शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

वर्ध्यात कोविड मृत्यू नियंत्रणासाठी चाचणीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 15:45 IST

वर्धा जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२२ हजार ५२३ चाचण्या२१ हजार ४६० व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसूत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मागील काही महिन्यांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाची एन्ट्री झाली असून कोविड मृत्यू नियंत्रणासाठी कोरोना चाचणीवर भर दिला जात आहे. आतापर्यंत आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन या दोन पद्धतींचा अवलंब करून जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची टेस्ट करण्यात आली आहे. या कोविड चाचणी केलेल्यांमध्ये जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचाही समावेश आहे.

शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळता येतो, हे लक्षात आल्यावर आरोग्य विभाग पुन्हा नव्या जोमाने कामाला लागला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अ‍ॅन्टिजेन किटद्वारे ६ हजार १२१ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी २८१ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह तर ५ हजार ८४० व्यक्तींचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. तर १६ हजार ४०२ व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७८२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तसेच १५ हजार ६२० व्यक्तींचा अहवाल कोविड निगेटिव्ह आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस