शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांच्या गैरहजेरीचा उमेदवारांनाही बसतोय फटका

By admin | Updated: October 3, 2014 02:06 IST

केंद्र व राज्य निवडणूक आयोगाने लोकशाही बळकट व्हावीे, निवडणुका निष्कलंक पार पडाव्या यासाठी विविध उपाययोजना केल्यात़ याचाच एक भाग म्हणजे ‘आदर्श आचार संहिता’ होय़

प्रशांत हेलोंडे वर्धाकेंद्र व राज्य निवडणूक आयोगाने लोकशाही बळकट व्हावीे, निवडणुका निष्कलंक पार पडाव्या यासाठी विविध उपाययोजना केल्यात़ याचाच एक भाग म्हणजे ‘आदर्श आचार संहिता’ होय़ निवडणुकीत चालणारे अनेक गैरप्रकार या संकल्पनेमुळे बंद झालेत़ असे असले तरी उमेदवार, राजकीय पक्ष आणि पदाधिकारी, कार्यकर्तेही यातून पळवाटा काढत कायद्याबाहेर जातातच़ यावर अधिक लगाम कसण्याकरिता निवडणूक काळात परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे़ याचा फायदा गैरप्रकार टाळण्याकरिता झाला; पण काही भागात उमेदवारांना याचा फटकाही बसत आहे़ हा प्रकार ग्रामीण भागात अधिक प्रकर्षाने जाणवतो़१५ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली़ यावेळी झालेल्या चिन्हवाटपानंतर खऱ्या प्रचाराला प्रारंभ झाला़ जिल्ह्यातील चारही मतदार संघामध्ये खऱ्या अर्थाने प्रचार यंत्रणा कामी लागली असून भोंगे वाजू लागले आहेत़ या घरी, त्या घरी फिरून कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत़ प्रचार सभा, संमेलने, मेळाव्यांना प्रारंभ झाला आहे़ पत्रके वाटणे, बॅनर लावणे, पोस्टर लावणे आदी प्रकारातून प्रचार करण्यासही मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे़ हा प्रकार शहरात दिसून येत असला तरी ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी झाल्याचे तुर्तास दिसून येत आहे़ शहरांमध्ये नगर पालिका, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय यांच्यावर परवानगी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ शहरांमध्ये पालिका तसेच अन्य कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहत असल्याने सहज परवानगीही मिळत आहे; पण ग्रामीण भागात असे होताना दिसत नाही़ ग्रामीण भागात प्रचार साहित्यासाठी ग्रामसेवकांमार्फत परवानगी काढावी लागते़ यासाठी तत्सम अर्ज ग्रामसेवकांकडे सादर करावा लागतो़ यानंतर ते परवानगी देतात़ यासाठी संबंधित ग्रामसेवक उमेदवार वा त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळणे आवश्यक आहे़ गत कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत़ यामुळे अनेक गावांचा कारभार कार्यभारावरच चालविला जातो़ जिल्ह्यातील बहुतांश गावांचा कारभार कार्यभारावरच आहे़ एका ग्रामसेवकाकडे किमान तीन ते चार गावांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे़ इतकेच नव्हे तर २० ते ४० किमी अंतरावरील गावे ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आली आहेत़ यामुळे ग्रामसेवकाला आपल्या गावाचा कारभारही धड पाहता येत नाही आणि कार्यभार असलेल्या गावाकडेही लक्ष देता येत नाही़ या प्रकारामुळे गावांचा विकासही खोळंबल्याचे चित्र आहे़ आता निवडणूक असल्याने याचा फटका उमेदवार आणि कार्यकर्त्यांनाही बसत असल्याचे दिसते़ चारही मतदार संघामध्ये निवडणुकीच्या प्रचार तोफा गरजू लागल्या आहेत़ यात गावांमध्ये प्रचार करण्याकरिता ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्या परवानगीची गरज उमेदवारांना पडते़ यासाठी तत्सम अर्जही केला जातो; पण ग्रामसेवकच उपलब्ध राहत नाही़ यामुळे उमेदवारांना परवानगी प्राप्त करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसते़ ग्रामसेवकांनी तीन ते चार गावांचा कार्यभार असल्याने प्रत्येक गावात दिवस ठरविले आहेत़ त्याच दिवसावर ग्रामसेवक त्या गावात जातात़ त्या दिवशी मुख्यालयाचे बोलवणे आल्यास सदर गावात पूढील आठवड्यात पोहोचतात़ यामुळे ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी ताटकळावे लागते़ हा प्रकार आता उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतही घडत असल्याचे दिसून येत आहे़ परवानगीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व कधीकाळी उमेदवारांनाही चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे़निवडणूक प्रचारासाठी अत्यल्प कालावधी असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहेत़ या धावपळीत परवानगीच घ्यायची राहिल्याने अनेकांची गोची होत असल्याचे दिसते़ असे असले तरी उमेदवारांना परवानगी घेऊनच प्रचार करावा लागणार आहे़ अन्यथा आचार संहिता भंग केल्याबाबतचा गुन्हा दाखल होईल, हे निश्चित!