शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणोत्सवात बालकांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST

कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिक्षकांकडून शाळेत आलेल्या बालकांचे तापमान मोजून आत प्रवेश दिला. त्यासोबत वर्गामध्ये एका बाकावर एक याप्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली. सामाजिक अंतरासोबतच नियमित हात धुणे, तोंडावर मास्क आणि सोबत पाण्याची बॉटल आणण्याच्याही सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांनुसार पहिल्या दिवशी बालके शाळेमध्ये उपस्थित झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : साधारणत: दीड वर्षानंतर शाळांची घंटा वाजली असून, आता ऑनलाइन शिक्षणाला ब्रेक लागून ऑफलाइन शिक्षण सुरू होणार आहे. आज पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंत तब्बल ६२७ शाळा सुरू झाल्या. या शिक्षणोत्सवामध्ये बालकांचा मोठा उत्साह दिसून आला. शाळांमध्ये शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले, तसेच कोरोनाच्या नियमावलीचेही काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आले.कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी घरातच कोंडून असल्याने त्यांना शाळेत रमता आले नाही. शाळेतील शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी यांच्यापासूनही विद्यार्थी बरेच दूर गेले आहे; पण आता शाळांचा पहिला ठोका पडला आणि नवचैतन्याचे कोंब पुन्हा शाळेमध्ये उड्या मारू लागले. पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये किलबिलाट सुरू केला.कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिक्षकांकडून शाळेत आलेल्या बालकांचे तापमान मोजून आत प्रवेश दिला. त्यासोबत वर्गामध्ये एका बाकावर एक याप्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली. सामाजिक अंतरासोबतच नियमित हात धुणे, तोंडावर मास्क आणि सोबत पाण्याची बॉटल आणण्याच्याही सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनांनुसार पहिल्या दिवशी बालके शाळेमध्ये उपस्थित झाली. जिल्ह्यामध्ये पाचवी ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी अशा एकूण ३७७ शाळा पहिल्या दिवशी सुरू करण्यात आल्या. सोबतच नववी ते बारावीपर्यंत २५० अशा एकूण ६२७ शाळा सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पहिल्या दिवशी शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांसह उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी शाळांना भेटी देऊन उपस्थितीचा आढावा घेतला.  

पालकांना आग्रह करा, सक्ती नाहीकोरोना संकट अजूनही कायम असून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये रुळविण्यासाठी चांगली दमछाक होणार आहे. दररोज शाळेत विद्यार्थ्यांचा तापही मोजावा लागणार असल्याने अध्यापनासोबतच डॉक्टरांचीही भूमिका निभवावी लागेल. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकांना आग्रह करावा पण, सक्ती करू नये असेही निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे पालकांनीच आता पाल्यासंदर्भात योग्य निर्णय घ्यायचा आहे.

गुणवंतांचा सन्मान, बालकांचे स्वागतपहिल्या दिवशी विद्यार्थीही शाळेच्या गणवेशामध्ये उपस्थित झाले होते. सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच या बालकांना चॉकलेट देऊन त्यांचे तोंडही गोड करण्यात आले. शाळेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. वर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, सेलू (काटे) येथील प्राची जगदीश येंडे ही विद्यार्थिनी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी पं. स. सभापती महेश आगे, विस्तार अधिकारी सुरेश हजारे, केंद्र प्रमुख वसंत खोडे, प्राचीचे आई-वडील आणि शिक्षकांची उपस्थिती होती.

शाळा बंद, पण शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य- ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या तर, शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा अद्यापही बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. पण, शाळा बंद आणि ऑनलाइन शिक्षण सुरू असताना या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची शाळांमध्ये शतप्रतिशत उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. - आता वर्ग जरी बंद असले तरीही या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे.

या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्या !- राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे आजपासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे आता वर्ग सुरू होऊन त्यांचे ऑफलाइन शिक्षण सुरू होणार आहे. - परंतु ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात कोणतेही निर्देश नसल्याने या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे. आवश्यकतेनुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन मार्गदर्शन करावे असे निर्देश देण्यात आलेत.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या