शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शासकीय नियमाला डावलूण मुरुमाच्या उत्खननाला उधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:50 IST

सावली वाघ येथील प्रकार : उद्धवसेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : तालुक्यातील मौजा सावली (वाघ) येथील शासकीय जागेवर शासकीय नियमांना डावलून अवैधरीत्या दगड, मुरुमाचे गेल्या काही महिन्यांपासून उत्खनन सुरू आहे. उत्खनन आरक्षित जागा सोडून केले जात असल्याने याचा शेतकऱ्यांना त्रास होतो आहे. या प्रकारावर आळा घालावा, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

तालुक्यातील सावली (वाघ) येथे खनिकर्म विभागाच्या वतीने शासकीय जागेवर गौण खनिज मुरूम व दगड उत्खनन करण्यासाठी काही व्यक्तींनी जवळपास २१ हेक्टर जागेची परवानगी घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या परवानगीची मर्यादा संपली असल्याचेही सांगण्यात आले. असे असताना शासकीय जागेवर पोकलेन, जेसीबी व विस्फोटक वापरून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. यामुळे या परिसरात ३० ते ३५ फूट खोल गड्डे तयार झाले आहेत. उत्खननासाठी दिलेल्या आरक्षित जागा सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या रस्त्यापर्यंत हे उत्खनन सुरू ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यास त्रास होत सहन करावा लागत आहे. विस्फोटक पदार्थामुळे शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना याचा धोका निर्माण झाला आहे. 

सुरू असलेल्या प्रकाराची चौकशी करून या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या विस्फोटक पदार्थांऐवजी मजूर लावून उत्खनन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना शेतात काम आहे. त्यांना शेतात जाण्याचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे या विषयाची तातडीने दखल घेऊन स्थळ पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक मनीष देवडे, शंकर मोहम्मारे, शकील अहमद, फिरोज खान, आशिष वाघ, दीपक पावडे, रामाची किनाके, गजानन फरकाडे, राकेश राजूरकर, शकील एकोणकर, दिलीप कुकडे, गजाननराव धोटे, करण जेनेवार, अजय महाकाळकर, अनिल राजूरकर, नीलेश मानकर, योगेश ठग, प्रतीक पावडे, दीपक एकोणकर, संजय एकोणकर, विजय ठग, हनुमान गौळकर, रंजन डोमकावळे, दशरथ तिखट व भास्कर मानकर आदी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. 

शेतात जाणाऱ्या रस्त्याची लागली वाट शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हे उत्खनन आले आहे. येथे दगड फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे रस्त्याची वाट लागली असून, होणाऱ्या आवाजाचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाMining Scamखाण घोटाळा