शहरं
Join us  
Trending Stories
1
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
4
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
5
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
6
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
7
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
8
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
9
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
10
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
11
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
12
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
13
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
14
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
16
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
17
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
18
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
19
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
20
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

‘डौल मयुराच्या पायी आणि नादावलं रान...’

By admin | Updated: October 9, 2016 00:38 IST

‘डौल मयुराच्या पायी आणि नादावलं रान’ अशी लाघवी मांडणी करणारी तर कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वेदना

काव्य बैठकीत घेतला ठाव : विदर्भ साहित्य संघाचा उपक्रमवर्धा : ‘डौल मयुराच्या पायी आणि नादावलं रान’ अशी लाघवी मांडणी करणारी तर कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वेदना शब्दांतून मांडणारी काव्यमैफल जयश्री कोटगीरवार यांच्या निवासस्थानी सादर झाली. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेद्वारे या काव्यबैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वि.सा. संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित काव्यमैफलीत प्रा. दत्तानंद इंगोले, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. पुरुषोत्तम माळोदे, दिलीप गायकवाड, प्रशांत पनवेलकर, मीनल रोहणकर, मीरा इंगोले, मंजूषा चौगावकर, जयश्री कोटगीरवार आदींनी दर्जेदार रचना सादर केल्या. कार्यक्रमाला वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वय चिटणीस प्रदीप दाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाखा सचिव रंजना दाते यांचा सत्कार करण्यात आला. काव्य मैफलीची सुरुवात ‘घडा वाहत असताना’ या कवितेने झाली. ‘कधीही नसतेच सागराइतके आभाळ एकाकी, सागर आणि आभाळ आपल्या सारखेच असते, कुणीतरी पाठशिवणीचा खेळ मांडत असतो नकळत तेव्हा सवंगडीच डाव सोडून जात असतात, घडा वाहत असताना’, असे संदर्भ प्रा. राजेंद्र मुंढे यांनी कवितंतून मांडले. हिंडोलती वाऱ्यावर पार पिंपळ हिरवे, राधा मुरलीची लय सूर लेवती पारवे, याद पुन:पुन्हा यावी वेणू असाच वाजला, आला निर्गुणाला गुण धुंद गोविंंद नाचला’ अशी लय प्रशांत पनवेलकर साधली. कितीतरी तुझी रूपं तुझ्याच चित्रांसारखी, तुझ्या चित्रांवर रेखाटते मी कविता मनासारखी, अशा शब्दात मंजूषा चौगावकर यांनी काव्यप्रेरणेला व्यक्त केले. ‘विसर पडूनही न पडावा अशीच करून ठेवली साठवण आणि माझ्या एकटेपणावरचा उतारा तुझी एकेक आठवण’, अशा चारोळीवजा कविता ज्योती भगत यांनी सादर केल्या. ‘भिववित आली आज मनाला ही संध्याछाया, विराण झाले जग हे सारे थरथरली काया...शोककळाही निरवेल आणिक होईल रम्य पहाट’, असा आशावाद जयश्री कोटगीरवार यांनी लयबद्ध कवितेतून मांडला. दिलीप गायकवाड यांनी पायथ्यातुनी वरवर चालत जाता येते, वेदना जरी उरी बासरीत गाता येते’ ही गझल सादर केले. संजय इंगळे तिगावकर यांनी कुलूप, काही संदर्भ आणि ‘कोहम’ या कविता सादर केल्या. याप्रसंगी कल्पना माळोदे, रंजना दाते, प्रद्युम्न चौगावकर, गौरी कोटगीरवार यांनी अन्य कविंच्या कविता आणि गीतेही सादर केलीत. काव्यमैफलीचे संचालन कोटगीरवार यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या व्यथांचा कवितांतून घेतला वेध‘माझा शेतकरी राजा धुरा धुरा तपासतो, कुठे फुटलेला बांध मातीगोट्याने बुजवितो, फुटलेले आयुष्य परी त्याला सांघता न आले, अवघ्या जीवनाचे त्याच्या मातेरे झाले’ ही शेतकऱ्यांची व्यथा मीर इंगोले यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी ही कविता सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.मीनल रोहणकर यांनी ‘जेव्हा त्याची चिता जळत होती, मला भविष्याची चिंता जाळत होती, आत्महत्येने त्याचे प्रश्न सुटले होते, मी मात्र उत्तर शोधत होते’, असे शेतकऱ्याच्या विधवेचे मनोगत मांडले. ‘वाटतं असं जगावं पण, आपलं चिल्लर खुर्दा आयुष्य, गल्लीतही टिकेल की नाही, त्याचं काय करावं?’ अशी वर्तमानकालीन खंत दत्तानंद इंगोले यांनी कवितेतून व्यक्त करीत ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला.