लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा जून महिन्याचा दुसरा आठवडा शेवटात असतानाही जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे कृषितज्ज्ञ सांगत असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून तब्बल १ हजार ८२७ हेक्टरवर कापूस, तूर पिकाची धूळपेरणी केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी फार पूर्वीपासून धूळपेरणी करतात. तर यंदाही कोरोना संकटाला न जुमानता काही शेतकऱ्यांनी मोठा धाडस करून धूळपेरणी केली आहे. जिल्ह्यात हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, देवळी व वर्धा अशी एकूण आठ तालुके असून यापैकी चार तालुक्यात दमदार पाऊस येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. तर एका तालुक्यात तूर पिकाचीही लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.एरवी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होत दमदार पाऊस जिल्ह्यात हजेरी लावतो. परंतु, दमदार पाऊस होण्यापूर्वीच जिल्ह्यातील १ हजार ८२७ हेक्टरवर शेतकऱ्यांनी मोठी जाखीम पत्कारून आतापर्यंत धूळपेरणी केल्याचे सांगण्यात आले.सेलू तालुक्यात ४० हेक्टरवर तुरीची लागवडपेरणीयोग्य पाऊस होण्यापूर्वीच सेलू तालुक्यात ४० हेक्टरवर शेतकऱ्यांनी तुरीची आणि ३०० हेक्टरवर कपाशीची लागवड केल्याचे वास्तव आहे...अन्यथा ओढवेल दुबार पेरणीचे संकटसध्यास्थितीत जिल्ह्यात १ हजार ८२७ हेक्टरवर शेतकऱ्यांनी तूर व कपाशीची धूळपेरणी केली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी धूळपेरणीचे धाडस केले असले तरी पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढावणार आहे.७५ ते १०० मिमी झालेला पाऊस पेरणी योग्य असतो. दमदार पाऊस झाल्यावरच शेतकºयांनी पेरणी करणे योग्य ठरते. मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजावर धूळपेरणी केल्यास आणि त्यानंतर पावसाचा खंड पडल्यास त्याचा परिणाम अंकुरलेल्या पिकावर होऊ शकतो.- डॉ. प्रशांत उंबरकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा.
१,८२७ हेक्टरवर धूळपेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST
वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी फार पूर्वीपासून धूळपेरणी करतात. तर यंदाही कोरोना संकटाला न जुमानता काही शेतकऱ्यांनी मोठा धाडस करून धूळपेरणी केली आहे. जिल्ह्यात हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, देवळी व वर्धा अशी एकूण आठ तालुके असून यापैकी चार तालुक्यात दमदार पाऊस येण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.
१,८२७ हेक्टरवर धूळपेरणी
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी पत्करली जोखीम : तूर अन् कपाशीची झाली लागवड