शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सर्वोदयी विचारानेच विकास शक्य

By admin | Updated: November 15, 2014 22:51 IST

मास प्रॉडक्शन हा शब्द सध्या सर्वत्र प्रचलित आहे. परंतु या शब्दाऐवजी प्रॉडक्शन बाय द मासेस ही कृती अंगीकारल्यास खरे ग्राम स्वराज येऊ शकते. आपण आत्मघाती विकासामुळे विनाशाकडे चाललो

अमरभाई यांचे प्रतिपादन : विनोबा आश्रमात मित्र-मिलन सोहळापवनार : मास प्रॉडक्शन हा शब्द सध्या सर्वत्र प्रचलित आहे. परंतु या शब्दाऐवजी प्रॉडक्शन बाय द मासेस ही कृती अंगीकारल्यास खरे ग्राम स्वराज येऊ शकते. आपण आत्मघाती विकासामुळे विनाशाकडे चाललो असून यातून बाहेर पडायचे असेल तर सर्वोदय विचार याचा पर्याय असू शकतो असे मत ग्रामस्वराज-कृषी संस्कृती य विषयावर मार्गदर्शन करताना अमरभाई यांनी व्यक्त केले. द्वितीय सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण दिनी ब्रह्म विद्या मंदिर पवनार येथे मित्र-मिलन सोहळ्याचे आयोजन १५, १६ आणि १७ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. यावेळी द्वितीय सत्रात ग्रामस्वराज कृषी संस्कृती हा विषयावर अमरभाई यानी विचार व्यक्त केले. यंदा मित्र मिलन सोहळ्याचा विषय ‘सर्वोदय की दिशा मे.. बढते कदम’ असा ठेवण्यात आला आहे. या संमेलनामध्ये देशभरातील ७०० च्या वर सर्वोदयी कार्यकर्ते सहभागी झाले आहे. तीन दिवस चालत असलेल्या या संमेलनात सर्वोदयची दिशा या विषयावर चर्चा होणार आहे. शनिवारी संमेलनाला सुरुवात करताना शिला दिदी यांनी सोहळ्याच्या आयोजनाचा उद्देश उपस्थितांना सांगितला. प्रथम सत्रामध्ये नारायण देसाई, महेंद्रभाई यांनी ग्राम स्वराज या विषयावर यथोचित मार्गदर्शन केले.या चर्चासत्रात सुब्बाराव, सुभाष पाळेकर, कमल टावरी, मूर्ती यांनीही मार्गदर्शन केले. सत्राचे संचालन रमेशभाई यांनी केले. या सोहळ्यासाठी संपूर्ण विनोबा आश्रमाला साध्या पण सुंदर पद्धतीने सुशोभित करण्यात आले आहे. दरवर्षी विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण पर्वावर मित्र मिलन आयोजित केले जाते. देशभरातील सर्वोदयी सहभागी यात होत असतात. महिला कार्यकर्त्यांची यात मोठी उपस्थिती असते. डॉ. अभय बंग यांनीही या वेळी हजेरी लावत आश्रमातील ज्येष्ठांची आस्थेने चौकशी केली.(वार्ताहर)