शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पासपोर्टच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आंदोलकाची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

विजय जावंधिया यांनी पासपोर्टची मुदत वाढवून मिळण्याकरिता अर्ज केला आहे. त्यांचे वास्तव्य वर्ध्यातील रामनगर परिसरात राहिल्याने पोलीस पडताळणीकरिता तो अर्ज वर्ध्यातील रामनगर पोलिसांकडे आला. त्यामुळे जावंधिया रामनगर पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना ‘तुमच्यावर २०११ मधील एक गुन्हा दाखल असून ते प्रकरण सुरू आहे’ असे सांगण्यात आले.

ठळक मुद्देसामान्यांचे सरकारशी व्यवहार सोयीचे कधी होणार? : जावंधिया यांचा गृहमंत्र्यांना सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी संघटनेचे पाईक तथा शेतकरी आंदोलक म्हणून ओळख असलेले विजय जावंधिया यांचे विविध कार्यक्रम व आंदोलनासंदर्भात नेहमीच देश-विदेशात जाणे-येणे असते. त्याकरिता त्यांनी पासपोर्टला मुदतवाढ मिळण्याकरिता पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. मात्र, पोलिसांकडून अडवणुकीचे धोरण राबविल्या जात असल्याने त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच पत्र लिहून सामान्य नागरिकांना सरकारशी व्यवहार करणे सोयीचे कधी होणार? असा सवाल उपस्थित केला आहे.विजय जावंधिया यांनी पासपोर्टची मुदत वाढवून मिळण्याकरिता अर्ज केला आहे. त्यांचे वास्तव्य वर्ध्यातील रामनगर परिसरात राहिल्याने पोलीस पडताळणीकरिता तो अर्ज वर्ध्यातील रामनगर पोलिसांकडे आला. त्यामुळे जावंधिया रामनगर पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना ‘तुमच्यावर २०११ मधील एक गुन्हा दाखल असून ते प्रकरण सुरू आहे’ असे सांगण्यात आले. या प्रकरणाचा निकाल १६ जानेवारी २०१४ मध्येच लागला असून जुन्या पासपोर्टवर २०११ आणि २०१५ मध्ये परदेशात जाऊन आल्याचे जावंधिया यांनी पोलिसांना सांगितले. तरीही पोलिसांनी काही एक ऐकून न घेता न्यायालयातून प्रकरणाच्या निकालाची प्रत आणून देण्याचा अट्टहास चालविला आहे. हा एकप्रकारे सर्वसामान्यांना त्रास देण्याचा प्रकार असून प्रकरण दाखल केले सरकारने, निकालही दिला सरकारी न्यायालयानेच; मग सरकारजवळ आणि वर्धा पोलिसांजवळ या प्रकरणाच्या निकालाची प्रत असायला हवी.पण, पोलिसांची काम करण्याची पद्धत म्हणजे त्रास देणारीच आहे. शेतकरी आंदोलनात अनेक राज्यात भाग घेतला आहे. पंजाबच्या तुरुंगात तीनदा चौदा-चौदा दिवस कारावास भोगला; मात्र त्या राज्यातून पुन्हा कधी त्रास झाला नाही. ती प्रकरणे तेथेच संपविण्यात येत असतील. आपल्या राज्यात आंदोलकाना त्रास देणे बंद करून सामान्यांना सरकारशी व्यवहार करण्यात त्रास होणार नाही, असे काही करता येईल का? असा प्रश्न शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविलेल्या पत्रातून उपस्थित केला आहे.सर्वसामान्यांना पोलिसांचे हेलपाटेचसध्या पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी किंवा मुदतवाढीसाठी अर्ज केल्यानंतर अर्जदार राहात असलेल्या परिसरातील पोलीस ठाण्यामध्ये तो अर्ज पडताळणीसाठी जात असतो. काही पोलीस या पडताळणीकरिता अर्जदारांनाच त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. पोलिसांकडून पडताळणी करून त्यावर स्वाक्षरी करण्याकरिताही दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत रक्कम मागितली जाते. हात ओले केले तर रहिवासी नसला तरीही पडताळणी केली जाते, नाही तर रहिवासी असूनही अनावश्यक त्रुटी काढून अर्ज परत पाठविला जातो. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :passportपासपोर्टFarmerशेतकरी