शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

४० दुकानदारांवर रोजगाराचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:00 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ चे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे सेलू तालुक्यातील खडकी येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील ४० दुकानदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाचे काम : पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३६१ चे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे सेलू तालुक्यातील खडकी येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरातील ४० दुकानदारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सदर रस्ता काम करण्याची भूमिका महामार्ग बांधणी प्रशासनाने घेतली असल्याने हे दुकानदार अडचणीत आले आहे.खडकी येथे मागील २५ वर्षांपासून हनुमान मंदिर परिसरात हॉटेल, चहा टपरी, पानठेला व विविध लहान दुकाने लावून आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह ४० लोक करीत होते. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ बुट्टीबोरी ते औरंगाबाद रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या परिसरातील हे दुकान हटविले जाणार आहे. सदर दुकाने हे शेतजमिनीच्या जागेवर शेतमालकांकडून भाडेतत्वावर जागा घेवून चालविण्यात येत होते. या शेताच्या जागेचा मोबदला शेतमालकाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आला आहे. मात्र गेल्या २५ वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या या लोकांना कुठलाही मोबदला देण्यात आलेला नाही. आमचे पुनर्वसन गावठाणाच्या जागेवर करून द्या, अशी मागणी या व्यवसायिकांनी केली आहे. ग्रामपंचायत खडकी आमगावच्या सरपंच व सचिवाकडे याबाबत निवेदनही ४० व्यवसायिकांनी दिलेले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महामार्गाचे काम होणार असल्याने आमच्या पोटापाण्याचा व्यवसाय जाणार आहे, त्यामुळे आम्हाला खडकी आमगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंदिरसमोरील उत्तरेकडील शेत सर्व्हे नं. १३/१ या ठिकाणी गावठाणावर पुनर्वसन करण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीने ठराव करून पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. परंतु याबाबत काहीही हालचाल करण्यात आलेली नाही, अशी माहिती या व्यवसायिकांनी दिली.आमदारांनी दिले नितीन गडकरींना पत्रबुट्टीबोरी ते औरंगाबाद या महामार्गाचे रुंदीकरण होत असल्याने खडकी येथील व्यवसायिकांचा व्यवसाय बंद होणार आहे. त्यामुळे या नागरिकांना रस्त्याच्या दक्षिणेकडील शेतात गावठाण व व्यवसायाकरिता जागा देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्र देवून केली आहे.आमच्या वडिलोपार्जीत जागेवर ४० वर्षांपासून व्यवसाय करण्यात येत आहे. यावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. सदर व्यवसाय हा रस्त्यालगत असल्याने तो रस्त्याच्या कामामुळे बंद होणार आहे. त्यामुळे दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. त्यामुळे पुनर्वसन करून देण्यात यावे.- इकबाल खान, व्यावसायिक, खडकी-आमगाव.

टॅग्स :TempleमंदिरNational Highwayराष्ट्रीय महामार्ग