शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

उद्योजक जीएसटी परतावा अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:17 IST

उद्योग विभागाकडून उद्योजकांसाठी पॅकेज स्किम आॅफ इन्सेटिव्ह २०१३ अंतर्गत एसजीएसटी पात्र उद्योगांना परत मिळतो. त्याकरिता उद्योजकांनी उद्योग विभागाकडे आॅनलाईन अर्ज करून त्याची उद्योग विभागाने शहानिशा केल्यावर पात्र उद्योजकांना एसजीएसटी परत मिळतो. परंतु, २०१७-१८ व २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपले असतानासुद्धा आॅनलाईन फॉर्म उपलब्ध झाले नसल्याने दोन वर्षांपासून उद्योजक एसजीएसटी परतावा अनुदानापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देआॅनलाईन फॉर्मच नाही : एमआयडीसी असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उद्योग विभागाकडून उद्योजकांसाठी पॅकेज स्किम आॅफ इन्सेटिव्ह २०१३ अंतर्गत एसजीएसटी पात्र उद्योगांना परत मिळतो. त्याकरिता उद्योजकांनी उद्योग विभागाकडे आॅनलाईन अर्ज करून त्याची उद्योग विभागाने शहानिशा केल्यावर पात्र उद्योजकांना एसजीएसटी परत मिळतो. परंतु, २०१७-१८ व २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपले असतानासुद्धा आॅनलाईन फॉर्म उपलब्ध झाले नसल्याने दोन वर्षांपासून उद्योजक एसजीएसटी परतावा अनुदानापासून वंचित आहेत.त्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज उद्योजकांचे फार नुकसान होत आहे. कोटी रूपये उद्योजकांना उद्योग विभागाकडून घेणे आहे. त्याकरिता राज्यपातळीवर कुठलीही कार्यवाही केली जात नाही. ती कार्यवाही तात्काळ व्हावी व उद्योजकांना अनुदान तत्काळ उपलब्ध व्हावे, याबाबत जिल्हा उद्योगमित्र समितीच्या सभेत वर्धा एमआयडीसी इंडस्ट्रियलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी जिल्हा उद्योगमित्र समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना केली.वर्धा एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना उद्योगासाठी अविकसित भूखंडांचे वितरण एमआयडीसीतर्फे उद्योग उभारण्यासाठी करण्यात आले होते. त्यापैकी जी लेआऊट आॅगस्ट २०१४ ला विकसित केले, तर एफ लेआऊट मे २०१५ ला विकसित केले. ज्यामध्ये पाणी, रस्ते व इतर सुविधा एमआयडीसीने उपलब्ध करून दिल्यात. भूखंडांना विकसित तारखेपासून ५ वर्षे उद्योजकांना विनाशुल्क मुदतवाढ देण्यात यावी, उद्योजकांना सध्या भूखंडाच्या वितरीत तारखेपासून ५ वर्षे समजून नंतरच्या कालावधीसाठी एमआयडीसी शुल्क आकारत आहे, ते नियमबाह्य आहे, ते तात्काळ थांबवावे, याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जीएसटी परताव्याबाबत उद्योजकांच्या तक्रारी उद्योग विभागाच्या संबंधितांना कळविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका बावणकुळे यांना निर्देश दिले.