शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

समुद्रपूर तालुक्यात शेतकरी-शेतमजूर संघर्ष

By admin | Updated: September 13, 2014 02:08 IST

गावातील शेतमजूर बाहेरगावी मजुरीकरिता जात असल्याच्या कारणावरून चिडलेल्या शेतकऱ्यांनी मजुरांना वाहुन नेणाऱ्या वाहनांची तक्रार पोलीस ठाण्यात केली़ ...

समुद्रपूर : गावातील शेतमजूर बाहेरगावी मजुरीकरिता जात असल्याच्या कारणावरून चिडलेल्या शेतकऱ्यांनी मजुरांना वाहुन नेणाऱ्या वाहनांची तक्रार पोलीस ठाण्यात केली़ पोलिसांनी अवैध वाहतुकीच्या नियमावरून अशा वाहनावर कारवाई केली. यामुळे एका दिवसाचा रोजगार बुडाल्याचा आरोप करीत शेतमजूर महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेत जोरदार घोषणाबाजी केली़ शेतमजुरीतील तफावतीमुळेच शेतकरी शेतमजूर यांच्यात हा संघर्ष पेटलेला आहे़तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशीत गवताचे प्रमाण वाढले़ वाढलेल्या गवताबरोबरच मजुरीचे दरही वाढले़ शेतमजुरांनी जिथे जास्त मजुरी मिळेल तिथे मजुरीला जाण्याचे धोरण अवलंविले़ समुद्रपूर येथे १२० ते १३० रुपये मजुरी तर बाहेरगावी २५० ते २७० रुपये मजुरी मिळत असल्यामुळे गावातील शेकडो शेतमजूर बाहेरगावी मजुरीकरिता जात आहोत. त्यामुळे समुद्रपूर येथील शेतकऱ्यांना मजूर मिळणे दुरापास्त झाले़ गुरूवारी २० ते २५ शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सभा घेवून शेतमजूर महिलांना बाहेरगावी जाऊ द्यायचे नाही, असे ठरविले़ यासाठी मजुरांना वाहून नेणाऱ्या वाहनांची तक्रार ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलीस प्रशासनाने तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी ९ वाजता मजुरांना वाहून नेणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली़ त्यामुळे शेतमजूर महिलांना मजुरीकरिता जाता न आल्यामुळे एका दिवसाची मजुरी बुडाली़ शेतकऱ्यांनी जाणूनबुजून तक्रार केल्याचा प्रकार महिलांना माहिती झाल्यामुळे त्यांनी एकत्र येत ग्रा.पं.समोर घोषणाबाजी केली़ तेथून झेंडा चौकात येत चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी समजाविल्या नंतर त्यांनी तहसील कार्यालयात धडक देत तिथेही घोषणाबाजी केली़ त्यानंतर पोलीस ठाण्यात मजूरांचा मोर्चा दाखल झाला़ ठाणेदार अनिल जिट्टावार यांनी महिलांना समजावित सायंकाळी शेतकरी व शेतमजूर यांची संयुक्त सभा घेवून यावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला़ एका दिवसाचा रोजगार बुडाल्यामुळे हताश झालेल्यास शेतमजूर महिलांना शेवटपर्यंत कुणाला न्याय मागावा हे कळलेच नाही़ नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदील झालेला शेतकरी व रोजमजुरीवर पोट भरणाऱ्या शेतमजुरात संघर्षची चिन्हे दिसत आहे़(तालुका प्रतिनिधी)