शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ७१ हजार ५०० लिटर दूध केले रिफ्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:01 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता शासनाव्दारे दूध व्यवसायावर भर देत अनुदानावर गायींचे वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढले असतांना शासकीय दूध योजना गुणप्रतीचे कारण देऊन दूध खरेदी करण्यास नकारघंटा वाजवित आहे. मागील वर्षी तब्बल ७१ हजार ५०० लीटर दुध स्वीकारले नसल्याने दूध व्यवसायिकांची ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देउत्पादक अडचणीत : शासकीय दूध योजनेचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याकरिता शासनाव्दारे दूध व्यवसायावर भर देत अनुदानावर गायींचे वाटप केले. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढले असतांना शासकीय दूध योजना गुणप्रतीचे कारण देऊन दूध खरेदी करण्यास नकारघंटा वाजवित आहे. मागील वर्षी तब्बल ७१ हजार ५०० लीटर दुध स्वीकारले नसल्याने दूध व्यवसायिकांची ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी अवस्था झाली आहे.जिल्ह्यातील २५६ दूध सोसायट्या आहे. कमीतकमी २ हजार दूध उत्पादक आहे. ११ ते १२ मार्गावरुन वर्धा जिल्हा दूध उत्पादक संघ दूध गोळा करतात. हे सर्व दूध मागील ३० ते ४० वर्षांपासून शासकीय दूध योजनेला पुरवितात. मागील तीन वर्षापासून गुणनियंत्रक अधिकारीच दूधशाळा व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळीत असल्याने या कालावधीत जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची मोठी पिळवणूक सुरुअसल्याची ओरड होत आहे. जिल्ह्यातील दूध चांगल्या प्रतीचे असताना काही ठराविक संस्थेचेच दूध गुणप्रतीत लागत असून इतर सर्व दूध हे निकृष्ट व कमीप्रतीचे असल्याचे सांगून स्वीकारले जात नाही. त्यामुळे ते कमी दरात विकावे लागतात, असाही आरोप होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना दूध व्यवसायाकडे वळवून दूधाचे उत्पादन वाढविण्यास मदत केली जाते. तर दुसरीकडे दुधाचे उत्पादन वाढल्यास ते खरेदी न करता परत पाठविण्याचा प्रताप शासकीय दूध योजनेने चालविल्याने दूध उत्पादकांनी आता व्यवसायापासून फारकत घेतली आहे.प्रतिदिन ४ हजार लिटरने दूध संकलन घटलेमागील वर्षी जून २०१८ मध्ये संपूर्ण जिल्ह्याचे दूध संकलन ३ लाख ९ हजार ८०१ म्हणजेच प्रतिदिन १० हजार २३७ लीटर होते. परंतु, शासकीय दूध योजनेच्या मनमानी कारभारामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम झाला. यावर्षी जून महिन्यात केवळ १ लाख ९४ हजार ३६९ म्हणजेच प्रतिदिन ६ हजार ४७८ एवढेच दूध संघाकडे आहे. ही तफावत फक्त जून महिन्यातीलच असून मागील वर्षभरात ७१ हजार ५०० लीटर दूध शासकीय योजनेने या ना त्या निकषात बसत नसल्याचे कारण देऊन परत केले. परिणामी दूध उत्पादक आर्थिक अडचणीत आले असून शासनाने दूध व्यवसायावर दिलेली भर येथे निरर्थक ठरत आहे.प्रोटीनचे निकष लावले जातातजिल्ह्यातील दूध हे वितरण व्यवस्थेकरिता न वापरत ईटकळ येथे खाजगी पावडर प्रकल्पाला पुरविल्या जाते. त्यामुळे पावडर तयार करताना प्रोटीनच्या निकषात बसत नाही. म्हणून वर्धा दूध संघाने शासकीय योजनेला पुरवठा केलेले दूध परत केले जात आहे. ३ जुलै रोजी शासकीय दूध योजनेला ६ हजार ३६७ लीटर दूध पुरवठा केला असता त्यापैकी ३ हजार ७९० लीटर दूध स्वीकारले असून २ हजार ५७७ लीटर दूध प्रोटीन कमीप्रतीचे असल्याचे सांगून परत केले. शासकीय दूध योजनेच्या या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील शेतकरी व दूध उत्पादकांना नाहक आर्थिक झळ सोसावी लागत आहे.जिल्ह्यातील दूध उत्तम दर्जाचे असतानाही प्रोटीनच्या निकषात बसत नसल्याचे कारण देऊन दूध परत केले जात आहे. यामुळे शेतकºयांसह दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. नुकताच दूध खरेदीची मर्यादा वाढविण्यात आल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला खरा पण, प्रोटीनच्या निकषात दूध उत्पादकांचे कंबरडे मोडत आहे. याबाबत वारंवार सूचना करुनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकºयांची अवस्था लक्षात घेत ही अट शिथिल करावी.- सुनील राऊत, अध्यक्ष, जिल्हा दुध उत्पादक संघ.