शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

कर्मचाऱ्यांचा संप मिटेना, लालपरी धावेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसातच हा संप पुकारल्याने महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा टप्प्याटप्प्यात बंद करण्यात आली. वर्धा आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केले. गेल्या २४ दिवसांपासून हा संप सुरू असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांचा रोष आणि अडचणी लक्षात घेता महामंडळाने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून २४ तासात रुजू होण्याच्या सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या मागणीकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. शासनाकडून वारंवार कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले जात आहे; पण, कर्मचारी संपावर कायम असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यासोबतच महामंडळालाही मोठा आर्थिक फटका  बसत आहे. यातून सध्यातरी काही तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने लालपरी अद्यापही आगारातच बंद झाली आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसातच हा संप पुकारल्याने महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा टप्प्याटप्प्यात बंद करण्यात आली. वर्धा आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केले. गेल्या २४ दिवसांपासून हा संप सुरू असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांचा रोष आणि अडचणी लक्षात घेता महामंडळाने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून २४ तासात रुजू होण्याच्या सूचना केल्या. पण, कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वर्धा विभागातील पाचही आगारामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या ६१ चालक-वाहकांपैकी ४९ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. यामध्ये ५ चालक तर ४४ वाहकांचा समावेश आहे. विभागीय कार्यालयाकडून सर्व ६१ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून किती जणांना नोटीस प्राप्त झाला, याची माहिती घेतली. नोटीस मिळाल्यानंतरही कर्मचारी कामावर रुजू न झाल्याने ४९ जणांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर उर्वरित १२ कर्मचाऱ्यांचीही येत्या दिवसात सेवा समाप्तीचे आदेश काढले जाईल, असे सांगण्यात आले. 

६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईदिवाळीच्या हंगामात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने महामंडळाने त्यांच्या महागाई व घरभाडे भत्त्याची मागणी लागलीच मान्य केली. पण, लगेच दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, ही मागणी घेऊन आंदोलन कायम ठेवल्याने लालपरीची चाके ठप्प पडली. प्रवाशांचे हाल आणि उत्पादनात होणारा तोटा लक्षात घेता, कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या. पण, कर्मचारी आंदोलनावर कायम  असल्याने सुरुवातीला पाचही आगारातील ६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

वर्धा विभागांतर्गत पाचही आगारामध्ये रोजंदारीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना १६ नोव्हेंबरला नोटीस बजावून २४ तासात कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या होत्या. पण, ते कर्मचारी कामावर रुजू झाले नसल्याने ४९ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले. उर्वरित १२ चालक-वाहकांना नोटीस मिळाली की नाही याची शहानिशा करून कारवाई केली जाईल.- चेतन हसबनीस, विभागीय नियंत्रक.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप