शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

दुर्गा विसर्जनात पित्याचा मृत्यू, मुलगा बचावला

By admin | Updated: October 24, 2015 02:04 IST

तालुक्यातील तुळजापूर (वघाळा) येथील धामनदी पात्रावर दूर्गा देवीच्या विसर्जनाकरिता गेलेल्या वडिलाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दोन घटनेत दोघांचा मृत्यू : हिंगणघाटच्या घटनेत दोन दिवसांनी आढळला मृतदेह सेलू : तालुक्यातील तुळजापूर (वघाळा) येथील धामनदी पात्रावर दूर्गा देवीच्या विसर्जनाकरिता गेलेल्या वडिलाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांना मुलाला वाचविण्यात यश आले. विनोद फुलचंद तुमडाम (४०) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, विनोद हा त्याचा नऊ वर्षांचा मुलगा गौरव याला घेऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. विनोद हा पट्टीचा पोहणारा अशी त्याची ख्याती होती. त्याच्या मुलाला खांद्यावर बसून तो खोल पाण्यात उतरला काही वेळाने मुलगा गंटागळ्या खात असल्याचे ग्रामस्थांना दिसले. काहींनी मुलाला बाहेर काढले; मात्र विनोद तिथे आढळला नाही. अर्धा तासाने विनोदला पाण्याबाहेर काढून सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने गावात शोककळा पसरली असून एकाही घरी दसरा साजरा केला नाही.(तालुका प्रतिनिधी)हिंगणघाट येथे युवकाचा मृत्यू हिंगणघाट-दुर्गा देवीच्या घट विसर्जनासाठी वणा नदीच्या धोबी घाटाजवळ मित्रांसह गेलेल्या २३ वर्षीय युवकाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला. अमोल शंकरराव राडे (२३) रा. हनुमान वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रानुसार, हनुमान वॉर्डातील देवी मंदिरातील घटाच्या विसर्जनासाठी अमोल राडे हा वणा नदीच्या पात्रात मित्रासह गेला होता. तो नदीच्या धोबी घाटाजवळच्या विठ्ठलाच्या मूर्ती परिरातील खोल पाण्यात बुडत असताना दोन मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्या ठिकाणी बुधवारी दिवसभर मासेमाऱ्यांच्या सहकार्याने पोलिसांनी शोध मोहीम राबविली. परंतु त्याचा शोध लागला नाही. अखेर शुक्रवारी सकाळी ६ वाजता त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पोलीस कर्मचारी अण्णा दुर्गे तपास करीत आहे. सदर युवक पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच हनुमान वॉर्ड व परिसरात शोककळा पसरली त्यामुळे दसऱ्याचा सण अनेकांनी साजरा केला नाही.(तालुका प्रतिनिधी)कालव्यात तरुणाची आत्महत्यापुलगाव - नजीकच्या विरूळ (आकाजी) येथील अमोल माणिक शेंडे (३२) याने गुरुवारी सायंकाळी ६ वाजता गुंजखेडा येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. रात्रभर शोध घेतला असता शुक्रवारी सकाळी ९ वाजता कालव्यामध्ये मृतदेह तरंगताना आढळला. अमोल विरूळ येथील शिवसेना कार्यकर्ता असून तंटामुक्त समिती अध्यक्ष होते. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी व दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.(शहर प्रतिनिधी)