शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

आर्वीच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: April 24, 2016 02:20 IST

शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते

वाहतुकीचा बोजवारा : वाहन चालकांना मनस्तापआर्वी : शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते सध्या शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे.आर्वी शहराच्या मुख्य व रहदारीच्या मार्गावरून जड वाहनांचा राज्यमार्ग जात असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा तोकडी पडत आहे. द्रुगवाडा-पुलगाव-आर्वी-हैदराबाद हा राज्यमार्ग आर्वीतून जातो. यात आर्वी मार्गे पुलगाव हैदराबादला जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे रस्ते गर्दीने गजबजत असल्याचे दृष्य सर्वत्र पहायला मिळते. याच मार्गावर सर्व शासकीय कार्यालये आहेत. तहसील व न. प. कार्यालयासमोर सध्या फेरीवाले आणि हातगाडी दुकानदारांचे अतिक्रमण वाढले आहे. शिवाजी चौक हा शहरातील मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. पोलीस विभागाच्यावतीने या मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी व जड वाहनांना शहरात येण्यापासून मज्जाव करण्यासाठी वाहतूक कर्मचारी असणे गरजेचे आहे. यात रहदारीच्या मुख्य मार्गावरून भरधाव जड वाहने देऊरवाडा मार्गे धावतात. यात शिवाजी चौकासमोरील शासकीय कार्यालयासमोर रहदारीच्या रस्त्यावर हातफेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यात बरेचदा किरकोळ अपघातही होतात. तसेच यामुळे शहरातील मुख्य रस्त्याला बकाल स्वरूप आले आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या मार्गावरही फेरीवाले व हातगाडी चालकांचे अतिक्रमण वाढला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सदर अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. यात सुनील कटियारी, रामनाथ गुरूनाथसिंगाणी, सुनील वधवा, किसन कोडवानी, महेश करतारी, सोनू मोटवानी, आदी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत सदर मागणी केली आहे. यात पालिका प्रशासन व पोलीस विभाग याची संयुक्त कारवाई होणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)