शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

२८३.६५ हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:16 IST

वर्धा वन परिक्षेत्रातील सुमारे २८३.७५ हेक्टरवरील वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रण कायम आहे. सदर अतिक्रमण वेळीच हटविणे क्रमप्राप्त असताना अतिक्रमण काढण्याबाबतचे अनेक प्र्रकरणे उप वनसंरक्षक कार्यालयात प्रलंबित आहेत. तर काही अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देकाही प्रकरणे न्यायालयात : अनेक प्रस्ताव प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा वन परिक्षेत्रातील सुमारे २८३.७५ हेक्टरवरील वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रण कायम आहे. सदर अतिक्रमण वेळीच हटविणे क्रमप्राप्त असताना अतिक्रमण काढण्याबाबतचे अनेक प्र्रकरणे उप वनसंरक्षक कार्यालयात प्रलंबित आहेत. तर काही अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.वर्धा वन परिक्षेत्रात वर्धा, देवळी, हिंगणघाट तालुक्यांचा समावेश असून वर्धा तालुक्यातील ८३.७६ हेक्टर, देवळी ३६.५० हेक्टर तर हिंगणघाट तालुक्यातील २१३.४९ हेक्टरवरील वन जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. तशी नोंदही वन विभागाने घेतली आहे. हिंगणघाट तालुक्यातील मौजा पारडी येथील सुमारे ६८ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढले असले तरी सध्यास्थितीत या वन परिक्षेत्रातील तब्बल २८३ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण काढणे अद्यापही शिल्लक आहे.पारडी शिवारातील ६८ हेक्टरवरील अतिक्रमण काढलेहिंगणघाट तालुक्यातील पारडी शिवारातील झुडपी जंगल क्षेत्रात अतिक्रमण करण्यात आल्याने सुरूवातीला वन गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी पुढील कागदोपत्री कार्यवाही करीत असता अतिक्रमण धारकाने दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर वर्धा येथे धाव घेतली. त्यावर न्यायाधीश ध.य. काळे यांनी अतिक्रमण धारकाचा अर्ज खारीज केला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी झुडपी जंगल सर्व्हे क्र. ४३/२, ४५, ४६, ५०, ५५, ५८, ५९, ६०, ६२/२ वरिल एकूण ६८ हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढले.असे काढले जातेय अतिक्रमणवन विभागाच्या बिट रक्षकाच्या निदर्शनास वन क्षेत्रावर अतिक्रमण असल्याचे खात्री झाल्यावर प्रथम वन गुन्हा दाखल केला जातो.वन गुन्हा दाखल झाल्यानंतर क्षेत्र सहाय्यक अथवा वन परिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण धारकांकडून पुरावे घेत चौकशी करतात.सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी यांनी प्रकरणाची चौकशी करताना अतिक्रमण धारकास पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावणे क्रमप्राप्त आहे.शिवाय अतिक्रमण धारकांकडून सदर पुरावे गोळा करून त्यांचे बयान नोंदविणे गरजेचे असते.प्रकरणाची चौकशी करून सदर अधिकारी विभागीय कार्यालयात आपला अहवाल सादर करतात.अतिक्रमण धारकाकडे अतिक्रमीत जागेबाबत पुरावे नसतील तर सहाय्यक वनसंरक्षक त्याबाबत अतिक्रमण निष्काशित करण्याचे आदेश करतील.हा आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी अतिक्रमण धारकास सात दिवसाच्या आत अतिक्रमण स्वत: काढण्याच्या लेखी सुचना देतील.वर्धा वन परिक्षेत्रातील हिंगणघाट तालुक्यातील पारडी शिवारातील सुमारे ६८ हेक्टरवरील अतिक्रमण नुकतेच आम्ही काढले आहे. उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी कागदोपत्री कार्यवाही सुरू असून वरिष्ठांच्या सूचना प्राप्त होताच युद्धपातळीवर काम केले जाईल.- सागर बन्सोड, वन परिक्षेत्र अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगल