शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

यंदा वाढते तापमान चुकविणार बाष्पीभवनाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 18:17 IST

Wardha News दिवसेंदिवस वाढत असलेले जिल्ह्याचे तापमान यंदा वर्धा पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणात येणाऱ्या जलाशयातील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाजच चुकविणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

ठळक मुद्देजलाशयांतील पाण्याची होणार वाफ

वर्धा : होळी सणानंतर जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. ऐरवी मे महिन्यात जिल्ह्यात जिवाची काहिली करणारे ऊन राहते; पण यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच मे हिटचा अनुभव वर्धेकरांना येत असल्याचे वास्तव आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेले जिल्ह्याचे तापमान यंदा वर्धा पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणात येणाऱ्या जलाशयातील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाजच चुकविणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम जलाशयांत समाधानकारक जलसाठा असल्याचे सांगितले जात असले तरी जलाशयांमधील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाज चुकल्यास वर्धेकरांना पावसाळ्यापूर्वी पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. परिणामी उपलब्ध जलसाठ्याचे तातडीने योग्य नियोजन करण्याचे, तसेच प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात अकरा मोठे व मध्यम जलाशय

जिल्ह्यात बोर, निम्न वर्धा, धाम, पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन प्रकल्प, मदन उन्नई, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी, असे एकूण अकरा मोठे व मध्यम जलायश आहेत. हीच जलाशय वर्धा जिल्ह्यातील नागरिकांची तृष्णातृप्ती करतात.

धाम वर्धेकरांसाठी आधारवड

महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील किमान २० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढतो. त्यामुळे हा प्रकल्प वर्धेकरांसाठी आधारवडच आहे; पण याच जलाशयातील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढत्या उन्हामुळे वाफ झाल्यास वर्धेकरांवर जलसंकटच ओढावणार आहे.

धामच्या पाण्याची पळवापळवी, तरी अधिकारी मूग गिळून

यंदाच्या वर्षी धाम प्रकल्पातून सिंचनासाठी तीन वेळा पाणी सोडण्यात आले आहे. आता केवळ पिण्यासाठीच पाणी सोडले जाणार आहे; पण पिण्यासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याची उचल काही कारखाने व कंपन्या करीत असतानाही वर्धा पाटबंधारे विभागाचे अधिकारी मूग गिळून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

महिला अधिकाऱ्याला वर्धेला यायची ॲलर्जी

वर्धा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता सुनील रहाणे हे सेवानिवृत्त झाल्यावर येथील कामकाजाचा प्रभार नागपूर येथील महिला अधिकारी नीतू चव्हाण यांना देण्यात आला आहे; पण या महिला अधिकारी वर्धा येथील कार्यालयात येतच नसल्याची ओरड सध्या वर्धा पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

 

 

टॅग्स :Waterपाणी