शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

टिळकांच्या पुतळ्याचाही गुदमरत असेल श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

पावसाळापूर्व नियोजनासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम शहरातील नाले, गाळ उपसा आदी मोहीम राबविण्यात येत असली तरी गोलबाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याकडे मात्र, पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांकडून पुतळ्यासमोरच कचरा फेकल्या जातो, पाण्याचे डबके साचले असून जनावरे पाण्यात बसून असतात.

ठळक मुद्देगोल बाजारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य : पालिकेची ‘हाताची घडी तोंडावर बोट’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील गोल बाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्या सभोवताल सर्वत्र घाणीचे साम्रज्य पसरले असून नगर पालिकेची ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशी भूमीका दिसून येत आहे. साचून असलेल्या कचऱ्यामुळे टिळकांचाही श्वास गुदमरत असेल, असे चित्र पहावयास मिळत आहे.पावसाळापूर्व नियोजनासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम शहरातील नाले, गाळ उपसा आदी मोहीम राबविण्यात येत असली तरी गोलबाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याकडे मात्र, पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांकडून पुतळ्यासमोरच कचरा फेकल्या जातो, पाण्याचे डबके साचले असून जनावरे पाण्यात बसून असतात. असे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. एरव्ही शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन करणाऱ्या नगर पालिकेला स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. गोल बाजार परिसरातून जाताना दुर्गंधी येत असलेल्या बाजारात जाणाऱ्यांना नाकावर रुमाल ठेवून भाजी खरेदी करावी लागत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजीविक्रेतेही आपला सडलेला, कुजलेला भाजीपाला टिळकांच्या पुतळ्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत फेकत असल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. कचरा फेकणाऱ्यांना कुणाचीही भीती नसल्याचे चित्र आहे. हम करे सो कायदा याप्रमाणे भाजीविक्रेत्यांकडून सर्रास कचरा फेकल्या जात आहे. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिका प्रशासनाने जागे होण्याची गरज निर्माण झाली आहे.कचरा साचल्याने परिसराची साफसफाई करागोल बाजार परिसरात असलेल्या टिळक पुतळा परिसरात नागरिक लघुशंकेला जातात. तसेच साचून असलेला कचरा कुजून सडलेल्या भाजीपाल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पुतळा परिसरात साफसफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.जयंती, पुण्यतिथीलाच येते जागनगर पालिका प्रशासनाला केवळ टिळकांच्या जयंती आणि पुण्यतिथीलाच जाग येत असून त्याच दिवशी पुतळा परिसरात साफसफाई करून पुतळा स्वच्छ करण्यात येतो, पण त्यानंतर पालिकेला पुतळा आणि सभोवतालचा परिसरा साफ करण्याचा विसर पडत असल्याचा आरोप तेथील काही भाजीविक्रेते आणि नागरिकांनी केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.परिसरात सुटली दुर्गंधीगोल बाजार परिसरातील टिळक पुतळ्यासमोर कुजलेल्या, सडलेल्या भाजीपाला आणि कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे बाजारात येणाºया नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून भाजीविक्री व इतर साहित्य खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे.पावसाळापूर्व नियोजन फेलपावसाळ्यापूर्वी शहरातील कचरा, नाले साफसफाई, गाळ उपसा आदी कामे नगर पालिकेकडून करण्यात येते. पण, शहरातील वर्दळीच्या असलेल्या बाजारातील घाणीचा विळखा पाहून पालिकेचे पावसाळापूर्व नियोजन फेल ठरल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस