शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
6
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
8
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
9
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
10
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
11
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
12
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
13
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
14
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
15
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
16
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
17
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
18
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
19
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
20
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

आर्वीच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: April 24, 2016 02:20 IST

शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते

वाहतुकीचा बोजवारा : वाहन चालकांना मनस्तापआर्वी : शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते सध्या शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे.आर्वी शहराच्या मुख्य व रहदारीच्या मार्गावरून जड वाहनांचा राज्यमार्ग जात असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा तोकडी पडत आहे. द्रुगवाडा-पुलगाव-आर्वी-हैदराबाद हा राज्यमार्ग आर्वीतून जातो. यात आर्वी मार्गे पुलगाव हैदराबादला जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे रस्ते गर्दीने गजबजत असल्याचे दृष्य सर्वत्र पहायला मिळते. याच मार्गावर सर्व शासकीय कार्यालये आहेत. तहसील व न. प. कार्यालयासमोर सध्या फेरीवाले आणि हातगाडी दुकानदारांचे अतिक्रमण वाढले आहे. शिवाजी चौक हा शहरातील मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. पोलीस विभागाच्यावतीने या मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी व जड वाहनांना शहरात येण्यापासून मज्जाव करण्यासाठी वाहतूक कर्मचारी असणे गरजेचे आहे. यात रहदारीच्या मुख्य मार्गावरून भरधाव जड वाहने देऊरवाडा मार्गे धावतात. यात शिवाजी चौकासमोरील शासकीय कार्यालयासमोर रहदारीच्या रस्त्यावर हातफेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यात बरेचदा किरकोळ अपघातही होतात. तसेच यामुळे शहरातील मुख्य रस्त्याला बकाल स्वरूप आले आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या मार्गावरही फेरीवाले व हातगाडी चालकांचे अतिक्रमण वाढला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सदर अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. यात सुनील कटियारी, रामनाथ गुरूनाथसिंगाणी, सुनील वधवा, किसन कोडवानी, महेश करतारी, सोनू मोटवानी, आदी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत सदर मागणी केली आहे. यात पालिका प्रशासन व पोलीस विभाग याची संयुक्त कारवाई होणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)