शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

पावसाच्या दडीमुळे शेतकरी, शेतमजूर चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:56 IST

पावसाने दडी मारून १३ दिवसांचा कालावधी होत आहे. ज्यांनी पेरणी केली ते रोपटी उगवावी याकरिता तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीची वेळ टळत असल्याने चिंतेत आले आहे.

ठळक मुद्देअनेकांवर दुबार पेरणीचे संकट : ओलितासाठी विहिरीतील पाणीही आटले

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : पावसाने दडी मारून १३ दिवसांचा कालावधी होत आहे. ज्यांनी पेरणी केली ते रोपटी उगवावी याकरिता तर ज्यांनी पेरणी केली नाही ते पेरणीची वेळ टळत असल्याने चिंतेत आले आहे. तर पेरणीची कामे रखडल्याने शेतमजुरांच्या हातालाही नसल्याचे घरखर्च कसा भागवावा अशी चिंता त्यांना पडली आहे.चांगला पाऊस, लवकर पाऊस या हवामान खात्याचा अंदाजाला खो देत रोहणा परिसरात १० जूनपासून पावसाने लंबी दडी मारली. सोबत ४० अंशापेक्षा पारा अधिक तपत आहे. ८ व ९ जूनला उत्तम पाऊस आला. यंदा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असे वाटत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, तूर व सोयाबीनची पेरणी केली. जमिनीतील ओलाव्याने पीक अंकुरली, ताशी लागली; पण त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. परिणामी काही शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. पेरणी केलेल्यांनी शेवटी वाचविण्यासाठी ओलित सुरू केले. विहिरीतील पाणी तुटल्यावर पुन्हा विहिरीत पाणी आलेच नाही. अनेक शेतकऱ्यांना ओलित बंद करावे लागले. काही शेतकरी फवाऱ्याच्या पंपाने पाणी देवून रोपटी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण उन्हाळ्याला लाजवेल एवढा सूर्य तापत असल्याने शेतकऱ्यांचा हा प्रयत्नही थीटा पडत आहे. ज्यांनी पेरणी केली नव्हती त्यातील काही शेतकऱ्यांनी शासनाच्या हवामान खात्याने २० ते २२ तारखेपर्र्यंत पाऊस येईल यावर विश्वास ठेवत पेरण्या आटोपल्या. महागडे बियाणे जमिनीतील किडे फस्त करीत आहेत तर अजूनही ६० टक्के शेतकरी पेरणी केव्हा होईल या चिंतेने काळ्या आईकडे हताश नजरेने पहात असून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.शेतकऱ्यांनी पुन्हा कसली कंबरचिकणी (जामणी)- परिसरात गुरुवारी सायंकाळच्या पावसामुळे येथील शेतकरी पुन्हा एकदा कंबर कसून पऱ्हाटीची लावण व सोयाबीनची पेरणी करण्यास सज्ज झाला आहे. चिकणी व परिसरामध्ये मान्सून पूर्व आलेल्या पावसामुळे ७० टक्के शेतकऱ्यांनी पऱ्हाटीची लावण तथा सोयाबीनची पेरणी केली होती. तीन चार दिवस सतत पाऊस आल्यामुळे बियाणे जमिनीतील ओलाव्यामुळे अंकुरले. तर काही शेतकऱ्यांचे बिज अंकुरलेच नाही. यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील ५० ते ६० टक्के बीज अंकुरले आहे. आता या पावसामुळे काही शेतकऱ्यांकडून पऱ्हाटी डोबणे सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी डवरणीला प्रारंभ केला आहे; परंतु शुक्रवारपासून परत पावसाने दडी मारल्यामुळे अस्मानी संकटाची टांगती तलवार शेतकऱ्यांवपर कायम असल्याचेच दिसून येते. १२ दिवसाच्या उघाडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हाटीचे बीज दबण्याची शक्यता आहे. तर जे बीज अंकुरले त्यांना पावसाची नितांत गरज आहे. याच काळात चिकणी व परिसरामध्ये गुरुवारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला तरी दुबार पेरणीचे सावट कायमच असल्याचे दिसून येते.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी