शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2015 02:22 IST

पेरण्या आटोपल्या असताना शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. यामुळे किमान मशागतींच्या कामासाठी कर्ज मिळावे म्हणून शेतकरी धडपड करीत आहे.

वर्धा : पेरण्या आटोपल्या असताना शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. यामुळे किमान मशागतींच्या कामासाठी कर्ज मिळावे म्हणून शेतकरी धडपड करीत आहे. याचा फायदा घेत दलाल शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसतात. हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील शेतकऱ्याची अशीच दोन लाखांनी फसवणूक झाली. या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) येथील शेतकरी विठ्ठल मोतीराम भोयर यांची सर्व्हे क्र. ४५७ व ५१७ येथे आराजी अनुक्रमे ४.३० हे.आर. व २.६० हे.आर. शेती आहे. गतवर्षी ते पीक कर्जासाठी कागदपत्रे गोळा करण्यासाठी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे गेले. तेथे मुकेश रोडे, रा. दोंदुडा याने त्यांना तुम्ही आयआयसीआय बँकेतून कर्ज घ्या. तेथील बँक मॅनेजर व कर्मचारी ओळखीचे आहे. तुम्हाला त्रास न होता कर्ज काढून देऊ, असे सांगितले. यावर भोयर यांनी बँकेत चलण्यास सांगितले असता तुमच्या घरी बँकेचे अधिकारी घेऊन येतो, असे सांगितले. यानंतर लगेच दोन दिवसांनी रोडे व बँकेचा पंकज नामक कर्मचारी भोयर यांच्या घरी सावली (वाघ) येथे पोहोचले. त्यांनीच सातबारा, आठ-अ आदी कागदपत्रे काढून आणली. सोबतच आयसीआयसीआय बँकेचा नवीन खाते उघडण्याचा अर्जही आणला. बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितल्याने भोयर यांनी विश्वासाने सर्व कागदपत्रांवर सह्या केल्या. शेतकरी भोयर यांचे पासपोर्ट फोटो, मुलगा बापुराव व सुनेच्या सह्या व फोटोही घेतले.यानंतर पुन्हा शेतकऱ्याच्या घरी दलाल व कर्मचाऱ्याने पीककर्जाच्या विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या. यानंतर परस्पर साडे तीन लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. बँकेचे चेकबुकही शेतकऱ्याला घरीच आणून दिले. यातील काही कोऱ्या धनादेशावर भोयर यांच्या सह्या घेतल्या. लगेच साडे तीन लाख रुपये भोयर यांच्या बँक खात्यात जमा झाले. काही दिवसांनी त्यांना बँकेचे एटीएम कार्ड मिळाले. यानंतर बँकेत जाऊन शेतकऱ्याने बँक व्यवस्थापकाची भेट घेतली असता मुकेश रोडे व पंकज नामक तेथेच बसलेला कर्मचारी बँकेचाच आहे, असे सांगितले. मंजूर कर्ज तुमच्या खात्यात जमा झाले. कर्जाच्या मोबदल्यात ६.६९ लाखांचा बोजा सातबारावर चढविल्याचेही सांगितले. भोयर यांनी काही रक्कम काढली; पण कर्मचारी व दलालाने कोऱ्या धनादेशाद्वारे दोन वेळा एक-एक लाख रुपये काढले. शेतकरी बँकेत गेला असता खात्यातून दोन लाख रुपये काढले व फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरून किसान सभेमार्फत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तक्रार केली असून कारवाईची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)