिस्तानी असलेला 'हा' वादग्रस्त क्रिकेटर निवृत्त; ऑस्ट्रेलिया टीममध्ये केले होते मोठे कांड
20
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दडीमुळे शेतकरी, शेतमजूर चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:56 IST

पावसाने दडी मारून १३ दिवसांचा कालावधी होत आहे. ज्यांनी पेरणी केली ते रोपटी उगवावी याकरिता तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीची वेळ टळत असल्याने चिंतेत आले आहे.

ठळक मुद्देअनेकांवर दुबार पेरणीचे संकट : ओलितासाठी विहिरीतील पाणीही आटले

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : पावसाने दडी मारून १३ दिवसांचा कालावधी होत आहे. ज्यांनी पेरणी केली ते रोपटी उगवावी याकरिता तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीची वेळ टळत असल्याने चिंतेत आले आहे. तर पेरणीची कामे रखडल्याने शेतमजुरांच्या हातालाही नसल्याचे घरखर्च कसा भागवावा अशी चिंता त्यांना पडली आहे.चांगला पाऊस, लवकर पाऊस या हवामान खात्याचा अंदाजाला खो देत रोहणा परिसरात १० जूनपासून पावसाने लंबी दडी मारली. सोबत ४० अंशापेक्षा पारा अधिक तपत आहे. ८ व ९ जूनला उत्तम पाऊस आला. यंदा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असे वाटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, तूर व सोयाबीनची पेरणी केली. जमिनीतील ओलाव्याने पीक अंकुरली, ताशी लागली; पण त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. परिणामी काही शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. पेरणी केलेल्यांनी शेवटी वाचविण्यासाठी ओलित सुरू केले. विहिरीतील पाणी तुटल्यावर पुन्हा विहिरीत पाणी आलेच नाही. अनेक शेतकऱ्यांना ओलित बंद करावे लागले. काही शेतकरी फवाऱ्याच्या पंपाने पाणी देवून रोपटी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण उन्हाळ्याला लाजवेल एवढा सूर्य तापत असल्याने शेतकऱ्यांचा हा प्रयत्नही थीटा पडत आहे. ज्यांनी पेरणी केली नव्हती त्यातील काही शेतकऱ्यांनी शासनाच्या हवामान खात्याने २० ते २२ तारखेपर्र्यंत पाऊस येईल यावर विश्वास ठेवत पेरण्या आटोपल्या. महागडे बियाणे जमिनीतील किडे फस्त करीत आहेत तर अजूनही ६० टक्के शेतकरी पेरणी केव्हा होईल या चिंतेने काळ्या आईकडे हताश नजरेने पहात असून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.शेतकऱ्यांनी पुन्हा कसली कंबरचिकणी (जामणी)- परिसरात गुरुवारी सायंकाळच्या पावसामुळे येथील शेतकरी पुन्हा एकदा कंबर कसून पऱ्हाटीची लावण व सोयाबीनची पेरणी करण्यास सज्ज झाला आहे. चिकणी व परिसरामध्ये मान्सून पूर्व आलेल्या पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पऱ्हाटीची लावण तथा सोयाबीनची पेरणी केली होती. तीन चार दिवस सतत पाऊस आल्यामुळे बियाणे जमिनीतील ओलाव्यामुळे अंकुरले. तर काही शेतकऱ्यांचे बिज अंकुरलेच नाही. यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील ५० ते ६० टक्के बीज अंकुरले आहे. आता या पावसामुळे काही शेतकऱ्यांकडून पऱ्हाटी डोबणे सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी डवरणीला प्रारंभ केला आहे; परंतु शुक्रवारपासून परत पावसाने दडी मारल्यामुळे अस्मानी संकटाची टांगती तलवार शेतकऱ्यांवपर कायम असल्याचेच दिसून येते. १२ दिवसाच्या उघाडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हाटीचे बीज दबण्याची शक्यता आहे. तर जे बीज अंकुरले त्यांना पावसाची नितांत गरज आहे. याच काळात चिकणी व परिसरामध्ये गुरुवारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला तरी दुबार पेरणीचे सावट कायमच असल्याचे दिसून येते.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी