शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांचा संप मिटेना, लालपरी धावेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसातच हा संप पुकारल्याने महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा टप्प्याटप्प्यात बंद करण्यात आली. वर्धा आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केले. गेल्या २४ दिवसांपासून हा संप सुरू असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांचा रोष आणि अडचणी लक्षात घेता महामंडळाने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून २४ तासात रुजू होण्याच्या सूचना केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या मागणीकरिता २८ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. शासनाकडून वारंवार कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले जात आहे; पण, कर्मचारी संपावर कायम असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. यासोबतच महामंडळालाही मोठा आर्थिक फटका  बसत आहे. यातून सध्यातरी काही तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने लालपरी अद्यापही आगारातच बंद झाली आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसातच हा संप पुकारल्याने महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा टप्प्याटप्प्यात बंद करण्यात आली. वर्धा आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केले. गेल्या २४ दिवसांपासून हा संप सुरू असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांचा रोष आणि अडचणी लक्षात घेता महामंडळाने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून २४ तासात रुजू होण्याच्या सूचना केल्या. पण, कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वर्धा विभागातील पाचही आगारामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या ६१ चालक-वाहकांपैकी ४९ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. यामध्ये ५ चालक तर ४४ वाहकांचा समावेश आहे. विभागीय कार्यालयाकडून सर्व ६१ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून किती जणांना नोटीस प्राप्त झाला, याची माहिती घेतली. नोटीस मिळाल्यानंतरही कर्मचारी कामावर रुजू न झाल्याने ४९ जणांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर उर्वरित १२ कर्मचाऱ्यांचीही येत्या दिवसात सेवा समाप्तीचे आदेश काढले जाईल, असे सांगण्यात आले. 

६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईदिवाळीच्या हंगामात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने महामंडळाने त्यांच्या महागाई व घरभाडे भत्त्याची मागणी लागलीच मान्य केली. पण, लगेच दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, ही मागणी घेऊन आंदोलन कायम ठेवल्याने लालपरीची चाके ठप्प पडली. प्रवाशांचे हाल आणि उत्पादनात होणारा तोटा लक्षात घेता, कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या. पण, कर्मचारी आंदोलनावर कायम  असल्याने सुरुवातीला पाचही आगारातील ६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

वर्धा विभागांतर्गत पाचही आगारामध्ये रोजंदारीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना १६ नोव्हेंबरला नोटीस बजावून २४ तासात कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या होत्या. पण, ते कर्मचारी कामावर रुजू झाले नसल्याने ४९ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले. उर्वरित १२ चालक-वाहकांना नोटीस मिळाली की नाही याची शहानिशा करून कारवाई केली जाईल.- चेतन हसबनीस, विभागीय नियंत्रक.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप