शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

डॉ.आंबेडकरांचे विचार समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:41 IST

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : सामाजिक न्याय दिनाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे, डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. यामुळे त्यांचे विचार समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.देवळी नगर परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ व्या जयंती निमित्य सामाजिक न्याय दिवस कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला खा. रामदास तडस यांनी माल्यार्पण केले. त्यानंतर नगर परिषद देवळी द्वारे आयोजित सामाजिक न्याय दिवस कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. उपाध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र मदनकर, गटनेत्या शोभा तडस, न.प. सभापती सारिका लाकडे, कल्पना ढोक, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे उपस्थित होते.खा. तडस पुढे म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालत त्याला कृतीची जोड दिली. ही सर्व हिंमत त्यांना अभ्यासातून प्राप्त झाली, यात दुमत नाही. यामुळे त्यांनी नेहमीच वाचनाला महत्त्व दिले. शिक्षण म्हणजे वाघिणीच दूध त्यांनीच समाजाला पटवून दिले. या शिक्षणातूनच त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दु:ख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले ज्ञान, माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविली. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला. त्यांचे विचार आजही समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर, न.प. सभापती कल्पना ढोक, सुनीता बकाणे, न.प. सदस्य नंदकिशोर वैद्य, पवन महाजन, मिलिंद ठाकरे, मिलिंद ठाकरे, मारोतराव मरघडे, संध्या कोरोटकर, अश्विनी काकडे, संगिता कामडी, राजश्री देशमुख, संगीता तराळे, अब्दुल नईम, नगर परिषद कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती