शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

यंदा वाढते तापमान चुकविणार बाष्पीभवनाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 18:17 IST

Wardha News दिवसेंदिवस वाढत असलेले जिल्ह्याचे तापमान यंदा वर्धा पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणात येणाऱ्या जलाशयातील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाजच चुकविणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

ठळक मुद्देजलाशयांतील पाण्याची होणार वाफ

वर्धा : होळी सणानंतर जिल्ह्यातील तापमानात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. ऐरवी मे महिन्यात जिल्ह्यात जिवाची काहिली करणारे ऊन राहते; पण यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच मे हिटचा अनुभव वर्धेकरांना येत असल्याचे वास्तव आहे.

दिवसेंदिवस वाढत असलेले जिल्ह्याचे तापमान यंदा वर्धा पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणात येणाऱ्या जलाशयातील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाजच चुकविणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम जलाशयांत समाधानकारक जलसाठा असल्याचे सांगितले जात असले तरी जलाशयांमधील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाज चुकल्यास वर्धेकरांना पावसाळ्यापूर्वी पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. परिणामी उपलब्ध जलसाठ्याचे तातडीने योग्य नियोजन करण्याचे, तसेच प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात अकरा मोठे व मध्यम जलाशय

जिल्ह्यात बोर, निम्न वर्धा, धाम, पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन प्रकल्प, मदन उन्नई, लाल नाला प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी, असे एकूण अकरा मोठे व मध्यम जलायश आहेत. हीच जलाशय वर्धा जिल्ह्यातील नागरिकांची तृष्णातृप्ती करतात.

धाम वर्धेकरांसाठी आधारवड

महाकाळी येथील धाम प्रकल्प जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील किमान २० गावांमधील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढतो. त्यामुळे हा प्रकल्प वर्धेकरांसाठी आधारवडच आहे; पण याच जलाशयातील जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढत्या उन्हामुळे वाफ झाल्यास वर्धेकरांवर जलसंकटच ओढावणार आहे.

धामच्या पाण्याची पळवापळवी, तरी अधिकारी मूग गिळून

यंदाच्या वर्षी धाम प्रकल्पातून सिंचनासाठी तीन वेळा पाणी सोडण्यात आले आहे. आता केवळ पिण्यासाठीच पाणी सोडले जाणार आहे; पण पिण्यासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याची उचल काही कारखाने व कंपन्या करीत असतानाही वर्धा पाटबंधारे विभागाचे अधिकारी मूग गिळून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

महिला अधिकाऱ्याला वर्धेला यायची ॲलर्जी

वर्धा पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता सुनील रहाणे हे सेवानिवृत्त झाल्यावर येथील कामकाजाचा प्रभार नागपूर येथील महिला अधिकारी नीतू चव्हाण यांना देण्यात आला आहे; पण या महिला अधिकारी वर्धा येथील कार्यालयात येतच नसल्याची ओरड सध्या वर्धा पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

 

 

टॅग्स :Waterपाणी