शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चेकपोस्टवर ई-पास ठरतेय कागदी घोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

कोविडचा वाढत्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना ई-पास क्रमप्राप्त केली आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या कामासाठीच ही ई-पास मिळणार असली तरी सध्याच्या संचारबंदीच्या काळात अगदी साध्या-साध्या कामासाठीही अनेक व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनांनी जात आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्याच्या सीमेवरील वास्तव : विना विचारपूस करताच दिली जातेय जिल्ह्यात एन्ट्री

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास क्रमप्राप्त करण्यात आली आहे; पण जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेकपोस्टवर ई-पास कागदी घोडा ठरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. इतकेच नव्हे, तर सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दादाकडून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांना साधी विचारपूसही केली जात नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले.कोविडचा वाढत्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना ई-पास क्रमप्राप्त केली आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या कामासाठीच ही ई-पास मिळणार असली तरी सध्याच्या संचारबंदीच्या काळात अगदी साध्या-साध्या कामासाठीही अनेक व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी वाहनांनी जात आहेत. विशेष म्हणजे अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करणारी वाहने, तसेच रुग्णवाहिका यांनाच सूट देण्यात आली आहे, तर ई-पास नसलेल्यांना जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवरून परत पाठविणे क्रमप्राप्त असताना चेकपोस्टवरील कर्मचारी ये-जा करणाऱ्यांची साधी नोंदही घेत नसल्याचे दिसून आले.

खडका व कौंडण्यपुरात चेकपोस्ट नाहीदेऊरवाडा-कौंडण्यपूर मार्गाने आणि शिरपूर-जळगाव- परसोडा-बेलोरा या मार्गाने अमरावती जिल्ह्यात जाता येते. पण, तेथे अद्यापही चेकपोस्ट नाही.सेलडोह शिवारात लावले बॅरिगेट्स वर्धा-नागपूर मार्गावरील सेलडोह येथे पोलिसांकडून बॅरिगेट्स लावण्यात आले आहे. या ठिकाणी वर्धा व नागपूर जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांच्या  वाहनांची तपासणी केली जात आहे.

विदेशी दारूचीही होतेय आयातजिल्ह्यात दारूबंदी आहे. पण, सध्या संचारबंदीच्या काळात शेजारच्या जिल्ह्यांमधून छुप्या पद्धतीने विदेशी दारूची आयात दारूविक्रेते करीत आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर वाहनांची कसून तपासणी झाल्यास दारूच्या अवैध वाहतुकीच्या प्रकाराला ब्रेक लागणार आहे. परंतु, पोलीस प्रशासन त्यासाठी सकारात्मक नसल्याचे दिसते.

वर्धेला चार जिल्ह्यांचा वेढा

वर्धा जिल्ह्याला नागपूर, अमरावती, चंद्रपूर व यवतमाळ  जिल्ह्यांची सीमा लागून आहे. त्या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले असले तरी या ठिकाणी अनेकांचे आवागमन बिनधास्त सुरू आहे.ई-पासच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सिमेवर काही ठिकाणी तात्पूर्ती पोलीस चौकी तयार करून तेथे पोलीस आणि काही अधिकारी तैनात करण्यात आले आहे; पण तेही जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना साधी विचारपूस करीत नाहीत.  जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून मागील वर्षी जिल्हाबंदी दरम्यान आर्वी तालुक्यात सात, आष्टी पाच तर  कारजा तालुक्यात तीन ठिकाणी चेकपोस्ट होते. तर जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यात जाणाऱ्या चोरवाटा तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळात बंद करण्यात आल्या होत्या. 

मध्य प्रदेशात जाणाऱ्या मार्गावर चेकपोस्ट नाहीचआष्टी तालुक्यातील द्रुगवाडा मार्गे अमरावती जिल्हा होत मध्य प्रदेशात जाता येते. परंतु, या मार्गावर चेकपोस्टच नाही.  केवळ एका गृहरक्षकावर जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे येथे कुठल्याही वाहनाची तपासणी होत नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस