शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या लाभापासून शेतकरी अद्याप वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:40 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्मचाऱ्यांच्या कर्मदारिद्रयाचाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांने सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या चुकीमुळे बोंंडअळी अनुदान वाटपाच्या यादीतून नाव वगळण्यात आले.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे कर्मदारिद्रय : यादीत शेतकऱ्यांचे नावच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्मचाऱ्यांच्या कर्मदारिद्रयाचाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांने सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या चुकीमुळे बोंंडअळी अनुदान वाटपाच्या यादीतून नाव वगळण्यात आले. त्यामुळे टेंभरी परसोडी येथील शेतकऱ्यांना लाभापासून वचिंत राहावे लागले.मागील वर्षी शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु कपाशीवर गुलाबी बोंड अळीने आक्र मण केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पन्नात घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यामुळे शेतकºयांना मदत म्हणून शासनाने बोंडअळीग्रस्तांना अनुदान जाहीर केले होते. त्याकरिता तलाठी, कृषी सहाय्यक यांना शेतात जाऊन सर्वेक्षण करुन यादी तयार करायच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, येथील कर्मचाऱ्यानी शेताचा बांधावर न जाता टेबलावर बसूनच याद्या तयार केल्याने अनेक शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याची ओरड गावात होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अनुदानाकरिता बँकेसह तहसील कार्यालयाचे वर्षभर उंबरठे झिजविले पण, अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चौकशी केली असता काही शेतकऱ्यांची नावेच यादीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवाज उठविल्यानंतर ज्यांची नावे सुटली त्यांची नवीन यादी करुन तहसीलदारांना पाठविली. परंतु तहसीलदारांनी ती नवीन यादी अमान्य केल्याने त्या शेतकऱ्यांवर आता अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याला तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.जाणीवपूर्वक नाव वगळल्याचा आरोपकपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे मागील दोन वर्षापासून शेतकºयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अनुदान जाहीर केले होते. परंतू कामचुकार कर्मचाºयांच्या टेबलावरील अहवालामुळे अनेक शेतकऱ्यांना दीड वर्षानंतरही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहे. याबाबत माहिती जाणून घेतली असता पाचोडच्या तत्कालीन तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाने टेंभरी परसोडी येथील काही शेतकऱ्यांची नावे जाणीवपूर्वक यादीतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता चौकशीची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :agricultureशेती