शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सरणानंतरची धग कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

अमानवीय घटना नंदोरी मार्गावर घडल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हापासून जिल्ह्यातच नव्हे, तर देशभरातील वातावरण ढवळून निघाले. सात दिवस पीडितेची नागपुरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती पण; यात सोमवारी सकाळी ‘ती’ अपयशी ठरली. तिच्या मृत्यूचे वृत्त धडकताच पंचक्रोशीत शोककळा पसरली.

ठळक मुद्देसकाळपासूनच संताप, आक्रोशाचा भडका : अंत्यसंस्कारासाठी उसळला पंचक्रोशीतील जनसागर

भास्कर कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : आठवडाभरापूर्वीच्या सोमवारी सकाळी ७.३० वाजता प्राध्यापिकेवर पेट्रोल हल्ला करून जाळण्याची अमानवीय घटना नंदोरी मार्गावर घडल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हापासून जिल्ह्यातच नव्हे, तर देशभरातील वातावरण ढवळून निघाले. सात दिवस पीडितेची नागपुरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती पण; यात सोमवारी सकाळी ‘ती’ अपयशी ठरली. तिच्या मृत्यूचे वृत्त धडकताच पंचक्रोशीत शोककळा पसरली.तालुक्यातील एका लहानशा गावातील प्राध्यापिकेवर हिंगणघाट शहरातील नंदोरी मार्गावर पेट्रोल हल्ला करण्यात आला होता. ३ जानेवारीला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर संताप व आक्रोश कायमच होता. सोमवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. याची कल्पना पोलीस प्रशासनाला असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या नेतृत्वात दंगल नियंत्रक पथकासह ३०० पोलिसांचा ताफा गावात दाखल झाला. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेलीसुद्धा गावात दाखल झाले. सकाळी १० वाजतापर्यंत गावात तणावपूर्ण शांतता असतानाच अचानक भडका उडाला. गावातील महिला, तरुणी, युवक व ज्येष्ठ नागरिक अचानक रस्त्यावर उतरले. गावालगत असलेल्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी ठाण मांडून दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली.‘त्या हत्याऱ्याला आमच्या हवाली करा, त्याशिवाय शववाहिका गावात जाऊ देणार नाही आणि अंत्यसंस्कारही होऊ देणार नाही’ अशी भूमिका घेतली. नागरिकांचा संताप व आक्रोश पाहून महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूंनी दूरवरच वाहने थांबविण्यात आली होती. जवळपास अडीच तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला. दुपारी १.१३ वाजता पीडितेची आई, वडील व नातलग पार्थिव घेऊन रुग्णवाहिकेने गावात दाखल झाले. खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार त्यांच्या सोबत होते. संतप्त जमावाने त्यांची वाहने रोखून धरली. यादरम्यान काहींनी तुफान दगडफेकही केली. यावेळी पीडितेचे वडील, खा. रामदास तडस व आ. समीर कुणावार हे रुग्णवाहिकेच्या मागे पायदळ चालत असल्याने ते या दगडफेकीतून थोडक्यात बचावले. यात रुग्णवाहिकेच्या काचा फुटल्याने लगेच पोलिसांनी रुग्णवाहिकेला गराडा घातला. जमाव वाढतच गेल्याने नाईलाजास्तव पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. रुग्णवाहिकेचा चालक व काही पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. तरीही त्यांनी पार्थिव घेऊन आलेली रुग्णवाहिका सुरक्षित पीडितेच्या घरापर्यंत पोहोचविली. त्यानंतरही बराच काळ घोषणाबाजी व तणावाचे वातावरण कायमच होते. या संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलीस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते.जळगावला अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा पीडितेचा भाऊ दुपारी चार वाजता गावी पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. स्थानिक मोक्षधामात तिच्या पार्थिवावर सायंकाळी ५.८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खा.रामदास तडस, आ. समीर कुणावार, किशोर दिघे, जि.प. सभापती माधव चंदनखेडे, माजी पं.स. सभापती लता घवघवे, सरपंच गिरीधर सिडाम, पोलिस अधीक्षक बसवराज तेली, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, हिंगणघाट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, तहसीलदार श्रीराम मुंधडा, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, शिवसेनेचे तुषार देवढे, चंदू मावळे, संजय डेहणे, डॉ. विजय पर्बत, वामनराव खोडे, आकाश घवघवे, मिलिंद भेंडे, बालू महाजन, मंदा ठवरी, अनिल भोंगाडे, माजी सरपंच राहुल घवघवे, रूपेश लाजूरकर, राहुल घवघवे, संदीप झाडे, नाना घोडे, सुनील इंगोले, वडनेरचे ठाणेदार गजबे, पोलीस पाटील काबंळे, सागर लाजूरकर, संजय तोडावत, बालू फटिंग, रा. म. धोटे, प्रा. उल्हास लोहकरे, गुरुदेव चौधरी, गजानन निवल, गजानन बुरांडे, प्रवीण चौधरी, विठ्ठल चौधरी, विवेक देशमुख, ईश्वर कोल्हे, अनिल देशमुख, संजय खातदेव, समीर पावडे यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी शोकसभा घेऊन साश्रूनयनांनी तिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.