शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या लाभापासून शेतकरी अद्याप वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:40 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्मचाऱ्यांच्या कर्मदारिद्रयाचाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांने सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या चुकीमुळे बोंंडअळी अनुदान वाटपाच्या यादीतून नाव वगळण्यात आले.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे कर्मदारिद्रय : यादीत शेतकऱ्यांचे नावच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कर्मचाऱ्यांच्या कर्मदारिद्रयाचाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांने सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या चुकीमुळे बोंंडअळी अनुदान वाटपाच्या यादीतून नाव वगळण्यात आले. त्यामुळे टेंभरी परसोडी येथील शेतकऱ्यांना लाभापासून वचिंत राहावे लागले.मागील वर्षी शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु कपाशीवर गुलाबी बोंड अळीने आक्र मण केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्या गेला. नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कपाशीच्या उत्पन्नात घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यामुळे शेतकºयांना मदत म्हणून शासनाने बोंडअळीग्रस्तांना अनुदान जाहीर केले होते. त्याकरिता तलाठी, कृषी सहाय्यक यांना शेतात जाऊन सर्वेक्षण करुन यादी तयार करायच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, येथील कर्मचाऱ्यानी शेताचा बांधावर न जाता टेबलावर बसूनच याद्या तयार केल्याने अनेक शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित राहावे लागत असल्याची ओरड गावात होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अनुदानाकरिता बँकेसह तहसील कार्यालयाचे वर्षभर उंबरठे झिजविले पण, अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे चौकशी केली असता काही शेतकऱ्यांची नावेच यादीत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवाज उठविल्यानंतर ज्यांची नावे सुटली त्यांची नवीन यादी करुन तहसीलदारांना पाठविली. परंतु तहसीलदारांनी ती नवीन यादी अमान्य केल्याने त्या शेतकऱ्यांवर आता अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. याला तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.जाणीवपूर्वक नाव वगळल्याचा आरोपकपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या आक्रमणामुळे मागील दोन वर्षापासून शेतकºयांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने अनुदान जाहीर केले होते. परंतू कामचुकार कर्मचाºयांच्या टेबलावरील अहवालामुळे अनेक शेतकऱ्यांना दीड वर्षानंतरही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहे. याबाबत माहिती जाणून घेतली असता पाचोडच्या तत्कालीन तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकाने टेंभरी परसोडी येथील काही शेतकऱ्यांची नावे जाणीवपूर्वक यादीतून वगळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता चौकशीची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :agricultureशेती