शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2015 02:22 IST

पेरण्या आटोपल्या असताना शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. यामुळे किमान मशागतींच्या कामासाठी कर्ज मिळावे म्हणून शेतकरी धडपड करीत आहे.

वर्धा : पेरण्या आटोपल्या असताना शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. यामुळे किमान मशागतींच्या कामासाठी कर्ज मिळावे म्हणून शेतकरी धडपड करीत आहे. याचा फायदा घेत दलाल शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसतात. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील शेतकऱ्याची अशीच दोन लाखांनी फसवणूक झाली. या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील शेतकरी विठ्ठल मोतीराम भोयर यांची सर्व्हे क्र. ४५७ व ५१७ येथे आराजी अनुक्रमे ४.३० हे.आर. व २.६० हे.आर. शेती आहे. गतवर्षी ते पीक कर्जासाठी कागदपत्रे गोळा करण्यासाठी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे गेले. तेथे मुकेश रोडे, रा. दोंदुडा याने त्यांना तुम्ही आयआयसीआय बँकेतून कर्ज घ्या. तेथील बँक मॅनेजर व कर्मचारी ओळखीचे आहे. तुम्हाला त्रास न होता कर्ज काढून देऊ, असे सांगितले. यावर भोयर यांनी बँकेत चलण्यास सांगितले असता तुमच्या घरी बँकेचे अधिकारी घेऊन येतो, असे सांगितले. यानंतर लगेच दोन दिवसांनी रोडे व बँकेचा पंकज नामक कर्मचारी भोयर यांच्या घरी सावली (वाघ) येथे पोहोचले. त्यांनीच सातबारा, आठ-अ आदी कागदपत्रे काढून आणली. सोबतच आयसीआयसीआय बँकेचा नवीन खाते उघडण्याचा अर्जही आणला. बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितल्याने भोयर यांनी विश्वासाने सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या. शेतकरी भोयर यांचे पासपोर्ट फोटो, मुलगा बापुराव व सुनेच्या सह्या व फोटोही घेतले.यानंतर पुन्हा शेतकऱ्याच्या घरी दलाल व कर्मचाऱ्याने पीककर्जाच्या विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या. यानंतर परस्पर साडे तीन लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. बँकेचे चेकबुकही शेतकऱ्याला घरीच आणून दिले. यातील काही कोऱ्या धनादेशावर भोयर यांच्या सह्या घेतल्या. लगेच साडे तीन लाख रुपये भोयर यांच्या बँक खात्यात जमा झाले. काही दिवसांनी त्यांना बँकेचे एटीएम कार्ड मिळाले. यानंतर बँकेत जाऊन शेतकऱ्याने बँक व्यवस्थापकाची भेट घेतली असता मुकेश रोडे व पंकज नामक तेथेच बसलेला कर्मचारी बँकेचाच आहे, असे सांगितले. मंजूर कर्ज तुमच्या खात्यात जमा झाले. कर्जाच्या मोबदल्यात ६.६९ लाखांचा बोजा सातबारावर चढविल्याचेही सांगितले. भोयर यांनी काही रक्कम काढली; पण कर्मचारी व दलालाने कोऱ्या धनादेशाद्वारे दोन वेळा एक-एक लाख रुपये काढले. शेतकरी बँकेत गेला असता खात्यातून दोन लाख रुपये काढले व फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरून किसान सभेमार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार केली असून कारवाईची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)