शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

बारावीच्या १९,९४९ विद्यार्थ्यांची परीक्षा

By admin | Updated: February 28, 2017 01:10 IST

प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात महत्त्वाची ठरणारी बाराव्या वर्गाची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. ...

जिल्ह्यात ४६ परीक्षा केंद्र : कॉपीमुक्त परीक्षेकरिता एकूण २१ पथके वर्धा : प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात महत्त्वाची ठरणारी बाराव्या वर्गाची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. या परीक्षेत विविध शाखेतील एकूण १९ हजार ९४९ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याकरिता एकूण ४६ परीक्षा केंद्र आहेत. बाराव्या वर्गात विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता ही परीक्षा महत्त्वाची आहे. येथूनच पुढच्या भविष्याचा मार्ग ठरविता येतो. यामुळे ही परीक्षा जीवनातील वळणरस्ता म्हणूनही ओळखल्या जात आहे. हीच परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याकरिता शिक्षण विभागाकडून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेकरिता निवड करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांची शिक्षण विभागाच्या परीक्षा मंडळाने तपासणी केली असून तसा अहवाल नागपूर परीक्षा विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्याकरिता शिक्षण विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची माहितीही देण्यात आली. हा उपक्रम गत काही वर्षांपासून सुरू असून परीक्षेत कॉपीचे प्रमाण मात्र कायम असल्याचे दिसून आले आहे. होत असलेल्या या प्रकारावर आळा बसविण्याकरिता एकूण २१ पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाची परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करडी नजर राहणार आहे. यात पाच भारारी पथके असून तालुका स्तरावर तहसीलदारांची आठ आणि त्याच स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांची आठ पथके समाविष्ट आहेत. (प्रतिनिधी) ११ पर्यवेक्षकांची नियुक्ती जिल्ह्यातील ४६ परीक्षा केंद्रावर माहिती पुरविण्याकरिता एकूण ११ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडे परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्र व उत्तरपत्रिका पोहोचविण्यासह परीक्षेनंतर त्यांचे संकलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.