शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

डॉ.आंबेडकरांचे विचार समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:41 IST

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : सामाजिक न्याय दिनाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे, डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. यामुळे त्यांचे विचार समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.देवळी नगर परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ व्या जयंती निमित्य सामाजिक न्याय दिवस कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला खा. रामदास तडस यांनी माल्यार्पण केले. त्यानंतर नगर परिषद देवळी द्वारे आयोजित सामाजिक न्याय दिवस कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. उपाध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र मदनकर, गटनेत्या शोभा तडस, न.प. सभापती सारिका लाकडे, कल्पना ढोक, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे उपस्थित होते.खा. तडस पुढे म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालत त्याला कृतीची जोड दिली. ही सर्व हिंमत त्यांना अभ्यासातून प्राप्त झाली, यात दुमत नाही. यामुळे त्यांनी नेहमीच वाचनाला महत्त्व दिले. शिक्षण म्हणजे वाघिणीच दूध त्यांनीच समाजाला पटवून दिले. या शिक्षणातूनच त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दु:ख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले ज्ञान, माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविली. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला. त्यांचे विचार आजही समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर, न.प. सभापती कल्पना ढोक, सुनीता बकाणे, न.प. सदस्य नंदकिशोर वैद्य, पवन महाजन, मिलिंद ठाकरे, मिलिंद ठाकरे, मारोतराव मरघडे, संध्या कोरोटकर, अश्विनी काकडे, संगिता कामडी, राजश्री देशमुख, संगीता तराळे, अब्दुल नईम, नगर परिषद कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती