शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
3
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
4
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
5
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
6
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
7
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
8
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
9
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
10
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
11
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
12
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
13
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
14
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
16
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
17
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
18
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
19
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
20
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:31 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकरिता लागणारे गौणखनिज ग्रामीण भागातील बरड असलेल्या भागातून खोदून रात्रं-दिवस वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्याची पुरती वाट लागल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देकालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकरिता लागणारे गौणखनिज ग्रामीण भागातील बरड असलेल्या भागातून खोदून रात्रं-दिवस वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्याची पुरती वाट लागल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.महामार्गाकरिता जड वाहनांची शेतशिवारातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात ये-जा वाढली आहे. सद्यस्थितीत समृद्धी महामार्गाचे सूरगाव परिसरात काम सुरू आहे. या मार्गाकरिता लागणारा मुरूम झडशी येथील मौजा गिरोली परिसरातील शेती विकत घेत मुरूम ट्रकद्वारे नेण्याचे काम जोरात सुरू आहे. मुरूम वाहतूक येळाकेळी फाटा ते बाभूळगाव मार्गे डांबर मार्गाने न करता हिवरा शेतशिवारातून होत आहे. मदन उन्नई डावा मुख्य रस्ता पाटबंधारेच्या कर्मचारी व शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी निर्माण केला आहे.महामार्गाच्या कामावरील ट्रक येथून धावत असल्याने रस्ता दोन्ही बाजूने संपूर्णपणे दबला आहे. यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट अडचणीत आली आहे.सध्या शेतीकामे सुरू असून शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य अक्षरश: डोक्यावर वाहून न्यावे लागत आहे. मध्यंतरी पावसाने बरेच दिवस उघडीप दिली होती. या दरम्यान मार्गाने जाणाऱ्या ट्रकमुळे उडणारी धूळ रस्त्यालगत असणाऱ्या पिकावर बसत होती. यामुळे अनेक पिके खराब झाली, शिवाय कालव्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता कालव्यावरून सर्रास जड वाहनांचे आवागमन सुरू आहे. त्यामुळे नुकसानभरपाई कोण देणार, संबंधित अधिकारी गप्प का असा प्रश्न शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष देत या सर्व प्रकाराला तत्काळ आळा घालावा, अशी मागणी झडशी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार; शेतकऱ्यांना मनस्तापशेतशिवारातील रस्त्याची दैना झाल्याने शेतकऱ्यांना बैलबंडी रस्त्यावरच उभी करून खत व शेतीपयोगी साहित्य डोक्यावर दूरपर्यंत वाहून न्यावे लागत आहे. केवळ कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे.गौणखनिज घेऊन जाणाऱ्या वाहनांची ये-जा बंद करण्यास सांगितले असता कंत्राटदाराने कालव्यावर मुरूम टाकून देतो, असे सांगितले. काही ठिकाणी मुरूम टाकलेला आहे. त्यामुळेच वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आणखी काही दिवस शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागेल.- ए. राऊत, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, मदन उन्नई, वर्धा.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग