शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यामुळे वस्तीला डम्पिंग यार्डचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:33 IST

नगर परिषदेचा नांदगाव येथे असलेला डम्पिंग यार्ड काही कारणाने वादात सापडला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची सध्या काही चिन्हे नसताना शहरातील मोहता मिल लगत असलेल्या रिकाम्या जागेवर अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्माण होताना दिसत आहे.

ठळक मुद्देनागरिक दुर्गंधीने बेजार : स्वच्छ हिंगणघाटचा बोजवारा; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

हेमंत चंदनखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नगर परिषदेचा नांदगाव येथे असलेला डम्पिंग यार्ड काही कारणाने वादात सापडला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्याची सध्या काही चिन्हे नसताना शहरातील मोहता मिल लगत असलेल्या रिकाम्या जागेवर अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्माण होताना दिसत आहे. या कचºयाच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे.सध्या शहरातील कचरा विकास शाळेजवळ टाकला जात आहे. कचरा टाकण्याचा प्रकार नित्याचा असल्याने येथे कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट गुरे फिरत असून त्यांच्या माध्यमातून कचरा इतरत्र पसरत आहे. नगर परिषदेची या डम्पिंग यार्डला मान्यता नसल्याची माहिती आहे. असे असले तरी शहरातील लोकांनी प्लास्टिक कचरा, सडक्या वस्तू, मेलेली जनावरे, शेण, ओला-सुखा कचरा पोत्यात भरून जुन्या व बंद असलेल्या पडक्या विकास शाळेच्या जागेत सर्रास टाकणे सुरू केले आहे. ते मैदान पूर्णत: कचऱ्याने भरले गेले असून तेथील हलका कचरा प्लास्टिक सारख्या वस्तू हवेने रस्त्यावर येत आहे. काही कचरा जनावरांनी पसरविल्यानेही रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त पसरलेला आहे.या कचऱ्याच्या ढिगातून दुर्गंधी बाहेर पडत असल्याने त्या रस्त्यावरून जाणे-येणे त्रासदायक झाले आहे. याच परिसरात शहरातील एक मोठे हनुमान मंदिर आहे. तेथे भाविकांची गर्दी असते. या नागरिकांना या कचºयाच्या ढिगाऱ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय लागूनच असलेल्या वसंत विहार आणि विनोद भवन परिसरातील नागरिकांचे या दुर्गंधीमुळे वातावरण दूषित झाले आहे. त्यांना आरोग्य विषयक अनेक समस्या भेडसावत असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. असे असताना याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी पालिकेने ही समस्या गांभीर्याने घेण्याची मागणी आहे.स्वच्छता अभियानातच वाढला कचराशासनाच्या सूचनेनुसार ‘स्वच्छ अभियान’ शहरभर पाळल्या गेले. या अभियानाचा शेवट झाला तरी हा भाग यातून सुटला असल्याचेच दिसत आहे. उलट या अभियानाच्या काळात या भागात कचरा अधिकच वाढल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. कुणीही यावं आणि येथे कचरा टाकून मोकळे व्हावे, असा प्रकार सध्या येथे सुरू आहे. लगतच्या परिसरातील अनेक व्यावसायिकांनी आपापल्या दुकानातील कचरा पोत्यात जमा करून येथे टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे. शहरात रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी असल्यामुळे अनेकांनी हा एक जवळचा मार्ग शोधला असल्याचे दिसून येत आहे; पण याचा त्रास येथील नागरिकांना होतो, याचा विचार कुणीही करण्यास तयार नाही. या प्रकारामुळे विनोद भवन आणि वसंत विहारातील रहिवासी शहराचे नागरिक नाहीत काय, असाही सवालही उपस्थित करण्यात येत आहे.आठवड्यातून दोन वेळाच येते घंटागाडीशहरातील ही एक मोठी लोकवस्ती आहे. यामुळे येथील नागरिकांना सेवा पुरविण्याची जबाबदारी पालिकेची आहे. असे असताना या भागात आठवड्यातून केवळ दोनच दिवस घंटागाडी येत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. यातून पालिकेच्या स्वच्छता अभियानाची मर्यादा स्पष्ट होते. एकीकडे स्वच्छता अभियानाचा जोरदार वाजागाजा केला जात असताना दुसरीकडे असा कचऱ्याचा अनधिकृत डम्पिंग यार्ड उभा होत आहे. प्लास्टिक बंदी असताना सर्वत्र प्लास्टिकचा कचरा दिसतो. यामुळे पालिकेच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :dumpingकचरा