शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक जीएसटी परतावा अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:17 IST

उद्योग विभागाकडून उद्योजकांसाठी पॅकेज स्किम आॅफ इन्सेटिव्ह २०१३ अंतर्गत एसजीएसटी पात्र उद्योगांना परत मिळतो. त्याकरिता उद्योजकांनी उद्योग विभागाकडे आॅनलाईन अर्ज करून त्याची उद्योग विभागाने शहानिशा केल्यावर पात्र उद्योजकांना एसजीएसटी परत मिळतो. परंतु, २०१७-१८ व २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपले असतानासुद्धा आॅनलाईन फॉर्म उपलब्ध झाले नसल्याने दोन वर्षांपासून उद्योजक एसजीएसटी परतावा अनुदानापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देआॅनलाईन फॉर्मच नाही : एमआयडीसी असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उद्योग विभागाकडून उद्योजकांसाठी पॅकेज स्किम आॅफ इन्सेटिव्ह २०१३ अंतर्गत एसजीएसटी पात्र उद्योगांना परत मिळतो. त्याकरिता उद्योजकांनी उद्योग विभागाकडे आॅनलाईन अर्ज करून त्याची उद्योग विभागाने शहानिशा केल्यावर पात्र उद्योजकांना एसजीएसटी परत मिळतो. परंतु, २०१७-१८ व २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपले असतानासुद्धा आॅनलाईन फॉर्म उपलब्ध झाले नसल्याने दोन वर्षांपासून उद्योजक एसजीएसटी परतावा अनुदानापासून वंचित आहेत.त्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज उद्योजकांचे फार नुकसान होत आहे. कोटी रूपये उद्योजकांना उद्योग विभागाकडून घेणे आहे. त्याकरिता राज्यपातळीवर कुठलीही कार्यवाही केली जात नाही. ती कार्यवाही तात्काळ व्हावी व उद्योजकांना अनुदान तत्काळ उपलब्ध व्हावे, याबाबत जिल्हा उद्योगमित्र समितीच्या सभेत वर्धा एमआयडीसी इंडस्ट्रियलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी जिल्हा उद्योगमित्र समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना केली.वर्धा एमआयडीसी परिसरातील उद्योजकांना उद्योगासाठी अविकसित भूखंडांचे वितरण एमआयडीसीतर्फे उद्योग उभारण्यासाठी करण्यात आले होते. त्यापैकी जी लेआऊट आॅगस्ट २०१४ ला विकसित केले, तर एफ लेआऊट मे २०१५ ला विकसित केले. ज्यामध्ये पाणी, रस्ते व इतर सुविधा एमआयडीसीने उपलब्ध करून दिल्यात. भूखंडांना विकसित तारखेपासून ५ वर्षे उद्योजकांना विनाशुल्क मुदतवाढ देण्यात यावी, उद्योजकांना सध्या भूखंडाच्या वितरीत तारखेपासून ५ वर्षे समजून नंतरच्या कालावधीसाठी एमआयडीसी शुल्क आकारत आहे, ते नियमबाह्य आहे, ते तात्काळ थांबवावे, याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. जीएसटी परताव्याबाबत उद्योजकांच्या तक्रारी उद्योग विभागाच्या संबंधितांना कळविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका बावणकुळे यांना निर्देश दिले.