शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

एसटी बसगाड्यांचे व्यापक निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव व तळेगाव हे रापमचे पाच आगार आहेत. या पाचही आगारात एकूण २५० बसेस आहेत. याच बसेस ग्रामीण आणि शहरी प्रवााशांच्या सेवेसाठी प्रभावी नियोजन करून सोडल्या जातात. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.

ठळक मुद्देसंख्येत मोठी कपात : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना (कोव्हिड-१९) या विषाणूचा वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत प्रसार होऊ नये म्हणून शासन व प्रशासनस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची प्रत्येक बस निर्जंतूक करण्यात येत आहे. असे असले तरी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच बसस्थानकावर गर्दी करू नये असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव व तळेगाव हे रापमचे पाच आगार आहेत. या पाचही आगारात एकूण २५० बसेस आहेत. याच बसेस ग्रामीण आणि शहरी प्रवााशांच्या सेवेसाठी प्रभावी नियोजन करून सोडल्या जातात. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे वर्ध्याकरांमध्ये पूर्वीच भीतीचे वातावरण आहे. हेच भीतीचे वातावरण निवळावे आणि कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रसार वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून संपूर्ण बसेस निर्जंतूक करण्यात येत आहेत.बसस्थानकात गर्दी होऊ नये म्हणून फलाटावर प्रवासी असल्यास बसेस सोडल्या जात आहेत. तर प्रवासी नसल्यास बसफेरीच रद्द केली जात आहे. गुरूवारी राज्य परिवहन महामंडळाने कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन तब्बल ५० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या नाहीत, असे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वाहक, चालकांसाठी मुबलक ‘मास्क’कोरोनाची लागण रापमच्या वाहक व चालकांना होऊ नये म्हणून त्यांना मास्क दिले जात आहे. वरिष्ठांकडे मागणी केल्यानंतर रापमच्या कर्मचाºयांसाठी मुबलक प्रमाणात मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर प्रत्येक बस निर्जंतूक करण्यासाठी जिल्ह्यातील पाचही आगारात अतिरिक्त मनुष्यबळही लावण्यात आले आहे.नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता त्याबाबतची खबरदारी घेणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर विनाकारण प्रवास टाळवा तसेच बसस्थानकांवर गर्दी करू नये. रापमच्या कर्मचाºयांसाठी मुबलक प्रमाणात मास्क उपलब्ध झाले आहेत. शिवाय बसेस निर्जंतूक करण्यात येत आहेत.- चेतन हासबनीस, विभाय नियंत्रक, रापम, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी