शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशकाच्या अतिवापराने रानभाज्या होताहेत नामशेष

By admin | Updated: September 29, 2014 00:50 IST

पावसाळ्यात सर्वत्र शेताच्या बांधावर अनेक रानभाज्या उगवतात. आधी या भाज्या मोठ्या प्रमाणात बांधावर पहावयास मिळायच्या. परंतु या काही वर्षांमध्ये तननाशकाचा वापर वाढल्याने

वायगाव (नि.) : पावसाळ्यात सर्वत्र शेताच्या बांधावर अनेक रानभाज्या उगवतात. आधी या भाज्या मोठ्या प्रमाणात बांधावर पहावयास मिळायच्या. परंतु या काही वर्षांमध्ये तननाशकाचा वापर वाढल्याने हेत्या काही वर्षात रानभाज्या नामशेष होतात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तननाशकाचा अतिवापर करणे ताळण्याची गरज निर्माण झाली आहे. रानभाज्या म्हणजे गरीब शेतमजूर शेतकऱ्यांचा रानमेवा. परंतु हा रानमेवा आता तणनाशकाच्या अतिवापरामुळे नामशेष होत असून पावसाळ्यात या भाज्याची चव चाखणाऱ्यांच्या जेवणाची लज्जत नाहीशी होत आहे. पूर्वी पावसाच्या आगमनाने शेतातील मातीच्या सुगंधाने मन प्रसन्न तर होतच होते. त्याचबरोबर या शेतावर तरोटा, अंबाडी, चाकवत, चिवळी, लाल माठ, कटवल अशा अनेक भाज्या शेतातील बांधावर आपोआप उगवायच्या. त्यामुळे आता जानवत असलेली महागाई तेव्हा तितक्या प्रकर्षाने जानवत नव्हती. पावसाळा व्व अर्धा हिवाळा या भाज्यांवर निभून जायचा, शेतकऱ्यांबरोबरच शेतमजुरांसाठीही या रानभाज्या वरदान असायच्या. या शेतमजूर महिला शेतावरून घरी येत असताना या भाज्या तोडून आणायच्या. त्यामुळे दोन वेळच्या भाजीची सोय व्हायची. शहरात रहात असलेल्या अनेकांना आजही या भाज्या आठवतात. आगऊ पैसे देऊन त्या विकत घेतल्या जातात. परंतु गेल्या दशकात शेती करायच्या पद्धतीत भरपूर बदल झाले आहे. शेतीच्या गरजा वाढल्या. पिकासोबत येणारे तण काढून टाकण्यासाठी निंदणाची गरज असते. आणि त्याकरिता मजुरांची अत्यंत निकड असते. आजघडीला मजूर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे वैज्ञानिकांनी तणनाशकाचा शोध लावला. मजुरी वाढल्याने शेतकरी नाईलाजाने अशा औषधांचा वारंवार वापर करीत आहे. यामुळे शेतात बांधावर उगवणाऱ्या चवळी, कुंदराची भाजी, करडकोसळी, अंबाडी, तरोटा, काटवल, वाघाटे आदी रानभाज्या नामशेष झाल्या आहे. कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळे अनेक जुने गावरान वाणही नष्ट होत आहे. शेतात उगवणाऱ्या तरोट्याची जागा आता गाजरगवताने घेतली आहे. तणनाशकाच्या वापराचे दुष्परिणाम समोर येत असले तरी शेतकऱ्यांना दुसऱ्या पर्याय नसल्याने शेतकरी तणनाशकाचा सर्रास वापर करीत आहे. यामुळे पणाबरोबर रानभाज्याही वाळून जात आहे.(वार्ताहर)