शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बोंडअळीच्या लाभापासून शेतकरी अद्याप वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:40 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्मचाऱ्यांच्या कर्मदारिद्रयाचाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांने सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या चुकीमुळे बोंंडअळी अनुदान वाटपाच्या यादीतून नाव वगळण्यात आले.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे कर्मदारिद्रय : यादीत शेतकऱ्यांचे नावच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्मचाऱ्यांच्या कर्मदारिद्रयाचाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांने सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या चुकीमुळे बोंंडअळी अनुदान वाटपाच्या यादीतून नाव वगळण्यात आले. त्यामुळे टेंभरी परसोडी येथील शेतकऱ्यांना लाभापासून वचिंत राहावे लागले.मागील वर्षी शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु कपाशीवर गुलाबी बोंड अळीने आक्र मण केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पन्नात घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यामुळे शेतकºयांना मदत म्हणून शासनाने बोंडअळीग्रस्तांना अनुदान जाहीर केले होते. त्याकरिता तलाठी, कृषी सहाय्यक यांना शेतात जाऊन सर्वेक्षण करुन यादी तयार करायच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, येथील कर्मचाऱ्यानी शेताचा बांधावर न जाता टेबलावर बसूनच याद्या तयार केल्याने अनेक शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याची ओरड गावात होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अनुदानाकरिता बँकेसह तहसील कार्यालयाचे वर्षभर उंबरठे झिजविले पण, अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चौकशी केली असता काही शेतकऱ्यांची नावेच यादीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवाज उठविल्यानंतर ज्यांची नावे सुटली त्यांची नवीन यादी करुन तहसीलदारांना पाठविली. परंतु तहसीलदारांनी ती नवीन यादी अमान्य केल्याने त्या शेतकऱ्यांवर आता अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याला तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.जाणीवपूर्वक नाव वगळल्याचा आरोपकपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे मागील दोन वर्षापासून शेतकºयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अनुदान जाहीर केले होते. परंतू कामचुकार कर्मचाºयांच्या टेबलावरील अहवालामुळे अनेक शेतकऱ्यांना दीड वर्षानंतरही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहे. याबाबत माहिती जाणून घेतली असता पाचोडच्या तत्कालीन तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाने टेंभरी परसोडी येथील काही शेतकऱ्यांची नावे जाणीवपूर्वक यादीतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता चौकशीची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :agricultureशेती