शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

सुविधांचे विविधा केंद्र दलालांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2015 02:10 IST

विविध कागदपत्रांकरिता शालेय विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्याकरिता येथील प्रशासकीय ...

वर्धा : विविध कागदपत्रांकरिता शालेय विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्याकरिता येथील प्रशासकीय भवनाच्या परिसरात नागरिकांच्या सुविधांकरिता विविधा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातील सुविधांचा लाभ घेणे आता नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत असल्याचे बघायला मिळाले. केंद्रावर थेट गेल्यावर नागरिकांना लाभ मिळणे कठीण झाले आहे. तर दलालांमार्फत गेल्यास कुठलाही त्रास न होता काम होत असल्याचे वास्तव समोर आले. या केंद्राला दलालांच्या विळख्याने पुरते ग्रासल्याचे विदारक चित्र आहे.विविधा केंद्राच्या इमारतीच्या आत तर दलालांची पंगत बघायला मिळाली. इमारतीच्या दारातून आत शिरताच डाव्या बाजूला दलाल चक्क टेबल घेवून बसून होते. त्यांच्याकडून काय पाहिजेपासून विचारणा सुरू होती. त्यांना तुम्ही तुमचे काम सांगा ते किंमत सांगतील. यात तुमचा सौदा झाल्यास तुम्हाला कामाकरिता खस्ता खाव्या लागणार नाही. मात्र या दलालांव्यरिक्त तुम्ही गेले तर तुम्हाला केंद्रात चकरा मारण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणारा नाही, अशी येथील अवस्था आहे. केवळ इमारतीतच नाही तर इमारतीच्या परिसरात या दलालांकडून विद्यार्थी हेरण्याचे काम सुरू होते. त्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांकडून शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत रक्कम घेण्याचे प्रकार सुरू आहेत. इमारतीच्या बाहेर तर काही दलालांली टेबल लावून दुकान थाटले आहे. तर काहींनी येथे उभ्या असलेल्या गाड्यांवर बसून आपली दुकाने थाटली आहेत. वडिलांकडून मोजके पैसे घेत असलेल्या या विद्यार्थ्यांकडून या दलालांमार्फत रक्कम लुटण्याचे काम बिनधास्त सुरू आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता विविध प्रमाणपत्राची गरज असते. या प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळणे कठीण जाते. आवश्यक प्रमाणपत्र मिळविण्याकरिता असलेला कालावधी अत्यल्प असल्याने येथे एकाच वेळी विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेले दलाल येथे सक्रीय झाले आहेत. विविधा केंद्राच्या बाहेर व आत या दलालांची चांगली पंगत बसून असल्याने चित्र येथे पहावयास मिळाले. याची माहिती जिल्हा प्रशासनाला याची कल्पना आहे. यात दलालांकडून होत असलेल्या कामांत कुठलीही त्रुटी न काढता प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणारे अधिकारी जिल्हा प्रशासनाचेच असल्याने त्यांच्याकडून यावर कारवाई होत नसल्याचे दिसते आहे. मध्यंतरी यावर आळा बसविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र अद्यापही त्या कॅमेऱ्याने हे टिपू नये, याचेच आश्चर्य आहे. या कॅमेऱ्यासमक्ष बसून हे दलाल काम करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातील फुटेज पाहिल्यास याची कल्पना येईल. कदाचित त्यांच्याकडून ते पाहिल्याही जात असेल, असे असताना त्यांच्याकडून या दलालांवर कारवाई का होत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. तरीही कारवाईचा पत्ता नाही. यामुळे दलालांकडून विद्यार्थ्यांची होत असलेली ही आर्थिक लुट सत्र संपेपर्यंत अशीच सुरू राहणार, हे नक्की. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून आहे.