शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीच्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: April 24, 2016 02:20 IST

शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते

वाहतुकीचा बोजवारा : वाहन चालकांना मनस्तापआर्वी : शहराची वाढती लोकसंख्या व आर्वी परिसरात तालुक्यातील गावांचा होत असलेला विस्तार यामुळे रहदारीचे रस्ते सध्या शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे.आर्वी शहराच्या मुख्य व रहदारीच्या मार्गावरून जड वाहनांचा राज्यमार्ग जात असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा तोकडी पडत आहे. द्रुगवाडा-पुलगाव-आर्वी-हैदराबाद हा राज्यमार्ग आर्वीतून जातो. यात आर्वी मार्गे पुलगाव हैदराबादला जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. लोकसंख्या वाढत असल्याने वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे रस्ते गर्दीने गजबजत असल्याचे दृष्य सर्वत्र पहायला मिळते. याच मार्गावर सर्व शासकीय कार्यालये आहेत. तहसील व न. प. कार्यालयासमोर सध्या फेरीवाले आणि हातगाडी दुकानदारांचे अतिक्रमण वाढले आहे. शिवाजी चौक हा शहरातील मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. पोलीस विभागाच्यावतीने या मार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी व जड वाहनांना शहरात येण्यापासून मज्जाव करण्यासाठी वाहतूक कर्मचारी असणे गरजेचे आहे. यात रहदारीच्या मुख्य मार्गावरून भरधाव जड वाहने देऊरवाडा मार्गे धावतात. यात शिवाजी चौकासमोरील शासकीय कार्यालयासमोर रहदारीच्या रस्त्यावर हातफेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यात बरेचदा किरकोळ अपघातही होतात. तसेच यामुळे शहरातील मुख्य रस्त्याला बकाल स्वरूप आले आहे. शिवाजी चौक ते गांधी चौक या मार्गावरही फेरीवाले व हातगाडी चालकांचे अतिक्रमण वाढला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सदर अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. यात सुनील कटियारी, रामनाथ गुरूनाथसिंगाणी, सुनील वधवा, किसन कोडवानी, महेश करतारी, सोनू मोटवानी, आदी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत सदर मागणी केली आहे. यात पालिका प्रशासन व पोलीस विभाग याची संयुक्त कारवाई होणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)