शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा

By admin | Updated: December 6, 2014 00:27 IST

यंदाच्या हंगामात आर्वी उपविभागातील शेतकऱ्यांवर नापिकीचा सामना करावा लागला. अशातच शासनाकडून शेतमालाला अत्यल्प दर देण्यात येत आहे.

आर्वी : यंदाच्या हंगामात आर्वी उपविभागातील शेतकऱ्यांवर नापिकीचा सामना करावा लागला. अशातच शासनाकडून शेतमालाला अत्यल्प दर देण्यात येत आहे. यामतुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने तत्काळ मदत देण्याची मागणी एका निवेदनातून आर्वी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी विलास ठाकरे यांना केली आहे. आर्वी उपविभागात झालेला अपूरा पाऊस कापसाला योग्य भाव नाही, सोयाबीनची नापिकी व राज्य शासनाने पुरेसे कापूस संकलन केंद्र सुर नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यशासनाच्यावतीने तातडीने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, राज्यात दृष्काळी परिस्थिती असताना भाजपाचे व मंत्री मात्र दौरे करतात. यापुर्वी राज्यात काँग्रेसचे सरकार असताना राज्यातील शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले होते; परंतु विद्यमान राज्यसरकार शेतकऱ्यांना न्याय द्यायला तयार नाही. दृष्काळमध्ये विदर्भातील शेतकरी होरपळून निघत असून केंद्राचे पथक अद्याप दृष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले नाही. मराठवड्याप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांची स्थिती भयावह असून आत्महत्या करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध नाही. यामुळे शासनाने तातडीने त्यांना मदत जाहीर करावी. सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये, कापसाला सहा हजार रुपये क्विंटलचा दर द्यावा, फळबाग शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्यावी. तसेच जवखेड हत्याकांडाची तातडीने चौकशी करावी आदी मागण्यांचे निवेदन आर्वी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी कमिटीचे प्रा. पंकज वाघमारे, जि.प. सदस्य गजानन गावंडे, प्रा. दापूरकर, ज्ञानेश्वर पडोळे, राजू रत्नपारखी, मधू सवाळे, कृष्णा जाधव, सुधीर वाकोडकर, विलास देशमुख, न.प. सदस्य पे्रमराज पालीवाल, रियाज अन्सारी, शिल्पा चव्हाण, वनमाला निखाडे, कांचन लोहे, लता मोहोड, अश्विन शेंडे, प्रकाश समराम, अतुल खोंडे, राजू भांगे, विशाल साबळे, सागर शिरपूरकर, स्वप्नील तुमस्कर, अभिजित ढाकरेसह कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)