शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

‘डौल मयुराच्या पायी आणि नादावलं रान...’

By admin | Updated: October 9, 2016 00:38 IST

‘डौल मयुराच्या पायी आणि नादावलं रान’ अशी लाघवी मांडणी करणारी तर कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वेदना

काव्य बैठकीत घेतला ठाव : विदर्भ साहित्य संघाचा उपक्रमवर्धा : ‘डौल मयुराच्या पायी आणि नादावलं रान’ अशी लाघवी मांडणी करणारी तर कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वेदना शब्दांतून मांडणारी काव्यमैफल जयश्री कोटगीरवार यांच्या निवासस्थानी सादर झाली. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेद्वारे या काव्यबैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वि.सा. संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांच्या अध्यक्षतेत आयोजित काव्यमैफलीत प्रा. दत्तानंद इंगोले, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. पुरुषोत्तम माळोदे, दिलीप गायकवाड, प्रशांत पनवेलकर, मीनल रोहणकर, मीरा इंगोले, मंजूषा चौगावकर, जयश्री कोटगीरवार आदींनी दर्जेदार रचना सादर केल्या. कार्यक्रमाला वि.सा. संघाचे केंद्रीय शाखा समन्वय चिटणीस प्रदीप दाते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाखा सचिव रंजना दाते यांचा सत्कार करण्यात आला. काव्य मैफलीची सुरुवात ‘घडा वाहत असताना’ या कवितेने झाली. ‘कधीही नसतेच सागराइतके आभाळ एकाकी, सागर आणि आभाळ आपल्या सारखेच असते, कुणीतरी पाठशिवणीचा खेळ मांडत असतो नकळत तेव्हा सवंगडीच डाव सोडून जात असतात, घडा वाहत असताना’, असे संदर्भ प्रा. राजेंद्र मुंढे यांनी कवितंतून मांडले. हिंडोलती वाऱ्यावर पार पिंपळ हिरवे, राधा मुरलीची लय सूर लेवती पारवे, याद पुन:पुन्हा यावी वेणू असाच वाजला, आला निर्गुणाला गुण धुंद गोविंंद नाचला’ अशी लय प्रशांत पनवेलकर साधली. कितीतरी तुझी रूपं तुझ्याच चित्रांसारखी, तुझ्या चित्रांवर रेखाटते मी कविता मनासारखी, अशा शब्दात मंजूषा चौगावकर यांनी काव्यप्रेरणेला व्यक्त केले. ‘विसर पडूनही न पडावा अशीच करून ठेवली साठवण आणि माझ्या एकटेपणावरचा उतारा तुझी एकेक आठवण’, अशा चारोळीवजा कविता ज्योती भगत यांनी सादर केल्या. ‘भिववित आली आज मनाला ही संध्याछाया, विराण झाले जग हे सारे थरथरली काया...शोककळाही निरवेल आणिक होईल रम्य पहाट’, असा आशावाद जयश्री कोटगीरवार यांनी लयबद्ध कवितेतून मांडला. दिलीप गायकवाड यांनी पायथ्यातुनी वरवर चालत जाता येते, वेदना जरी उरी बासरीत गाता येते’ ही गझल सादर केले. संजय इंगळे तिगावकर यांनी कुलूप, काही संदर्भ आणि ‘कोहम’ या कविता सादर केल्या. याप्रसंगी कल्पना माळोदे, रंजना दाते, प्रद्युम्न चौगावकर, गौरी कोटगीरवार यांनी अन्य कविंच्या कविता आणि गीतेही सादर केलीत. काव्यमैफलीचे संचालन कोटगीरवार यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या व्यथांचा कवितांतून घेतला वेध‘माझा शेतकरी राजा धुरा धुरा तपासतो, कुठे फुटलेला बांध मातीगोट्याने बुजवितो, फुटलेले आयुष्य परी त्याला सांघता न आले, अवघ्या जीवनाचे त्याच्या मातेरे झाले’ ही शेतकऱ्यांची व्यथा मीर इंगोले यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी ही कविता सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.मीनल रोहणकर यांनी ‘जेव्हा त्याची चिता जळत होती, मला भविष्याची चिंता जाळत होती, आत्महत्येने त्याचे प्रश्न सुटले होते, मी मात्र उत्तर शोधत होते’, असे शेतकऱ्याच्या विधवेचे मनोगत मांडले. ‘वाटतं असं जगावं पण, आपलं चिल्लर खुर्दा आयुष्य, गल्लीतही टिकेल की नाही, त्याचं काय करावं?’ अशी वर्तमानकालीन खंत दत्तानंद इंगोले यांनी कवितेतून व्यक्त करीत ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला.