शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चेकपोस्टवर ई-पास ठरतेय कागदी घोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

कोविडचा वाढत्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना ई-पास क्रमप्राप्त केली आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या कामासाठीच ही ई-पास मिळणार असली तरी सध्याच्या संचारबंदीच्या काळात अगदी साध्या-साध्या कामासाठीही अनेक व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनांनी जात आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या सीमेवरील वास्तव : विना विचारपूस करताच दिली जातेय जिल्ह्यात एन्ट्री

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास क्रमप्राप्त करण्यात आली आहे; पण जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर ई-पास कागदी घोडा ठरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. इतकेच नव्हे, तर सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दादाकडून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना साधी विचारपूसही केली जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले.कोविडचा वाढत्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना ई-पास क्रमप्राप्त केली आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या कामासाठीच ही ई-पास मिळणार असली तरी सध्याच्या संचारबंदीच्या काळात अगदी साध्या-साध्या कामासाठीही अनेक व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनांनी जात आहेत. विशेष म्हणजे अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करणारी वाहने, तसेच रुग्णवाहिका यांनाच सूट देण्यात आली आहे, तर ई-पास नसलेल्यांना जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवरून परत पाठविणे क्रमप्राप्त असताना चेकपोस्टवरील कर्मचारी ये-जा करणाऱ्यांची साधी नोंदही घेत नसल्याचे दिसून आले.

खडका व कौंडण्यपुरात चेकपोस्ट नाहीदेऊरवाडा-कौंडण्यपूर मार्गाने आणि शिरपूर-जळगाव- परसोडा-बेलोरा या मार्गाने अमरावती जिल्ह्यात जाता येते. पण, तेथे अद्यापही चेकपोस्ट नाही.सेलडोह शिवारात लावले बॅरिगेट्स वर्धा-नागपूर मार्गावरील सेलडोह येथे पोलिसांकडून बॅरिगेट्स लावण्यात आले आहे. या ठिकाणी वर्धा व नागपूर जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांच्या  वाहनांची तपासणी केली जात आहे.

विदेशी दारूचीही होतेय आयातजिल्ह्यात दारूबंदी आहे. पण, सध्या संचारबंदीच्या काळात शेजारच्या जिल्ह्यांमधून छुप्या पद्धतीने विदेशी दारूची आयात दारूविक्रेते करीत आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची कसून तपासणी झाल्यास दारूच्या अवैध वाहतुकीच्या प्रकाराला ब्रेक लागणार आहे. परंतु, पोलीस प्रशासन त्यासाठी सकारात्मक नसल्याचे दिसते.

वर्धेला चार जिल्ह्यांचा वेढा

वर्धा जिल्ह्याला नागपूर, अमरावती, चंद्रपूर व यवतमाळ  जिल्ह्यांची सीमा लागून आहे. त्या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले असले तरी या ठिकाणी अनेकांचे आवागमन बिनधास्त सुरू आहे.ई-पासच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सिमेवर काही ठिकाणी तात्पूर्ती पोलीस चौकी तयार करून तेथे पोलीस आणि काही अधिकारी तैनात करण्यात आले आहे; पण तेही जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना साधी विचारपूस करीत नाहीत.  जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून मागील वर्षी जिल्हाबंदी दरम्यान आर्वी तालुक्यात सात, आष्टी पाच तर  कारजा तालुक्यात तीन ठिकाणी चेकपोस्ट होते. तर जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यात जाणाऱ्या चोरवाटा तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळात बंद करण्यात आल्या होत्या. 

मध्य प्रदेशात जाणाऱ्या मार्गावर चेकपोस्ट नाहीचआष्टी तालुक्यातील द्रुगवाडा मार्गे अमरावती जिल्हा होत मध्य प्रदेशात जाता येते. परंतु, या मार्गावर चेकपोस्टच नाही.  केवळ एका गृहरक्षकावर जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे येथे कुठल्याही वाहनाची तपासणी होत नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस